
BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे केवळ मुंबईकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही सत्तेसाठी नेहमीच मोठा गड मानली जाते. मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेना पक्षाचे मुंबई महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. यातील २० वर्षे भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या सत्तेचा शिवसेनेसोबत लाभ घेतला.
मात्र २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यातील निकृष्ट वाढल्यानंतर स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्यात आली. ही निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना ८४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपाने तब्बल ८२ जागा जिंकत प्रचंड वाढ नोंदवली होती. काँग्रेसला ३१, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, समाजवादी पक्षाला ६ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) ७ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष आणि इतर लहान पक्षांनाही काही जागा मिळाल्या होत्या.
गेल्या ७ वर्षांत महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणात प्रचंड उलथापालत होत मोठे बदल झालेत. मराठी माणसाचा मुद्दा घेऊन उदयास आलेल्या शिवसेना पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन तुकड्यांत विभाजन झाले. काँग्रेस मात्र मुंबईत आपली पारंपरिक पायाभरणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे २०२५ मधील निवडणुकीतले गणित खूप गुंतागुंतीचे बनले आहे.
युती-आघाडीबाबत मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. भाजप आणि शिंदे गटाची युती जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून भाजपावर दबाव तंत्र टाकण्याचे काम सुरू असून समसमान जागा कशा लढवल्या जातील यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटासह महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मुंबईमधील मराठी माणसांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे वाटत आहेत. त्या दृष्टीने अनेक संघटनांकडून तसे प्रयत्न देखील झाले आहेत.
महाराष्ट्रात तिसरी भाषा हिंदी लादण्याचा सरकारचा प्रयत्न झाल्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत या निर्णयाला विरोध केला आणि परिणामी सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. तेव्हापासून शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकत्र येईल अशी मुंबईकर मराठी माणसांमध्ये अशा निर्माण झाली आहे. आता मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाईल की नाही हे येणाऱ्या काही महिन्यातच स्पष्ट होईल मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. मागील निवडणुकीत ७ नगरसेवक असलेल्या मनसेने नंतरच्या काळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध प्रयोग केले. सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला उरलेल्या एका नगरसेवकाने काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सध्या मुंबईत मनसेचे राजकीय बलस्थान काय आहे याबाबतचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेतच. अलीकडील घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा रंगू लागली आहे. मराठी मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि मनसे मिळून लढले तर परंपरागत शिवसैनिक मतदार पुन्हा एकवटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासोबतच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आता चलविचल देखील सुरू झाली असून ते पुन्हा माघारी फिरण्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.
येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती असा सामना रंगू शकतो किंवा दोन्ही ठाकरे एकत्र येऊन भाजपा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात लढतील असा अंदाज आहे. या युती किंवा आघाडीचा फायदा कोणाला होणार हा मोठा प्रश्न आहे. भाजप-शिंदे गटाकडे सत्ताधारी पक्षाची ताकद आणि संघटनात्मक बळ आहे. ठाकरे गटाला परंपरागत मराठी मतदारांचा भावनिक आधार आहे, तर काँग्रेसकडे अल्पसंख्याक आणि झोपडपट्टी भागातील पकड आहे. मनसेसह जर महाविकास आघाडी मजबूत झाली, तर भाजप-शिंदे युतीसमोर कठीण लढाई उभी राहू शकते.
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




