
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात भर दिवसा २० जणांचे टोळक्याने तीन जणांना बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर किराणा मालाचे दुकान पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली होती. त्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यानंतर थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण करून त्याला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पकडले नाही, तोच पुन्हा आज अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या निंबळक परिसरात २० जणांच्या टोळक्याने एक किराणा मालाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात नेमकं चाललय काय? कायदा सुव्यवस्था कोणाच्या भरोशावर आहे असा प्रश्न समोर येत आहे.
|
|
टोळक्याची हिंमत वाढली
निंबळक बायपास चौकात संदीप कोतकर, विलास कोतकर, राजू कोतकर, दत्तु कोतकर यांच्यावर अनोळखी टोळीकडून अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्यात तीनही बंधू जखमी झाले असून टोळक्याची हिम्मत एवढी की त्यांनी कोतकर यांचे किराणा दुकान जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला आहे. सदरची घटना ज्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली त्या पोलीस स्टेशन कारभाराबद्दल नुकतेच परिसरातील उद्योजकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून एमआयडीसीमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
आमदार संग्राम जगताप यांनीही याबाबत आवाज उठवला, तरीही एमआयडीसी पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे भर दिवसा टोळक्याने येऊन अमानुष हल्ला करत तीन जणांना गंभीर जखमी केले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

