पुणे: जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि इस्रायल-इराण वादाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अशातच राज्यात ऐन शेतीच्या कामांच्या हंगामात डिझेलची मागणी वाढली असताना, अनेक जिल्ह्यांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, पेट्रोल पंपांवरून होणाऱ्या डिझेलच्या घाऊक (Wholesale) खरेदीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.
नेमकी टंचाई का निर्माण झाली? प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्या आणि उद्योगांना मोठ्या प्रमाणावर डिझेलची गरज भासते. या कंपन्यांनी थेट तेल कंपन्यांकडून घाऊक पद्धतीने खरेदी करणे अपेक्षित असते. मात्र, तेल कंपन्यांकडून घाऊक खरेदीचा दर हा किरकोळ (Retail) विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपांच्या दरापेक्षा जास्त आहे. हा आर्थिक तोटा वाचवण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी थेट तेल कंपन्यांकडून खरेदी न करता, शहरातील आणि ग्रामीण भागातील किरकोळ पेट्रोल पंपांवरून डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा वेगाने संपत असून सामान्य वाहनचालक आणि ट्रॅक्टरचलित कामांसाठी डिझेल लागणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
तहसीलदारांना चौकशीचे आदेश राज्य सरकारच्या निर्देशानंतर पुणे जिल्हा पुरवठा विभागाने सर्व तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील पेट्रोल पंपांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तेल कंपन्यांकडून घाऊक खरेदीदार कंपन्यांची यादी मागवून, त्यांनी गेल्या दोन महिन्यांत कोणत्या किरकोळ पंपांवरून मोठ्या प्रमाणावर डिझेलची उचल केली, याची सखोल चौकशी केली जात आहे.
कारवाईबाबत का आहे संभ्रम? तपास सुरू झाला असला, तरी दोषींवर किंवा अवाजवी खरेदी करणाऱ्यांवर काय कारवाई करावी, याबाबत प्रशासकीय पातळीवर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, तेल कंपन्यांनी किरकोळ पेट्रोल पंपांवर विक्रीचे कोणतेही कडक निकष किंवा मर्यादा निश्चित करून दिलेल्या नाहीत. केवळ घाऊक खरेदीदारांनी २०० लिटरच्या टाकीतच डिझेलची वाहतूक करावी, अशी एक ढोबळ अट आहे. कंपन्यांनी किरकोळ पंपावरून खरेदी करू नये असा थेट नियम नसल्याने, पंपचालकही स्वतःच्या फायद्यासाठी या कंपन्यांना किरकोळ दरात डिझेल विकत आहेत.
या तपासणीनंतर नेमकी कायदेशीर कारवाई कशी करायची, असा प्रश्न आता तहसीलदारांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता तेल कंपन्यांना तात्काळ पेट्रोल पंपांसाठी एक विहित कार्यपद्धती (Standard Operating Procedure) आणि विक्रीचे निकष ठरवून देण्याची सूचना केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा अवाजवी खरेदीवर अंकुश ठेवता येईल.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



