विमान अपघातावरूनरोहित पवार यांनी केले होते गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. 28 जानेवारीला त्यांचं विमान बारामतीजवळ कोसळलं आणि त्यात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र हाँ अपघात नसून तो घातपात असल्याची शंका गेल्या काही दिवसांपासून बोलून दाखवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, अजित पवार यांचे पुतळे रोहित पवार यांनी काही पत्रकार परिषदा घेऊन या अपघाताबद्दल शंका व्यक्त केल्या. तर काल त्यांनी मुंबईत आणखी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये त्यांनी व्हीएसआर कंपनीबद्दल अनेक दावे करत या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप केला.
सत्ताधाऱ्यांकडून कंपनी वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही रोहित पवार यांनी लावला. मात्र त्यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ माजली असून रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडून स्पष्टीकरण समोर आलं आहे. मंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी रोहित पवार यांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात, अजित पवार यांचा मृत्यू झाला, मात्र तेलुगू देसम पक्ष (TDP) किंवा मंत्र्यांचा व्हीएसआर या विमान कंपनीशी कोणताही संबंध नाही असे त्यांनी सांगितले, अशी माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा, रोहित पवारांची मागणी
काल, बुधवारी सकाळी रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत मंत्री नायडू यांचं उघडपणे नाव न घेता, त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट विमान अपघाताशी संबंधित VSR कंपनीला संरक्षण देण्यासाठी, वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मंत्री नायडू आणि काही वरिष्ठ टीडीपी नेत्यांचे, VSR कंपनीच्या मालकांशी जवळचे संबंध आहेत असा दावा करत रोहित पवार यांनी केला. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या (त्या) मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, या पदावरून त्यांना दूर करा, त्यांना या पदावरून काढण्यात यावं अशी मागणीही रोहित पवारांनी केली.
28 जानेवारी रोजी अजित पवारा हे काही संभासाठी मुंबईबून बारामतील जात होते, तेव्हा त्याचं विमान कोसळून अपघात झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. रोहित पवार यांनी दावा केला की अपघातामागे राजकीय कारणे असू शकतात, मात्र याला अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही.
मंत्र्यांनी फेटाळले दावे
मात्र रोहित पवारांचे हे दावे, आरोप हे, मंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना, नागरी उड्डाण मंत्री आणि मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांच्या जवळच्या सूत्रांनी हे आरोप निराधार असल्याचं सांगितलं. टीडीपी किंवा मंत्री राममोहन नायडू यांचा व्हीएसआर कंपनीशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विमान अपघाताची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे. सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत आणि कोणालाही संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी नमूद केलं.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




