रीटा कोठारी यांचा कॉलम:आता कथांमध्ये लहान शहरांचे आवाजही ऐकायला मिळतात

‘शहर से दस किलोमीटर’ नावाच्या कादंबरीत नीलेश रघुवंशी यांनी भोपाळपासून काही अंतरावरील एका आयुष्याचे वर्णन केले आहे. हे आयुष्य फुलणारे आहे. ते अडचणी व आव्हानांनी भरलेले आहे. तरीही ते अत्यंत खोल व तत्वज्ञानात्मक आहे. छोटे गाव आणि शहर—ते आपल्या सीमांच्या पलीकडच्या आयुष्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे—यांच्यातील येण्या-जाण्याचा प्रवास या कथेतील निवेदकाची सायकल पूर्ण करते. एका सूत्रासारखी व नोंदीसारखी ती सायकल त्या जागेच्या शेवटच्या खुणांपैकी एक आहे. ती जागा आता शहराच्या एका निनावी, नव-उदारवादी व साध्याशा विस्तारात रुपांतरित झाली. त्याला ओळखणे कठीण झाले आहे. कादंबरीत सायकलीशी जोडलेल्या बालपणीच्या आठवणी खूप स्पष्टपणे वर येतात. कारण ‘बालपणात लहान-लहान पाय हेच मोठे पंख असतात.’ एक स्त्री निवेदक काळ्या दांड्याची सायकल असायची. त्या दिवसांची आठवण करून देते. आज मिळणाऱ्या गुलाबी आणि सुंदर लेडीज सायकल तेव्हा नव्हत्या. मुली सायकल चालवतील, अशी कल्पनाही तेव्हा केली जात नव्हती. पण आपली निवेदक तर जेंट्स सायकलही अगदी बिनधास्त चालवायची—‘मी अगदी धडाक्यात सायकल चालवू लागले. कधी वाकून तर कधी ताठ बसून, कधी शिट्टी वाजवत तर कधी नागमोडी वळणे घेत, कधी हँडल आणि स्वतःला तिरपे करत, कधी एक हात सोडून, तर कधी सीटवरून वर उठून दोन्ही हात सोडून. मी सायकलीसोबत जणू डोलत होते.’ सायकल म्हणजे फक्त एक रोमांच नाही, ते एक राजकारणही आहे. ती एका काळाची,जीवनशैलीची खूण आहे. सायकल केवळ गरिबी किंवा अभावाचे प्रतीक नव्हती. ही कादंबरी वाचताना मी भूतकाळात निघून गेले. त्या भूतकाळात वेळ आणि एक जागाही आहे. मला जुन्या गोष्टी आठवू लागल्या—अजमेरमध्ये घालवलेल्या उन्हाळ्याच्या लांब व संथ सुट्ट्या. तिथे माझ्या आईचे माहेर आहे. मी प्रत्येक उन्हाळ्यात तिथे जायचे. प्रभात टॉकीजजवळच्या एका छोट्या दुकानातून मी पुस्तके भाड्याने घ्यायचे आणि तासन् तास कर्नल रंजीत आणि राजहंस यांच्या कादंबऱ्या वाचायचे. मी खूप खूश असायचे. कारण मी पुस्तके घ्यायची त्याच दुकानातून मला सायकलही मिळायची. संपूर्ण दिवसासाठी सायकलीचे भाडे एका रुपयापेक्षाही कमी असायचे. सायकल चालवणे आणि कादंबरी वाचणे या आनंदाने तो उन्हाळा खास बनवला होता. वेगवेगळ्या ठिकाणी वेळेची जाणीव वेगळी असते. आपल्या घड्याळात टिक-टिक करते ती ही वेळ नाही. हा वेळ मागे शांत आणि स्थिर राहतो—एखाद्या खिडकीसारखा. यातून आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहता येते. मोठ्या शहरांमध्ये वेळेचे हे रूप पाहायला मिळत नाही. या वेळेतील शांततेला खूप कमी लेखक टिपू शकतात. पण ते तसे करतात, तेव्हा आपल्याला विनोद कुमार शुक्ल, सारा राय किंवा नीलेश रघुवंशी यांच्यासारखे लेखक मिळतात. पण ‘बरेली की बर्फी’ किंवा ‘तनु वेड्स मनु’ यांसारखे चित्रपटांना आता लहान शहरांतील चित्रपट म्हटले जाते—त्यांच्यात ही शांतता सिनेमॅटिक रूपात दिसते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, कोणीही असा प्रश्न विचारू शकतो की शेवटी ‘लहान शहर’ म्हणजे तरी काय? अजमेरसोबतचा माझा अनुभव कदाचित एखाद्या लहान शहरासारखाच होता. मला पूर्ण खात्री आहे की आजचे अजमेर माझ्या या व्याख्येला आव्हान देईल. गेल्या एक-दोन दशकांत आपण लहान शहरांवर आधारित चित्रपट आणि मालिकांची लाट पाहिली आहे. यांची सुरुवात कदाचित ‘बंटी और बबली’ने झाली होती. तुम्ही पाहा, बंटीला फक्त ती जागा सोडायची नाहीये, तर वेळेच्या मंद वेगापासून दूर पळायचे आहे. ‘फुरसतगंज’ हे ठिकाण या वेळ आणि जागेला किती सुंदरपणे एकत्र आणते. तेथून नव्या भारताचे अस्वस्थ तरुण दूर पळू इच्छितात. बबली ही ‘पंकीनगर’ची आहे. आपण बरेली, धनबाद किंवा मिर्झापूरमध्ये येतो, तेव्हा त्यांच्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड दिसते. लहान शहर म्हणजे एखादे स्टेशन नाही किंवा ‘मदर इंडिया’मधले गावही नाही. लहान शहर म्हणजे मध्यमवर्गाच्या नव्या आशा आणि आकांक्षा जन्माला येतात, अशी जागा होय. माणूस त्या इच्छांशी सतत झुंजत असतो. चित्रपटांनी या संघर्षाला विनोदी शैलीत दाखवले आहे, कुठल्याही तणावाच्या रूपात नाही. आपण आता ‘गोरी का गांव’ व मुंबई-कोलकात्याच्या काळ्या बाजाराला खूप मागे टाकले आहे. सखोलतेचा शोध असणाऱ्यांना शहरापासून काही मैल दूर जावे लागेल, आणि तेही सायकलवर! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) लहान शहर म्हणजे मध्यमवर्गाच्या नव्या आकांक्षा जन्माला येतात असे ठिकाण. माणूस त्या इच्छांशी सतत झुंजत असतो. चित्रपटांनी या संघर्षाला विनोदी शैलीत दाखवले. तणावाच्या रूपात नाही. ‘गोरी का गांव’ आणि मुंबई-कोलकात्याच्या काळ्या बाजाराला खूप मागे टाकले.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *