मुंबईत भाजपचाच महापौर, पहिला नव्हे दुसरा..
बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज बऱ्याच वर्षांनी बीएमसीला महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे या महापौर असतील तर शिवसेनेचे संजय घडी हे उपमहापौरपद स्वीकारणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी भाजप सेनेत रस्सीखेच झाल्याचे बोलले जात होते. अखेर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मात्र रितू तावडे यांच्या रुपाने भाजपचा पहिलाच महापौर बसणार, असा जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. कारण यापूर्वीही एकदा भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान झाला होता.त्यामुळे यंदा रितू तावडे या महापौर झाल्या असल्या तरी भाजपचा महापौर होण्याची ही पहिली नाही, तर दुसरी वेळ आहे.
कोण होते भाजपचे महापौर ?
ती व्यक्ती म्हणजे म्हणजे भाजपचे निष्ठावान डॉ. प्रभाकर पै. तब्बल 4 दशकांपूर्वी म्हणजे 1982 ते 1983 पर्यंत डॉ. पै हे मुंबई महापालिकेचे महापौर होते. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. पै हे मूळचे कर्नाटकमधील उडपीतील बारकूर येथील निवासी होते, अशीही माहिती समोर आली आहे. त्यावेळी राजकीय समीकरणे आजच्या तुलनेत खूप वेगळी होती. तेंव्हा जनता पक्षातून फुटून भाजपची नुकतीच स्थापना झाली होती. तेव्हा भाजपचा खूप विस्तार नसला तरी पक्षाची मुंबईच्या राजकारणार चांगलीच छाप उमटल्याचे दिसून आलं.
प्रभाकर पै कोण ?
मूळचे कर्नाटकचे असलेले डॉक्टर प्रभाकर पै हे उडपीतील बारकूर येथील गावा जन्मले होते. व्यवसायाने ते डॉक्टर होते, मात्र त्यांना समाजसेवेची ओढ होती, त्यामुळेच ते मुंबईत आले. गर्भवती महिला, मलेरियाग्रस्त तरुण किंवा आजारी वृद्धांना वेळेवर मदत न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटना त्यांना अस्वस्थ करत. त्यांनी वंचितांसाठी वैद्यकीय केंद्रे उभारण्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचा संकल्प केला. वांद्रे-खार परिसरात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय खूप यशस्वी होता.
डॉ. पै हे 1968 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1968 ते 1984 या काळात त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं. आणि त्याच कालावधीत 1982 ते 1983 या काळात त्यांनी महापौरपद भूषवले. एवढंच नव्हे तर डॉ. पै यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
ज्येष्ठ पत्रकारांनी आठवणींना दिला उजाळा
भाजपचे पहिले महापौर असलेल्या डॉ. पै यांच्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी महत्वाची आठवण सांगितली. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ” मुंबईच्या महापौर पदासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांच्यात चाललेल्या अकटोविकट संघर्षात भाजपला महापौर पद मिळालेच तर जो कोणी महापौर होईल तो भारतीय जनता पक्षाचा दुसरा महापौर असेल… 1982 मध्येच डॉक्टर प्रभाकर संजीवा पै हे मुंबईचे महापौर झाले होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते होते याची आठवण तेव्हा त्या महापौर कार्यालयात कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रकाश परांजपे शहापूरकर यांनी आत्ता दुपारी करून दिली.. पै यांची आठवण करून दिल्याबद्दल परांजपे यांना धन्यवाद. परांजपे यांनी आणखीही एक गोष्ट सांगितली.. पै महापौर असतानाच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक शिबीर झाले होते त्या शिबिरास महापौर असलेले पै हे संघाचे अर्धी चड्डी घालून उपस्थित होते आणि त्यांच्या समवेत तिथे परांजपेही गेले होते.” अशी आठवण अकोलकर यांनी लिहीली.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




