
Ajit Pawar on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे.
सोलापुरातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यानिमित्त शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अजित पवारांनी संबोधित केलं. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं.
|
|
अजित पवार म्हणाले, 'प्रत्येक समाजाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी उपोषण करू शकतात. सभा घेऊ शकतात. आंदोलन करू शकतात. पृथ्वीराज चव्हाण सरकारने दिलेलं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही'.
'राज्यात ६२ टक्के आरक्षण आहे. ५२ टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे. तर १० टक्के आर्थिक निकषांवर आरक्षण आहे. मनोज जरांगे याचं म्हणणं आहे की, 'मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या'. ओबीसीमध्ये सध्या ३५० जाती आहेत. मी मराठा समजाचा आहे, दुसऱ्या समाजाचा नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.
'आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ३५ कोटी होतो. आता १४० कोटी झालो. त्यात कोणी थांबायलाच तयार नाही. त्यात देवाची कृपा नसते. आपलीच सगळी कृपा असते. आमची मराठा आरक्षणासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. आरक्षण दिलं तर टिकलं पाहीजे. सत्ताधारी म्हणून ती आमची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
'आताच्या आरक्षणाला धक्का न लावता नवीन आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आम्ही सकारात्मक आहोत. आरक्षण कोर्टात टिकलं पाहीजे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहीजे. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहीजेत, असे ते म्हणाले.
शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 'बहुजन आणि वंचित समाजाला मदत करण्याकरिता आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारानेच पुढे चाललो आहोत. त्यात कुठलीही तडजोड केलेली नाही, असे अजित पवारांनी सांगितले.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड



























Subscribe to my channel




