भारतासोबत पाकिस्तानच्या युद्धांचा इतिहास कसा राहिलाआहे? सामरिकदृष्ट्या ठीक, पण रणनीतिकदृष्ट्या नुकसानदायी. त्यामुळेच पूर्ण शक्तीने सुरुवात करूनही तोप्रत्येक युद्ध हरतो. मात्र 1971 आणि कारगिल युद्ध वगळतापाकिस्तानने बहुतांश युद्धांत विजयाचा दावा केला आहे. गतवर्षी झालेल्या 87 तासांच्या चकमकीकडेच पाहा.मुनीरपासून पाकिस्तानच्या राजकारणातीलतळागाळापर्यंत सर्वांनाच वाटते की यावेळी विजयत्यांचाच झाला. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानलाजवळ केले. त्यालाच त्यांच्या स्वयंघोषित ‘विजया’लामान्यता मानले. प्रत्यक्षात मात्र पहलगाम हत्याकांडाच्याफक्त चार दिवस आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुमारेदोन आठवडे आधी स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा जॅकयाचा दौरा आणि क्रिप्टो करार पूर्ण झाला होता. भारतपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे मुनीर यांना माहितीहोते. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या लोभाचा फायदा घेण्याचीचाल त्यांनी आधीच आखली होती. जगातील अनेकलोकांपेक्षा आधी ही बाब समजून घेतल्याबद्दल मुनीर यांचेकौतुक करता येईल किंवा कदाचित सौदी अरेबियानेत्यांना आधीच सावध केले असेल. लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘सिस्टम’लाआपल्या बाजूने वळवले होते. 16 एप्रिल 2025 रोजीपरदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींना दिलेल्या त्यांच्याभाषणातून त्याचे संकेत मिळाले होते. ते हत्याकांडभारताची प्रतिक्रिया पाहण्याच्या त्यांच्या योजनेचाच भागहोता. ट्रम्प यांना आपल्या बाजूने करून काश्मीर मुद्दा पुढेआणणे, हे त्यांचे रणनीतिक उद्दिष्ट होते. पहिली चालयशस्वी झाली. पण दुसरी पूर्णपणे अपयशी ठरली. भारत लष्करी कारवाई करेल, हे माहीत असूनच पाकिस्तानने भारताला चिथावणी दिली होती. त्यामुळे कोणत्याठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याचाही त्यांना अंदाजअसावा. भारत कोणती शस्त्रे वापरेल, हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे 7 मे रोजी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनीभारतीय वायुदलाने उड्डाण केले, तेव्हा पाकिस्तान सज्जहोता. आतील भागांतील लक्ष्यांवरील हल्ले ते रोखू शकले नाहीत. पण तो त्यांचा उद्देशही नव्हता. ते प्रत्युत्तर केवळहवाई संघर्षापुरते मर्यादित ठेवू इच्छित होते. एईडब्ल्यूविमाने आणि जे-10सी, जेएफ-17सह पीएल-15 क्षेपणास्त्रांच्या मदतीने या कारवाईचा आधीच सरावकरण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशहीमिळाले आणि त्याचाच ते उत्सव साजरा करत आहेत. भारतामध्ये उच्च पातळीवर काही विमानांच्या नुकसानीची बाब मान्य करण्यात आली आहे. माजी सीडीएस यांनीत्याला ‘सामरिक चूक’ म्हटले, पण भारतीय हवाई दलाने हिशेब चुकता करण्याची योजना आखली. सर्वप्रथम पाकिस्तानच्या हवाई दलावर दबाव आणण्यासाठी अँटी-रेडिएशन ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. त्यानंतर पीएएफच्या सर्वाधिक सुरक्षित हवाई तळांवर सलग हवाई हल्ले झाले. पीएएफ प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली. तेव्हा फक्त एकाबाजूकडेच दुसऱ्या बाजूचे नुकसान किती झाले, याचेपुरावे होते. व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांतूनपीएएफचे किमान 13 हवाई तळ आणि 3 रडार उद्ध्वस्तझाल्याचे दिसत होते. तरीही पाकिस्तान विजयाचा जल्लोषकरत आहे. एका भारतीय कमांडरने म्हटले की, हे अगदीहॉकी सामन्यासारखे होते. भारताने पाकिस्तानला 3-1 नेहरवले. पण त्यांचा सेंटर फॉरवर्ड एक गोल करण्यातयशस्वी झाला आणि आपल्या खेळाडूंनी तीन पेनल्टीचेगोलमध्ये रूपांतर केले. भारताला नुकसानपोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा कोणताही पुरावानाही. भारतातील सर्व हवाई तळांच्या आसपास शहरेआहेत. काहीही लपलेले नाही, तरी कोणतीही उपग्रहछायाचित्रे समोर आलेली नाहीत. पाकिस्तानचे सर्व दावेनिरर्थक आहेत. मात्र, येथे मी अलीकडचा इतिहास पुन्हासांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मुख्य मुद्द्यावरभर देत आहे. तो म्हणजे पाकिस्तानी लष्करी विचारसरणीचांगला विचार करते, पण केवळ सामरिक डावपेचांच्यापातळीवर. भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, याचा अंदाजती बांधू शकत नाही. ही अंतर्गत कमजोरी, भारतीयलष्कराबद्दलचा अनादर किंवा दोन्हींचा मिलाफ असूशकतो. हा विचार आपल्याला पाकिस्तानी लेखक शुजानवाज यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातूनही मिळतो. कारगिल युद्धाबाबत त्यांनी लिहिले आहे की, भारताविरुद्ध‘वॉर गेम’ खेळणाऱ्या पाकिस्तानी पथकाने वाजपेयीसरकार कसे प्रत्युत्तर देईल, याचा अचूक अंदाज बांधलाहोता. तो गंभीरतेने घेतला असता तर पाकिस्तान पराभव,माघार आणि अपमान टाळू शकला असता. मात्र, त्याचीखिल्ली उडवण्यात आली. सामरिकदृष्ट्या कारगिल युद्धअत्यंत प्रभावी होते. भारताने प्रतिकार केला तर कायहोईल, याचा कोणी विचारच केला नाही. त्यासाठीरणनीतिक विचार गरजेचा असतो. पाकिस्तानमध्ये त्याचीकमतरता आहे. कारगिल रणनीतिक पराभव ठरला. कारणत्यामुळे नियंत्रण रेषेची जागतिक मान्यता अधिक मजबूतझाली. इस्लामाबाद विमानतळावर थोडा वेळ थांबून बिलक्लिंटन यांनी पाकिस्तानला कॅमेऱ्यासमोर सांगितले होतेकी, या उपखंडाच्या नकाशावरील सीमा आता रक्तसांडून बदलता येणार नाहीत. ही कथा यापूर्वीच्या युद्धांतहीदिसून आली. 1965 मध्ये छंब ताब्यात घेण्यासाठीऑपरेशन जिब्राल्टर आणि त्यानंतर अखनूर ताब्यातघेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम राबवण्यात आले.जेणेकरून काश्मीर भारतापासून वेगळे करता येईल. पाकिस्तानी लष्कराने गृहित धरले होते की, भारत काश्मीरसोडून देईल. भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराचा त्यांनी योग्यविचारच केला नाही. त्याच युद्धात खेमकरण येथेरणगाड्यांद्वारे करण्यात आलेला अनपेक्षित हल्लाउपखंडातील सर्वांत धाडसी हल्ल्यांपैकी एक मानलाजातो. त्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई म्हणजेपाकिस्तानचा पराभव आणि त्याच्या सर्वोत्तमरणगाड्यांचा नाश. त्या युद्धातही पाकिस्तानने विजयाचादावा केला होता. दुर्देव हे आहे की पाक 6 सप्टेंबरला‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून साजरा करतो! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासाचा धडा आहे...ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने चुकीचाधडा घेतला आहे. अशा परिस्थितीतपाकिस्तान पुढे कोणती चिथावणीखोरकारवाई करू शकतो, याचा अंदाजआधीच घ्यावा लागेल. इतिहास सांगतोकी, पाकिस्तानी सत्ता सर्वात वाईटस्थितीत पोहोचते तेव्हा ती स्वतःचेचनुकसान करणारे रणनीतिक निर्णय घेते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel




