अमरावती शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या रवीनगर चौकात एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीने हत्येनंतर कुटुंबीयांना फोन करून आपण मुलीवर चाकूने वार केल्याची माहिती स्वतः दिल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी वेगाने सूत्रे हलवत आरोपीला गोंदिया रेल्वेस्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले आणि अमरावतीत आणले.
नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएस्सी प्रथम वर्षाला शिकणारी अल्पवयीन विद्यार्थուी गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन महाविद्यालयात जात होती. रवीनगर परिसरातील एका नाल्याजवळ येताच आरोपी आनंद नंदकिशोर भड (वय २२, रा. पोही, ता. मूर्तिजापूर) याने तिला अडवले. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या वादानंतर आरोपीने सोबत आणलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने मुलीवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
हत्येमागचे कारण आणि पोलिसांची कारवाई: पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी आनंद भड आणि मृत अल्पवयीन मुलगी यांची मागील दोन वर्षांपासून ओळख होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून त्या मुलीने आनंदचे फोन उचलणे आणि त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. आपण संपर्क साधत असतानाही ती प्रतिसाद देत नसल्याच्या रागातून आरोपीच्या मनात तिच्याविषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. याच रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली संशयिताने दिली आहे.
गीतांजली एक्स्प्रेसने केला पसार होण्याचा प्रयत्न: अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर संशयित आनंद भड याने रक्ताच्या थारोळ्यात तिला सोडले आणि तब्बल तासभर आपली दुचाकी घेऊन शहरात विविध भागात फिरत राहिला. त्यानंतर त्याने आपली दुचाकी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात लावली आणि दुपारी सुटका करून घेण्यासाठी थेट गीतांजली एक्सप्रेस ट्रेन पकडली. तो नागपूर मार्गे गोंदियाच्या दिशेने पसार झाला. राजापेठ पोलिसांचे एक पथक सुरुवातीला त्याच्या शोधासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावात गेले होते, परंतु तो तिथे सापडला नाही. दरम्यान, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचे मोबाइल लोकेशन ट्रॅक केले असता तो गोंदियात असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पावले उचलत राजापेठ पोलिसांचे पथक गोंदिया रेल्वेस्थानकावर धडकले आणि गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याला शिताफीने बेड्या ठोकल्या. उशिरा रात्री त्याला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.
शहर
- नागपूर: आठ रुपयांत मुलांना खाऊ कसा घालणार? महिला बचत गटांची ८ महिन्यांची बिले रखडल्यामुळे नागपूरसह राज्यभरात आर्थिक संकट!
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
महाराष्ट्र
- नागपूर: आठ रुपयांत मुलांना खाऊ कसा घालणार? महिला बचत गटांची ८ महिन्यांची बिले रखडल्यामुळे नागपूरसह राज्यभरात आर्थिक संकट!
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




