सायंकाळ होताच भारतात बसस्टॉपवर उभी असलेलीएखादी महिला बसच्या रूट नंबरकडे पाहण्यापूर्वी आकाशाकडे पाहते. कारण तिला पावसाची चिंता नसते,तर अंधार पडल्यानंतर महिलांसाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थबदलतात. रात्री बाहेर पडलेल्या पुरुषाकडे एक सामान्यप्रवासी म्हणून पाहिले जाते. पण सूर्यास्तानंतर एखादीमहिला बाहेर दिसली, तर प्रश्न उपस्थित होतात. कुठेचालली आहे? एकटी का आहे? तिची वाट कोण पाहतआहे? म्हणूनच बंगालमध्ये अलीकडेच सुरू झालेल्यामहिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजना महत्त्वाच्याआहेत. त्यांचे महत्त्व बसचे तिकीट महाग आहे म्हणूननाही, तर भारतात महिलांसाठी घराबाहेर पडणे हे केवळ प्रवासाची गरज नसून एक भावनिक विषय आहे. आणि पाहायला गेले तर केवळ 40 रुपयेही लाखो महिलांसाठी कर्ज आणि सन्मान यांतील फरक ठरू शकतात. एखादी महिला घराबाहेर फक्त कामासाठीच पडतनाही. ती आत्मनिर्भरतेकडे आणि नव्या शक्यतांकडेही जात असते. कोणाची परवानगी न घेता या जगातस्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या दिशेने ती पावलेटाकत असते. कदाचित ती शहरभर दोन बस बदलूनसंधिवाताने त्रस्त असलेल्या आईची काळजीघेण्यासाठी जात असेल. कदाचित लग्नानंतर सोडूनदिलेल्या अभ्यासक्रमात तिने पुन्हा प्रवेश घेतला असेल.किंवा अधिक पगाराच्या नोकरीसाठी ती प्रवास करतअसेल. किंवा एखाद्या अत्याचारी पतीपासून दूर काहीक्षण शांततेत घालवण्यासाठी ती बहिणीकडे जातअसेल. तसेच ऑफिसनंतर फक्त काही क्षण शांततेचाअनुभव घेण्यासाठी समुद्रकिनारी बसली असेल. कारणघरी परतल्यावर सिंकमध्ये भरलेली भांडी तिची वाटपाहतच असतात आणि तेच तिचे विनावेतन कामअसते. अनेक पुरुषांना ही बाब समजत नाही. कारणभारतात सार्वजनिक जागा नेहमीच पुरुषांच्यामालकीच्या असल्यासारख्या मानल्या गेल्या आहेत. हेसर्वत्र दिसते. पुरुष संपूर्ण फूटपाथवर वाहने उभीकरतात. महिला मुलांच्या प्रॅमसह चालतात तिथे हीमंडळी बाईक चालवतात. शहरांच्या भिंतींनाहीअनेकांनी स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयमानले आहे. रस्ते, रेल्वे स्थानके, पायऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये तेकसलाही संकोच न बाळगता थुंकताना दिसतात.सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र पुरुषांच्या उपस्थितीचे ठसेदिसतात- ठळक, निःसंकोच आणि कोणत्याहीप्रश्नांशिवाय. तर महिलांना स्वतःला मर्यादित ठेवण्याचे,डोळ्यात डोळे न घालण्याचे आणि अंधार होण्यापूर्वीघरी परतण्याचे शिकवले जाते. मुंबईसारखी काही शहरे वगळता- येथे सार्वजनिकठिकाणी महिलांची उपस्थिती तुलनेने सामान्य मानलीजाते- आजही भारतातील बहुतेक शहरे सायंकाळीसहा-सातनंतर महिलांविना रिकामी होऊ लागतात.विशेषतः त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास. रात्री एकटीमहिला दिसणे आजही असामान्य किंवा त्याहून वाईटम्हणजे एखाद्या निमंत्रणासारखे मानले जाते. म्हणूनच सरकार महिलांसाठी ‘पिंक तिकीट’ किंवामोफत बस प्रवासाच्या योजना सुरू करते, तेव्हा तीदानधर्माची बाब नसते. ती मोफत सुविधा नाही. तो एक छोटा, पण क्रांतिकारीसंदेश असतो की, महिलांनाही प्रवासाचा हक्क आहे.त्यांनाही शहरांमध्ये राहण्याचा आणि दिसण्याचाअधिकार आहे. मात्र, सुरक्षा केवळ तिकिटापुरतीमर्यादित असू शकत नाही. चांगल्या प्रकाशव्यवस्थेचेबसस्टॉप, सीसीटीव्ही, महिला वाहक, सुरक्षारक्षक,पॅनिक बटण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्हसंपर्क व्यवस्थाही आवश्यक आहे. कारण अनेकदाएखाद्या महिलेसाठी सर्वात धोकादायक प्रवास म्हणजेबसस्टॉपपासून एकटीने घरी जाणे हा देखील असूशकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) एखाद्या शहराची प्रगती त्या शहरातमहिला किती निर्भयपणे आणि मुक्तपणेफिरू शकतात, यावर अवलंबून असते.त्यामुळे अनेक महिलांसाठी मोफत बसप्रवासासारख्या योजना भावनिकजिव्हाळ्याच्या ठरतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- नाशिक: आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर भर द्या; राहुल गांधींच्या दीर्घकालीन बैठकीनंतर आंदोलक विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना!
- अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा आर्थिक घोटाळा; संशोधन संचालकांसह ७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला




























Subscribe to my channel




