जळगाव: चार चिमुरड्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

Accused Sentenced to Death for the Brutal Murder of Four Siblings in Jalgaon's Borkheda
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात १५ ऑक्टोबर २०२० रोजी एक भयंकर हत्याकांड घडले होते. मुस्तफा शेख यांच्या शेतात सालदार म्हणून काम करणारे महताब आणि रुमाल बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मुलांसह राहत होते. १५ ऑक्टोबर २०२० रोजी हे दाम्पत्य आपल्या मूळ गावी (मध्य प्रदेशात) गेले असताना, मागे घरात मुले एकटीच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतमालकाला भिलाला कुटुंबातील चार मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

मृतांमध्ये सईता (१४), रावल (११), अनिल (८) आणि सुमन (३) या भावंडांचा समावेश होता. आरोपीने या चारही मुलांची कुऱ्हाडीने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करून १९ वर्षांच्या महेंद्र सीताराम बारेला याला अटक केली होती. भुसावळ सत्र न्यायालयात हा खटला चालला, ज्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.

या खटल्यात एकूण २७ साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्यांच्या आधारे, न्यायाधीश यादव यांनी आरोपी महेंद्र बारेला याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, भुसावळ सत्र न्यायालयाच्या १२ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *