
Baramati : लोकसभा निवडणूकीपासून बारामतीत राजकीय वातावरण कमालीचे तप्त असून निकालानंतरही बारामतीत कमालीच्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेत बारामतीवरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारकी नंतर सुनेत्रा पवार यांना केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळण्याचीही चर्चा वेगाने सुरु आहे.
लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांनी भाजपसोबत जात महायुतीतून सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उभे केले होते.
निकालानंतरही अजित पवार यांनी महायुतीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत असून बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार विजयी होण्याइतपत संख्याबळ असल्यानेच अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. बारामतीतून शरद पवार, सुप्रिया सुळे व आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तीन खासदार मिळतील अशी चिन्हे आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा या निमित्ताने केंद्रीय निधीतून मोठा विकास होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.
|
|
शरद पवार यांनीही लक्ष केंद्रीत केले....
लोकसभा निवडणूकीत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देत शरद पवार याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला होता. स्वता शरद पवार हे आता बारामतीत लक्ष केंद्रीत करत असून त्यानी शहर व तालुक्यात दौरा करीत शेतकरी व कष्टक-यांना डोळ्यासमोर ठेवत काम करण्याचे सुतोवाच केलेले आहे. बारामतीत नवीन बांधणी त्यांच्याकडून वेगाने सुरु असून त्या मुळे विधानसभेच्या निवडणूकीत शरद पवार काय भूमिका घेणार या कडे सवचिच लक्ष आहे.
दुजेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरु असून त्यांना संधी दिली जाते की शरद पवार पुन्हा एखादा नवीन काही प्रयोग करतात याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. विधानसभेत सरकार बदलण्याचे रणशिंग बारामतीतून फुकून पवारांनी राज्यातच एक वेगळा संदेश दिला असल्याने कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह संचारला आहे. अजित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांना संधी देत केंद्रीय पातळीवर त्या व राज्यस्तरावर स्वता अजित पवार असे समीकरण जुळविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून बारामतीत नजरेत भरेल असा विकास करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे.
कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण.....
अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांत निकालानंतर निरुत्साह होता, आता मात्र सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाणार असल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारल्याचे दिसत होते.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




