प्रियदर्शन यांचा कॉलम:उथळपणावर हसणारा समाज‎ आपण कसा काय निर्माण केला ?‎

‎‎‎‎‎‎‎‎स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या कार्यक्रमात हिमांशू‎जांगडा आणि सेजल पवार यांनी केलेल्या धक्कादायक‎टिप्पण्यांचा विषय असो, किंवा काही काळापूर्वी समय‎रैनाच्या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेला सवंग‎विनोद असो. जर आपण या गोष्टींना केवळ‎सभ्यता-अश्लीलता किंवा नैतिकता-अनैतिकतेच्या‎निकषांवर तोलत राहिलो, तर आपण ते गंभीर सांस्कृतिक‎संकट ओळखू शकणार नाही. हे संकट आजच्या काळात‎खूप वेगाने पसरत आहे आणि मोठे होत चालले आहे.‎समाजात अनेक स्तरांवर विस्कळीतपणा वाढला आहे.‎जुनी मूल्ये आता निरर्थक झाली आहेत. त्या मूल्यांमध्ये‎दडलेला लैंगिक आणि सामाजिक अन्याय आता‎आपल्याला समजू लागला आहे. परंतु, नवी मूल्यप्रणाली ‎‎अजून आपल्यासमोर आलेली नाही.‎ वैयक्तिक स्वातंत्र्याची रास्त आणि अत्यंत महत्त्वाची ‎‎मागणी आज समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारली‎आहे. पण या स्वातंत्र्यासोबत वैयक्तिक जबाबदारीचे जे‎भान असायला हवे, ते कुठेही दिसत नाही. संयुक्त कुटुंबे‎आता विखुरली आहेत. विभक्त कुटुंबेही आता तुटू‎लागली आहेत. भावनिकदृष्ट्या नसली तरी किमान ‎‎भौतिकदृष्ट्या नक्कीच. आई-वडील जुन्या घरांमध्ये‎मुलांची वाट पाहत बसले आहेत. दुसरीकडे मुले आपल्या‎नव्या नोकऱ्यांमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ शोधण्यात व्यग्र‎आहेत. ती आपल्या नव्या आर्थिक श्रीमंतीतून ‘आनंद’‎नावाची गोष्ट खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत,‎जेणेकरून त्यांचे अदृश्य एकटेपण दूर होऊ शकेल.‎ जे शिक्षण या मुलांना जीवनातील कर्तव्ये, संघर्ष किंवा‎प्रश्नांशी जोडू शकले असते, ते आता उरलेले नाही. इयत्ता‎१२ वीनंतर मोठ्या पगाराच्या नोकरीच्या नावाखाली‎होणाऱ्या महागड्या शिक्षणाने त्यांच्या प्राधान्यक्रमाची‎दिशा ठरवून दिली आहे. एक चकाचक कार्यालय हेच‎आता त्यांचे घर आणि समाज बनले आहे. हे कार्यालय‎लॅपटॉपच्या रूपाने त्यांच्या खांद्यावर लादलेले असते.‎कामाच्या प्रचंड तणावात हे कार्यालयच त्यांना‎खाण्या-पिण्याचे, हसण्याचे आणि जगण्याचे मार्ग दाखवत‎राहते. हे मार्ग स्टँडअप कॉमेडीपासून ते ओटीटीवर‎मिळणारे चांगले-वाईट चित्रपट, विचित्र व्हिडिओ, रील्स‎आणि वेगवेगळ्या प्रलोभनांमधून तयार होतात. दर 2-3‎सेकंदांनी बदलणारी दृश्ये त्यांच्या सुप्त मनात एक‎अस्थिरतेची भावना निर्माण करतात. त्यामुळे त्यांना वाटते‎की, नोकऱ्या बदलत राहतील, नाती बनत आणि तुटत‎राहतील. शरीर आणि शारीरिक संबंधांनाही फार गांभीर्याने‎घेण्याची गरज नाही. यातूनच असा समाज तयार होतो, जो‎स्त्रीद्वेषी आणि शिवीगाळीने भरलेल्या उथळ विनोदांना‎निखळ मनोरंजन समजतो आणि त्यावर हसताना दिसतो.‎ दुर्दैवाने ही प्रक्रिया अशा वेळी सुरू आहे, जेव्हा‎भारतातील मुली पहिल्यांदाच पूर्णपणे बरोबरीच्या‎पातळीवर आपले स्वातंत्र्य मागत आहेत. या गोष्टीने नव्या‎पिढीला जुन्या पिढ्यांच्या तुलनेत लैंगिक समानतेबद्दल‎अधिक संवेदनशील बनवले आहे. परंतु, जुनी सरंजामी‎सडलेली विचारसरणी आणि नवी आधुनिक उथळता‎यातून पुरुषी मानसिकतेचा विकास झाला आहे. ही‎मानसिकता त्यांच्या सुप्त मनात अजूनही जिवंत आहे. ती‎या समानतेच्या विरोधात अनेक पातळ्यांवर मुलींचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अपमान करते. ती मुलींना केवळ 370 रुपयांच्या बिर्याणीत‎विकत घेता येण्यासारखी वस्तू समजते. दुर्दैवाची गोष्ट‎म्हणजे, नव्या भारतात कोणतीही सांस्कृतिक चर्चा उरलेली‎नाही. साहित्य, कविता आणि नवनिर्मितीच्या नावाखाली‎फक्त व्हायरल व्हिडिओ उरले आहेत, जे जीवनात‎तात्पुरता थरार निर्माण करतात. ज्या राजकारणावर हा‎सांस्कृतिक माहोल तयार करण्याची जबाबदारी आहे, ते‎राजकारण स्वतः जातीयवाद, प्रांतवाद आणि‎भ्रष्टाचाराच्या गर्तेत बुडालेले आहे. म्हणूनच, दिशाहीन‎आणि मूल्यहीन झालेल्या या पिढीतील तरुण-तरुणी‎विनोदाच्या नावाखाली उथळ विनोद करतात, नंतर माफी‎मागतात आणि नैराश्यात बुडून जातात. जेव्हा घर, कुटुंब‎आणि समाज सोबत नसतो, तेव्हा सर्व न्यायनिवाडा त्या‎सोशल मीडियावर करावा लागतो, ज्याला फक्त इतरांच्या‎दुःखाची गंमत पाहण्यात रस असतो.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली‎नाही. जे शिक्षण मुलांना जीवनातील‎कर्तव्ये, संघर्ष किंवा प्रश्नांशी जोडू शकले‎असते, ते आता उरलेले नाही. मूल्यहीन‎पिढीतील मुले विनोदाच्या नावाखाली‎उथळ विनोद करत फिरत आहेत.‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *