नरेंद्र मोदी, राज ठाकरे, भगतसिंह कोश्यारीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Bhagatsingh Koshyari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांना भाषिक मुद्दावरून चांगलेच घेरले. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका असे राज ठाकरे यांनी त्यांना सुनावले होते. त्यानंतर लागलीच त्यावर भाजपच्या गोटातून सणसणीत प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत असा खळबळजनक दावा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. या खळबळजनक दाव्याने नवीन वादाला फोडणी बसली आहे. तर मोदींना इतकी घाबरण्याची गरज नसल्याचा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना काढला. काय म्हणाले कोश्यारी?
राज ठाकरे हे मोदींना जास्तच घाबरलेत
वरळी डोम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांनी आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात असा टोला त्यांनी लगावला. सत्ता गेल्यानंतर हे लोक येथील का असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. भाजपमधून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता होतीच. ती कमी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भरून काढली.
जी लोक संघाच्या कार्यक्रमाला आली ती सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो. मात्र मला वाटतं ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींना देखील सर्वांना समान आहेत, असा सल्ला भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला. नरेंद्र मोदींना घाबरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित तुम्ही आहात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा, असा टोलाही कोश्यारी यांनी बोलता बोलता लगावला.
मी अजितदादांना कधीच विसरणार नाही
आमदार रोहित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांचा विमान अघात नाही तर शंभर टक्के घातपात असल्याचा आरोप केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार एक मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर अनेकदा टीका झाली. मला दूषणं देण्यात आली. पण अजितदादांनी माझ्यावर कधीच टीका केली नाही. माझ्या कधीही ते विरोधात बोलले नाहीत. मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही असे कोश्यारी म्हणाले. तर रोहित पवार यांना घातपाताबाबत तसं वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.
नाशिकमध्ये कॉरिडॉर व्हावा
40 वर्षांपूर्वी देखील मी नाशिकमध्ये आलो होतो. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मी देखील आज एक भक्त म्हणून आलो आहे. राज्यपाल असताना देखील मी नाशिकमध्ये आलो होतो अशी आठवण भगतसिंह कोश्यारी यांनी जगावल्या. तर जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसा इथे देखील झाला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली.
[embedded content]
शहर
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
- नागपूर: महाराष्ट्रात अवैध दारूचा महापूर; सव्वा तीन वर्षांतच लाखाहून अधिक गुन्हे
- कोल्हापूर हादरले: बिंदू चौक परिसरात अतिक्रमण वादातून तलवार हल्ला आणि दगडफेक; पाच जण गंभीर जखमी"
महाराष्ट्र
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
- नागपूर: महाराष्ट्रात अवैध दारूचा महापूर; सव्वा तीन वर्षांतच लाखाहून अधिक गुन्हे
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
- नवी दिल्ली: जंतर-मंतरवर शाईफेक, उपोषणकर्ते अभिजित दिपके यांच्यावर महिलेचा हल्ला; आरोपी महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात
- नीट (NEET) निकालात मोठा गोंधळ: कानपूरच्या विद्यार्थिनीचा दावा; सुरुवातीला ६०९, नंतर ५४० आणि शेवटी १६७ गुण मिळाल्याचे दाखवले"


























Subscribe to my channel




