भारतासोबत पाकिस्तानच्या युद्धांचा इतिहास कसा राहिलाआहे? सामरिकदृष्ट्या ठीक, पण रणनीतिकदृष्ट्या नुकसानदायी. त्यामुळेच पूर्ण शक्तीने सुरुवात करूनही तोप्रत्येक युद्ध हरतो. मात्र 1971 आणि कारगिल युद्ध वगळतापाकिस्तानने बहुतांश युद्धांत विजयाचा दावा केला आहे. गतवर्षी झालेल्या 87 तासांच्या चकमकीकडेच पाहा.मुनीरपासून पाकिस्तानच्या राजकारणातीलतळागाळापर्यंत सर्वांनाच वाटते की यावेळी विजयत्यांचाच झाला. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानलाजवळ केले. त्यालाच त्यांच्या स्वयंघोषित ‘विजया’लामान्यता मानले. प्रत्यक्षात मात्र पहलगाम हत्याकांडाच्याफक्त चार दिवस आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुमारेदोन आठवडे आधी स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा जॅकयाचा दौरा आणि क्रिप्टो करार पूर्ण झाला होता. भारतपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे मुनीर यांना माहितीहोते. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या लोभाचा फायदा घेण्याचीचाल त्यांनी आधीच आखली होती. जगातील अनेकलोकांपेक्षा आधी ही बाब समजून घेतल्याबद्दल मुनीर यांचेकौतुक करता येईल किंवा कदाचित सौदी अरेबियानेत्यांना आधीच सावध केले असेल. लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘सिस्टम’लाआपल्या बाजूने वळवले होते. 16 एप्रिल 2025 रोजीपरदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींना दिलेल्या त्यांच्याभाषणातून त्याचे संकेत मिळाले होते. ते हत्याकांडभारताची प्रतिक्रिया पाहण्याच्या त्यांच्या योजनेचाच भागहोता. ट्रम्प यांना आपल्या बाजूने करून काश्मीर मुद्दा पुढेआणणे, हे त्यांचे रणनीतिक उद्दिष्ट होते. पहिली चालयशस्वी झाली. पण दुसरी पूर्णपणे अपयशी ठरली. भारत लष्करी कारवाई करेल, हे माहीत असूनच पाकिस्तानने भारताला चिथावणी दिली होती. त्यामुळे कोणत्याठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याचाही त्यांना अंदाजअसावा. भारत कोणती शस्त्रे वापरेल, हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे 7 मे रोजी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनीभारतीय वायुदलाने उड्डाण केले, तेव्हा पाकिस्तान सज्जहोता. आतील भागांतील लक्ष्यांवरील हल्ले ते रोखू शकले नाहीत. पण तो त्यांचा उद्देशही नव्हता. ते प्रत्युत्तर केवळहवाई संघर्षापुरते मर्यादित ठेवू इच्छित होते. एईडब्ल्यूविमाने आणि जे-10सी, जेएफ-17सह पीएल-15 क्षेपणास्त्रांच्या मदतीने या कारवाईचा आधीच सरावकरण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशहीमिळाले आणि त्याचाच ते उत्सव साजरा करत आहेत. भारतामध्ये उच्च पातळीवर काही विमानांच्या नुकसानीची बाब मान्य करण्यात आली आहे. माजी सीडीएस यांनीत्याला ‘सामरिक चूक’ म्हटले, पण भारतीय हवाई दलाने हिशेब चुकता करण्याची योजना आखली. सर्वप्रथम पाकिस्तानच्या हवाई दलावर दबाव आणण्यासाठी अँटी-रेडिएशन ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. त्यानंतर पीएएफच्या सर्वाधिक सुरक्षित हवाई तळांवर सलग हवाई हल्ले झाले. पीएएफ प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली. तेव्हा फक्त एकाबाजूकडेच दुसऱ्या बाजूचे नुकसान किती झाले, याचेपुरावे होते. व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांतूनपीएएफचे किमान 13 हवाई तळ आणि 3 रडार उद्ध्वस्तझाल्याचे दिसत होते. तरीही पाकिस्तान विजयाचा जल्लोषकरत आहे. एका भारतीय कमांडरने म्हटले की, हे अगदीहॉकी सामन्यासारखे होते. भारताने पाकिस्तानला 3-1 नेहरवले. पण त्यांचा सेंटर फॉरवर्ड एक गोल करण्यातयशस्वी झाला आणि आपल्या खेळाडूंनी तीन पेनल्टीचेगोलमध्ये रूपांतर केले. भारताला नुकसानपोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा कोणताही पुरावानाही. भारतातील सर्व हवाई तळांच्या आसपास शहरेआहेत. काहीही लपलेले नाही, तरी कोणतीही उपग्रहछायाचित्रे समोर आलेली नाहीत. पाकिस्तानचे सर्व दावेनिरर्थक आहेत. मात्र, येथे मी अलीकडचा इतिहास पुन्हासांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मुख्य मुद्द्यावरभर देत आहे. तो म्हणजे पाकिस्तानी लष्करी विचारसरणीचांगला विचार करते, पण केवळ सामरिक डावपेचांच्यापातळीवर. भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, याचा अंदाजती बांधू शकत नाही. ही अंतर्गत कमजोरी, भारतीयलष्कराबद्दलचा अनादर किंवा दोन्हींचा मिलाफ असूशकतो. हा विचार आपल्याला पाकिस्तानी लेखक शुजानवाज यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातूनही मिळतो. कारगिल युद्धाबाबत त्यांनी लिहिले आहे की, भारताविरुद्ध‘वॉर गेम’ खेळणाऱ्या पाकिस्तानी पथकाने वाजपेयीसरकार कसे प्रत्युत्तर देईल, याचा अचूक अंदाज बांधलाहोता. तो गंभीरतेने घेतला असता तर पाकिस्तान पराभव,माघार आणि अपमान टाळू शकला असता. मात्र, त्याचीखिल्ली उडवण्यात आली. सामरिकदृष्ट्या कारगिल युद्धअत्यंत प्रभावी होते. भारताने प्रतिकार केला तर कायहोईल, याचा कोणी विचारच केला नाही. त्यासाठीरणनीतिक विचार गरजेचा असतो. पाकिस्तानमध्ये त्याचीकमतरता आहे. कारगिल रणनीतिक पराभव ठरला. कारणत्यामुळे नियंत्रण रेषेची जागतिक मान्यता अधिक मजबूतझाली. इस्लामाबाद विमानतळावर थोडा वेळ थांबून बिलक्लिंटन यांनी पाकिस्तानला कॅमेऱ्यासमोर सांगितले होतेकी, या उपखंडाच्या नकाशावरील सीमा आता रक्तसांडून बदलता येणार नाहीत. ही कथा यापूर्वीच्या युद्धांतहीदिसून आली. 1965 मध्ये छंब ताब्यात घेण्यासाठीऑपरेशन जिब्राल्टर आणि त्यानंतर अखनूर ताब्यातघेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम राबवण्यात आले.जेणेकरून काश्मीर भारतापासून वेगळे करता येईल. पाकिस्तानी लष्कराने गृहित धरले होते की, भारत काश्मीरसोडून देईल. भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराचा त्यांनी योग्यविचारच केला नाही. त्याच युद्धात खेमकरण येथेरणगाड्यांद्वारे करण्यात आलेला अनपेक्षित हल्लाउपखंडातील सर्वांत धाडसी हल्ल्यांपैकी एक मानलाजातो. त्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई म्हणजेपाकिस्तानचा पराभव आणि त्याच्या सर्वोत्तमरणगाड्यांचा नाश. त्या युद्धातही पाकिस्तानने विजयाचादावा केला होता. दुर्देव हे आहे की पाक 6 सप्टेंबरला‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून साजरा करतो! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासाचा धडा आहे...ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने चुकीचाधडा घेतला आहे. अशा परिस्थितीतपाकिस्तान पुढे कोणती चिथावणीखोरकारवाई करू शकतो, याचा अंदाजआधीच घ्यावा लागेल. इतिहास सांगतोकी, पाकिस्तानी सत्ता सर्वात वाईटस्थितीत पोहोचते तेव्हा ती स्वतःचेचनुकसान करणारे रणनीतिक निर्णय घेते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!



























Subscribe to my channel
