
BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे केवळ मुंबईकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही सत्तेसाठी नेहमीच मोठा गड मानली जाते. मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेना पक्षाचे मुंबई महापालिकेवर वर्चस्व राहिले आहे. यातील २० वर्षे भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या सत्तेचा शिवसेनेसोबत लाभ घेतला.
मात्र २०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यातील निकृष्ट वाढल्यानंतर स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवण्यात आली. ही निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना ८४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपाने तब्बल ८२ जागा जिंकत प्रचंड वाढ नोंदवली होती. काँग्रेसला ३१, राष्ट्रवादी काँग्रेसला ९, समाजवादी पक्षाला ६ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) ७ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष आणि इतर लहान पक्षांनाही काही जागा मिळाल्या होत्या.
गेल्या ७ वर्षांत महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणात प्रचंड उलथापालत होत मोठे बदल झालेत. मराठी माणसाचा मुद्दा घेऊन उदयास आलेल्या शिवसेना पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन तुकड्यांत विभाजन झाले. काँग्रेस मात्र मुंबईत आपली पारंपरिक पायाभरणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे २०२५ मधील निवडणुकीतले गणित खूप गुंतागुंतीचे बनले आहे.
युती-आघाडीबाबत मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. भाजप आणि शिंदे गटाची युती जवळपास निश्चित आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून भाजपावर दबाव तंत्र टाकण्याचे काम सुरू असून समसमान जागा कशा लढवल्या जातील यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटासह महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मुंबईमधील मराठी माणसांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत असे वाटत आहेत. त्या दृष्टीने अनेक संघटनांकडून तसे प्रयत्न देखील झाले आहेत.
महाराष्ट्रात तिसरी भाषा हिंदी लादण्याचा सरकारचा प्रयत्न झाल्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येत या निर्णयाला विरोध केला आणि परिणामी सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. तेव्हापासून शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकत्र येईल अशी मुंबईकर मराठी माणसांमध्ये अशा निर्माण झाली आहे. आता मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाईल की नाही हे येणाऱ्या काही महिन्यातच स्पष्ट होईल मात्र यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. मागील निवडणुकीत ७ नगरसेवक असलेल्या मनसेने नंतरच्या काळात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध प्रयोग केले. सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला उरलेल्या एका नगरसेवकाने काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सध्या मुंबईत मनसेचे राजकीय बलस्थान काय आहे याबाबतचा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेतच. अलीकडील घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा रंगू लागली आहे. मराठी मतदारसंघांमध्ये ठाकरे गट आणि मनसे मिळून लढले तर परंपरागत शिवसैनिक मतदार पुन्हा एकवटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासोबतच शिवसेना शिंदे गटात गेलेल्या अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आता चलविचल देखील सुरू झाली असून ते पुन्हा माघारी फिरण्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.
येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी महायुती असा सामना रंगू शकतो किंवा दोन्ही ठाकरे एकत्र येऊन भाजपा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात लढतील असा अंदाज आहे. या युती किंवा आघाडीचा फायदा कोणाला होणार हा मोठा प्रश्न आहे. भाजप-शिंदे गटाकडे सत्ताधारी पक्षाची ताकद आणि संघटनात्मक बळ आहे. ठाकरे गटाला परंपरागत मराठी मतदारांचा भावनिक आधार आहे, तर काँग्रेसकडे अल्पसंख्याक आणि झोपडपट्टी भागातील पकड आहे. मनसेसह जर महाविकास आघाडी मजबूत झाली, तर भाजप-शिंदे युतीसमोर कठीण लढाई उभी राहू शकते.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



