नरेंद्र मोदी, राज ठाकरे, भगतसिंह कोश्यारीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Bhagatsingh Koshyari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांना भाषिक मुद्दावरून चांगलेच घेरले. रटाळ प्रवचनाच्या राजकीय टीका टिप्पणी करू नका असे राज ठाकरे यांनी त्यांना सुनावले होते. त्यानंतर लागलीच त्यावर भाजपच्या गोटातून सणसणीत प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत असा खळबळजनक दावा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. या खळबळजनक दाव्याने नवीन वादाला फोडणी बसली आहे. तर मोदींना इतकी घाबरण्याची गरज नसल्याचा चिमटाही त्यांनी राज ठाकरे यांना काढला. काय म्हणाले कोश्यारी?
राज ठाकरे हे मोदींना जास्तच घाबरलेत
वरळी डोम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांनी आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. लोक घाबरून अशा रटाळ प्रवचनांना येतात असा टोला त्यांनी लगावला. सत्ता गेल्यानंतर हे लोक येथील का असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. भाजपमधून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता होतीच. ती कमी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भरून काढली.
जी लोक संघाच्या कार्यक्रमाला आली ती सर्व लोक नरेंद्र मोदींना घाबरली नसतील. मी राज ठाकरेंचा खूप सन्मान करतो. मात्र मला वाटतं ते नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत. मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा. जसे प्रभू श्रीरामाला सर्व समान होते तसेच नरेंद्र मोदींना देखील सर्वांना समान आहेत, असा सल्ला भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला. नरेंद्र मोदींना घाबरू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित तुम्ही आहात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा, असा टोलाही कोश्यारी यांनी बोलता बोलता लगावला.
मी अजितदादांना कधीच विसरणार नाही
आमदार रोहित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांचा विमान अघात नाही तर शंभर टक्के घातपात असल्याचा आरोप केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार एक मोठे नेते होते. राज्यात माझ्यावर अनेकदा टीका झाली. मला दूषणं देण्यात आली. पण अजितदादांनी माझ्यावर कधीच टीका केली नाही. माझ्या कधीही ते विरोधात बोलले नाहीत. मी अजित दादा यांना कधीच विसरणार नाही असे कोश्यारी म्हणाले. तर रोहित पवार यांना घातपाताबाबत तसं वाटत असेल तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.
नाशिकमध्ये कॉरिडॉर व्हावा
40 वर्षांपूर्वी देखील मी नाशिकमध्ये आलो होतो. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आलो होतो. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मी देखील आज एक भक्त म्हणून आलो आहे. राज्यपाल असताना देखील मी नाशिकमध्ये आलो होतो अशी आठवण भगतसिंह कोश्यारी यांनी जगावल्या. तर जसा अयोध्येत कॉरिडॉर झाला, तसा इथे देखील झाला पाहिजे अशी मोठी मागणीही त्यांनी केली.
[embedded content]
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




