सातारा: पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर अखेर साताऱ्यातील त्या अभागी मातेचा वृद्धाश्रमात निवारा; मन हेलावून टाकणारी घटना

सातारा : खोली भाडे भरता येईना म्हणून वृद्ध आईला सोडून गेलेल्या दोन्ही मुलांच्या पश्चात त्या अभागी मातेचे प्रचंड हाल होत होते. सत्त्वशीलनगरमधील एका मंदिरात या मातेने आसरा घेतला होता. अनेकांकडून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. पण धाकटा मुलगा आल्याशिवाय मी मंदिरातून हालणार नाही, अशी भूमिका घेतलेली ही अभागी माता अखेर मुलांची वाट पाहून बुधवारी वृद्धाश्रमात डोळ्यातून अश्रू ढाळत पोहोचली.

रुक्मिणी सदाशिव भस्मे (वय ६५, सध्या रा. सत्त्वशीलनगर, सातारा, मूळ रा. मुरुड, ता. पाटण) असे अभागी मातेचे नाव आहे. या मातेची विदारक कहाणी 'लोकमत'ने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी समाजासमोर आणली होती. त्यानंतर या अभागी मातेला मदत करण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शविल्याचे फोन 'लोकमत' कार्यालयात येऊ लागले होते. बुधवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील नंदकुमार रघुनाथ जोशी हे ६७ वर्षीय गृहस्थाने तिला आर्थिक मदतही केली.

वृद्धाश्रमात त्यांनी आश्रय घ्यावा यासाठी अनेकजण त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करत होते. परंतु धाकटा मुलगा रणजित (वय २८) याला भेटण्यासाठी ती आतुर झाली होती. तो जिथे कुठे असेल, तिथे मला घेऊन चला, मी वृद्धाश्रमात राहावे की काय करावे, हे मला त्याने सांगावे. त्यानंतरच आश्रमात जाईन, असे त्या म्हणत होत्या. अखेर प्रशासनाने यात दखल घेतली आणि त्यांना वृद्धाश्रमात भरती केले.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *