अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी विलीनीकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Ajit Pawar Sharad Pawar NCP Merge: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकामधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दावा केला आहे की,विलीनीकरण नंतर आम्ही पक्षाच सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो. पण दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांच स्वप्न पूर्ण करायचं त्यासाठी प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विलनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असा अध्यक्षीय लेख शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिक मधे लिहला आहे.
शशिकांत शिंदे यांच्या भावना काय?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभर मोठा विस्तार करण्यात व पक्षाला खंबीर नेतृत्व देण्यात अजितदादा पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. दादांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, दुःखी झाला. राज्याच्या विकासाचा ध्यास असणारा नेता गेला. शरद पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजकारणाचे आणि सामाजिक कार्याचे धडे घेतलेल्या अजितदादांच्या अकाली निधनामुळे पवार कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे २९ जानेवारी रोजी त्यांच्या अंत्यविधी वेळा संपूर्ण महाराष्ट्र ओक्साबोक्सी रडला, अशी शशिकांत शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
अदृश्य शक्तीच्या कारवाया ,धमक्या व खोट्यानाट्या षडंयत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. पण झालेली चूक आता दुरुस्त करायची या विचाराने दादा गेल्या चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असा निर्धार करुन ते जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करत होते. त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती. ते स्वतः हिरारीने प्रचाराची धूरा सांभाळत होते. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असे शशिकांत शिंदे यांनी या लेखात म्हटले आहे.
शरद पवार गटाकडून वारंवार दावा
दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाविषयी शरद पवार गटाकडून वारंवार दावा करण्यात येत आहे. याविषयी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. बैठक झाली. तर या १२ फेब्रुवारी रोजी याविषयीची घोषणा अजितदादा करणार होते, असे जयंत पाटील यांनी माहिती दिली होती.शरद पवार यांनी सुद्धा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान अजितदादांच्या गोटातील नेत्यांनी मात्र याविषयी कानावर हात ठेवले आहे.
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य

























Subscribe to my channel




