
Babar Azam : विश्वचषकादरम्यान एक मोठी बातमी येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. २०२३च्या विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पाकिस्तानी मीडिया सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त आहे की, क्रिकेट बोर्ड आणि माजी क्रिकेटपटूंच्या वागणुकीमुळे निराश झालेला बाबर आझम भारतातून पाकिस्तानला परतल्यानंतर एकदिवसीय आणि टी२० संघाचा राजीनामा देऊ शकतात. पाकिस्तानचा संघ अजूनही विश्वचषक २०२३ मध्ये उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे, परंतु पात्र होण्याची शक्यता खूपच धूसर आहे.
विश्वचषक २०२३ मध्ये खराब कामगिरी
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची कामगिरी काही खास नव्हती, त्यामुळे हा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळेच बाबर आता कर्णधारपद सोडू शकतो. सूत्रांकडून अशीही बातमी समोर येत आहे की, कसोटी फॉरमॅटचे कर्णधारपद हे त्याच्याचकडे ठेवले जाऊ शकते. विश्वचषकात पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांत आठ गुण झाले आहेत. संघाचा शेवटचा साखळी सामना आज (११ नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी, संघाला मोठा विजय नोंदवावा लागेल, कारण न्यूझीलंडची निव्वळ धावगती +०.७४३ आहे तर पाकिस्तानची +०.०३६ आहे.
|
Virat Kohli Century : किंग कोहलीने घडवला इतिहास! वाढदिवशीच सचिनच्या शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी |
पाकिस्तानी माध्यमांनुसार, बाबर आझमने त्याच्या जवळच्या लोकांशी आणि पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू रमीझ राजा यांच्याशी त्याच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा केली आहे. आपल्या जवळच्या लोकांशी सल्लामसलत केल्यानंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार होणार की नाही याचा निर्णय घेईल. मात्र, त्याच्या जवळच्या काही लोकांनी त्याला खेळाच्या तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्यास सांगितले आहे. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर तो माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर आहे.
बाबरने स्वतः ‘हे’ वक्तव्य केले आहे
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान संघाच्या शेवटच्या साखळी सामन्याआधी, जेव्हा बाबर आझमला त्याच्या कर्णधारपदाचा निर्णय कधी घेणार असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सूचक विधान केले. त्याने सांगितले की, “पाकिस्तानला परतल्यानंतर तो मी यावर योग्य निर्णय घेईन.” त्याने कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे होतेच पण २०२३चा विश्वचषक त्याच्या वैयक्तिक कामगिरीबाबतही फारसा काही खास नव्हता. त्याने आठ सामन्यात केवळ २८२ धावा केल्या आहेत. येत्या काही दिवसात बाबर पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहणार की नाही हे लवकरच कळेल.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




