शेखर गुप्ता यांचा कॉलम:पाकची नियतीच भ्रमात राहण्याची झालीये‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारतासोबत पाकिस्तानच्या युद्धांचा इतिहास कसा राहिला‎आहे? सामरिकदृष्ट्या ठीक, पण रणनीतिकदृष्ट्या‎ नुकसानदायी. त्यामुळेच पूर्ण शक्तीने सुरुवात करूनही तो‎प्रत्येक युद्ध हरतो. मात्र 1971 आणि कारगिल युद्ध वगळता‎पाकिस्तानने बहुतांश युद्धांत विजयाचा दावा केला आहे.‎ गतवर्षी झालेल्या 87 तासांच्या चकमकीकडेच पाहा.‎मुनीरपासून पाकिस्तानच्या राजकारणातील‎तळागाळापर्यंत सर्वांनाच वाटते की यावेळी विजय‎त्यांचाच झाला. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानला‎जवळ केले. त्यालाच त्यांच्या स्वयंघोषित ‘विजया’ला‎मान्यता मानले. प्रत्यक्षात मात्र पहलगाम हत्याकांडाच्या‎फक्त चार दिवस आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुमारे‎दोन आठवडे आधी स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा जॅक‎याचा दौरा आणि क्रिप्टो करार पूर्ण झाला होता. भारत‎पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे मुनीर यांना माहिती‎होते. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या लोभाचा फायदा घेण्याची‎चाल त्यांनी आधीच आखली होती. जगातील अनेक‎लोकांपेक्षा आधी ही बाब समजून घेतल्याबद्दल मुनीर यांचे‎कौतुक करता येईल किंवा कदाचित सौदी अरेबियाने‎त्यांना आधीच सावध केले असेल.‎ लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘सिस्टम’ला‎आपल्या बाजूने वळवले होते. 16 एप्रिल 2025 रोजी‎परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींना दिलेल्या त्यांच्या‎भाषणातून त्याचे संकेत मिळाले होते. ते हत्याकांड‎भारताची प्रतिक्रिया पाहण्याच्या त्यांच्या योजनेचाच भाग‎होता. ट्रम्प यांना आपल्या बाजूने करून काश्मीर मुद्दा पुढे‎आणणे, हे त्यांचे रणनीतिक उद्दिष्ट होते. पहिली चाल‎यशस्वी झाली. पण दुसरी पूर्णपणे अपयशी ठरली. भारत ‎‎लष्करी कारवाई करेल, हे माहीत असूनच पाकिस्तानने ‎‎भारताला चिथावणी दिली होती. त्यामुळे कोणत्या‎ठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याचाही त्यांना अंदाज‎असावा. भारत कोणती शस्त्रे वापरेल, हेही त्यांना ठाऊक ‎‎होते. त्यामुळे 7 मे रोजी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी‎भारतीय वायुदलाने उड्डाण केले, तेव्हा पाकिस्तान सज्ज‎होता. आतील भागांतील लक्ष्यांवरील हल्ले ते रोखू शकले ‎‎नाहीत. पण तो त्यांचा उद्देशही नव्हता. ते प्रत्युत्तर केवळ‎हवाई संघर्षापुरते मर्यादित ठेवू इच्छित होते. एईडब्ल्यू‎विमाने आणि जे-10सी, जेएफ-17सह पीएल-15 ‎‎क्षेपणास्त्रांच्या मदतीने या कारवाईचा आधीच सराव‎करण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशही‎मिळाले आणि त्याचाच ते उत्सव साजरा करत आहेत. ‎‎भारतामध्ये उच्च पातळीवर काही विमानांच्या नुकसानीची ‎‎बाब मान्य करण्यात आली आहे. माजी सीडीएस यांनी‎त्याला ‘सामरिक चूक’ म्हटले, पण भारतीय हवाई दलाने ‎‎हिशेब चुकता करण्याची योजना आखली. सर्वप्रथम ‎‎पाकिस्तानच्या हवाई दलावर दबाव आणण्यासाठी ‎‎अँटी-रेडिएशन ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. त्यानंतर ‎‎पीएएफच्या सर्वाधिक सुरक्षित हवाई तळांवर सलग हवाई ‎‎हल्ले झाले. पीएएफ प्रत्युत्तर देऊ शकले नाही.‎ पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली. तेव्हा फक्त एका‎बाजूकडेच दुसऱ्या बाजूचे नुकसान किती झाले, याचे‎पुरावे होते. व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांतून‎पीएएफचे किमान 13 हवाई तळ आणि 3 रडार उद्ध्वस्त‎झाल्याचे दिसत होते. तरीही पाकिस्तान विजयाचा जल्लोष‎करत आहे. एका भारतीय कमांडरने म्हटले की, हे अगदी‎हॉकी सामन्यासारखे होते. भारताने पाकिस्तानला 3-1 ने‎हरवले. पण त्यांचा सेंटर फॉरवर्ड एक गोल करण्यात‎यशस्वी झाला आणि आपल्या खेळाडूंनी तीन पेनल्टीचे‎गोलमध्ये रूपांतर केले. भारताला नुकसान‎पोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा कोणताही पुरावा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎नाही. भारतातील सर्व हवाई तळांच्या आसपास शहरे‎आहेत. काहीही लपलेले नाही, तरी कोणतीही उपग्रह‎छायाचित्रे समोर आलेली नाहीत. पाकिस्तानचे सर्व दावे‎निरर्थक आहेत. मात्र, येथे मी अलीकडचा इतिहास पुन्हा‎सांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मुख्य मुद्द्यावर‎भर देत आहे. तो म्हणजे पाकिस्तानी लष्करी विचारसरणी‎चांगला विचार करते, पण केवळ सामरिक डावपेचांच्या‎पातळीवर. भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, याचा अंदाज‎ती बांधू शकत नाही. ही अंतर्गत कमजोरी, भारतीय‎लष्कराबद्दलचा अनादर किंवा दोन्हींचा मिलाफ असू‎शकतो. हा विचार आपल्याला पाकिस्तानी लेखक शुजा‎नवाज यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातूनही मिळतो.‎ कारगिल युद्धाबाबत त्यांनी लिहिले आहे की, भारताविरुद्ध‎‘वॉर गेम’ खेळणाऱ्या पाकिस्तानी पथकाने वाजपेयी‎सरकार कसे प्रत्युत्तर देईल, याचा अचूक अंदाज बांधला‎होता. तो गंभीरतेने घेतला असता तर पाकिस्तान पराभव,‎माघार आणि अपमान टाळू शकला असता. मात्र, त्याची‎खिल्ली उडवण्यात आली. सामरिकदृष्ट्या कारगिल युद्ध‎अत्यंत प्रभावी होते. भारताने प्रतिकार केला तर काय‎होईल, याचा कोणी विचारच केला नाही. त्यासाठी‎रणनीतिक विचार गरजेचा असतो. पाकिस्तानमध्ये त्याची‎कमतरता आहे. कारगिल रणनीतिक पराभव ठरला. कारण‎त्यामुळे नियंत्रण रेषेची जागतिक मान्यता अधिक मजबूत‎झाली. इस्लामाबाद विमानतळावर थोडा वेळ थांबून बिल‎क्लिंटन यांनी पाकिस्तानला कॅमेऱ्यासमोर सांगितले होते‎की, या उपखंडाच्या नकाशावरील सीमा आता रक्त‎सांडून बदलता येणार नाहीत. ही कथा यापूर्वीच्या युद्धांतही‎दिसून आली. 1965 मध्ये छंब ताब्यात घेण्यासाठी‎ऑपरेशन जिब्राल्टर आणि त्यानंतर अखनूर ताब्यात‎घेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम राबवण्यात आले.‎जेणेकरून काश्मीर भारतापासून वेगळे करता येईल.‎ पाकिस्तानी लष्कराने गृहित धरले होते की, भारत काश्मीर‎सोडून देईल. भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराचा त्यांनी योग्य‎विचारच केला नाही. त्याच युद्धात खेमकरण येथे‎रणगाड्यांद्वारे करण्यात आलेला अनपेक्षित हल्ला‎उपखंडातील सर्वांत धाडसी हल्ल्यांपैकी एक मानला‎जातो. त्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई म्हणजे‎पाकिस्तानचा पराभव आणि त्याच्या सर्वोत्तम‎रणगाड्यांचा नाश. त्या युद्धातही पाकिस्तानने विजयाचा‎दावा केला होता. दुर्देव हे आहे की पाक 6 सप्टेंबरला‎‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून साजरा करतो!‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ इतिहासाचा धडा आहे...‎ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने चुकीचा‎धडा घेतला आहे. अशा परिस्थितीत‎पाकिस्तान पुढे कोणती चिथावणीखोर‎कारवाई करू शकतो, याचा अंदाज‎आधीच घ्यावा लागेल. इतिहास सांगतो‎की, पाकिस्तानी सत्ता सर्वात वाईट‎स्थितीत पोहोचते तेव्हा ती स्वतःचेच‎नुकसान करणारे रणनीतिक निर्णय घेते.‎

This post was originally published on this site.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *