आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात, ते तुमच्या तोंडावर गोड बोलतात. मात्र त्यांच्या मनामध्ये तुमचं चांगलं व्हावं अशी भावना कधीच नसते, त्यामुळे ते तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत गद्दारी करतात. तुम्हाला धोका देतात. अशा लोकांपासून आपण नेमही सावध राहिलं पाहिजे. जर आपण बेसावध राहिलो तर असे लोक कधीही आपला घात करू शकतात. चाणक्य म्हणतात जे आपल्या जवळचे असतात तेच आपल्याला अनेकदा धोका देतात, त्यामुळे असे लोकं ओळखणं हे खूप कठीण काम असतं. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी दिसल्या तर तुम्ही सावध होणं गरजेचं असतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
बदललेली वृत्ती – चाणक्य म्हणतात अनेकदा असं होतं की काही जण हे आपले चांगले मित्र असतात, हितचिंतक असतात. मात्र जेव्हा आपल्या प्रगतीला सुरुवात होते, तेव्हा ती प्रगती त्यांना बघवत नाही. अशा वेळी अचानक अशा व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यामध्ये फरक जाणवू लागतो, जेव्हा तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्या -बोलण्यामध्ये फरक दिसतो, तेव्हा वेळीच सावध व्हा. कारण असे व्यक्ती हे तुमच्याविरोधात कट कारस्थान रचण्याची शक्यता असते.
अतिगोड बोलणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक अतिगोड बोलतात त्यांच्यापासून तर कायम सावध राहण्याची गरज असते. जे लोक तुमच्या तोंडावर स्पष्ट बोलतात, अशा लोकांच्या गोष्टी तुम्हाला भलेही कटू वाटतील, मात्र त्यांच्या मनात जे असतं, तेच त्यांच्या तोंडात देखील असतं. मात्र जे लोक अतिगोड बोलतात, हे लोक कधीच तुम्हाला तुमचे दोष सांगत नाहीत. उलट ते तुमच्या चुकांवर टपलेले असतात. त्यामुळे जर तुमच्याशी एखादा व्यक्ती अतिगोड बोलत असेल तर त्याच्यापासून वेळीच सावध व्हा, त्याचं कारण शोधून काढा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
समोर कौतुक, मागे निंदा – चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, जे समोर आपलं कौतुक करतात. मात्र पाठीमागे आपली निंदा करतात, अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे, असे लोक तुम्हाला धोका देत असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




