मेघना पंत यांचा कॉलम:हिलांना मोफत बस तिकीट‎ ही चॅरिटी नव्हे, एक गरज …

‎‎‎‎‎‎‎‎‎‎सायंकाळ होताच भारतात बसस्टॉपवर उभी असलेली‎एखादी महिला बसच्या रूट नंबरकडे पाहण्यापूर्वी‎ आकाशाकडे पाहते. कारण तिला पावसाची चिंता नसते,‎तर अंधार पडल्यानंतर महिलांसाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थ‎बदलतात. रात्री बाहेर पडलेल्या पुरुषाकडे एक सामान्य‎प्रवासी म्हणून पाहिले जाते. पण सूर्यास्तानंतर एखादी‎महिला बाहेर दिसली, तर प्रश्न उपस्थित होतात. कुठे‎चालली आहे? एकटी का आहे? तिची वाट कोण पाहत‎आहे?‎ म्हणूनच बंगालमध्ये अलीकडेच सुरू झालेल्या‎महिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजना महत्त्वाच्या‎आहेत. त्यांचे महत्त्व बसचे तिकीट महाग आहे म्हणून‎नाही, तर भारतात महिलांसाठी घराबाहेर पडणे हे केवळ ‎‎प्रवासाची गरज नसून एक भावनिक विषय आहे. आणि ‎‎पाहायला गेले तर केवळ 40 रुपयेही लाखो महिलांसाठी ‎‎कर्ज आणि सन्मान यांतील फरक ठरू शकतात.‎ एखादी महिला घराबाहेर फक्त कामासाठीच पडत‎नाही. ती आत्मनिर्भरतेकडे आणि नव्या शक्यतांकडेही ‎जात असते. कोणाची परवानगी न घेता या जगात‎स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या दिशेने ती पावले‎टाकत असते. कदाचित ती शहरभर दोन बस बदलून‎संधिवाताने त्रस्त असलेल्या आईची काळजी‎घेण्यासाठी जात असेल. कदाचित लग्नानंतर सोडून‎दिलेल्या अभ्यासक्रमात तिने पुन्हा प्रवेश घेतला असेल.‎किंवा अधिक पगाराच्या नोकरीसाठी ती प्रवास करत‎असेल. किंवा एखाद्या अत्याचारी पतीपासून दूर काही‎क्षण शांततेत घालवण्यासाठी ती बहिणीकडे जात‎असेल. तसेच ऑफिसनंतर फक्त काही क्षण शांततेचा‎अनुभव घेण्यासाठी समुद्रकिनारी बसली असेल. कारण‎घरी परतल्यावर सिंकमध्ये भरलेली भांडी तिची वाट‎पाहतच असतात आणि तेच तिचे विनावेतन काम‎असते. अनेक पुरुषांना ही बाब समजत नाही. कारण‎भारतात सार्वजनिक जागा नेहमीच पुरुषांच्या‎मालकीच्या असल्यासारख्या मानल्या गेल्या आहेत. हे‎सर्वत्र दिसते. पुरुष संपूर्ण फूटपाथवर वाहने उभी‎करतात. महिला मुलांच्या प्रॅमसह चालतात तिथे ही‎मंडळी बाईक चालवतात. शहरांच्या भिंतींनाही‎अनेकांनी स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय‎मानले आहे.‎ रस्ते, रेल्वे स्थानके, पायऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये ते‎कसलाही संकोच न बाळगता थुंकताना दिसतात.‎सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र पुरुषांच्या उपस्थितीचे ठसे‎दिसतात- ठळक, निःसंकोच आणि कोणत्याही‎प्रश्नांशिवाय. तर महिलांना स्वतःला मर्यादित ठेवण्याचे,‎डोळ्यात डोळे न घालण्याचे आणि अंधार होण्यापूर्वी‎घरी परतण्याचे शिकवले जाते.‎ मुंबईसारखी काही शहरे वगळता- येथे सार्वजनिक‎ठिकाणी महिलांची उपस्थिती तुलनेने सामान्य मानली‎जाते- आजही भारतातील बहुतेक शहरे सायंकाळी‎सहा-सातनंतर महिलांविना रिकामी होऊ लागतात.‎विशेषतः त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास. रात्री एकटी‎महिला दिसणे आजही असामान्य किंवा त्याहून वाईट‎म्हणजे एखाद्या निमंत्रणासारखे मानले जाते.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎म्हणूनच सरकार महिलांसाठी ‘पिंक तिकीट’ किंवा‎मोफत बस प्रवासाच्या योजना सुरू करते, तेव्हा ती‎दानधर्माची बाब नसते.‎ ती मोफत सुविधा नाही. तो एक छोटा, पण क्रांतिकारी‎संदेश असतो की, महिलांनाही प्रवासाचा हक्क आहे.‎त्यांनाही शहरांमध्ये राहण्याचा आणि दिसण्याचा‎अधिकार आहे. मात्र, सुरक्षा केवळ तिकिटापुरती‎मर्यादित असू शकत नाही. चांगल्या प्रकाशव्यवस्थेचे‎बसस्टॉप, सीसीटीव्ही, महिला वाहक, सुरक्षारक्षक,‎पॅनिक बटण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्ह‎संपर्क व्यवस्थाही आवश्यक आहे. कारण अनेकदा‎एखाद्या महिलेसाठी सर्वात धोकादायक प्रवास म्हणजे‎बसस्टॉपपासून एकटीने घरी जाणे हा देखील असू‎शकतो.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )‎ एखाद्या शहराची प्रगती त्या शहरात‎महिला किती निर्भयपणे आणि मुक्तपणे‎फिरू शकतात, यावर अवलंबून असते.‎त्यामुळे अनेक महिलांसाठी मोफत बस‎प्रवासासारख्या योजना भावनिक‎जिव्हाळ्याच्या ठरतात.‎‎

This post was originally published on this site.



गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *