आज सर्वत्र ‘कॉक्रोच’ या शब्दाची चर्चा आहे. मात्र, हा शब्द आपल्या राजकीय शब्दकोशाचा भाग होण्याच्या खूप आधीपासून मी त्याचा वापर करत आलो आहे. देव न करो, पण उद्या एखाद्या अणुस्फोटात जग नष्ट झाले तरी फक्त कॉक्रोचच जिवंत राहतील. एका महान ‘सर्व्हायव्हर’पासून राजकीय प्रतिकाराच्या प्रतीकापर्यंत झुरळांनी मोठा प्रवास केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी किंवा सीजेपीचा उदय हा त्या व्यवस्थेविरोधातील वाढत्या जनआक्रोशाचे प्रतीक आहे. ही व्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे की, आंदोलनकर्त्यांना लोकशाहीवरील धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एका किड्याच्या प्रतिमेचा आधार घ्यावा लागत आहे. आपण अशा काळात जगत आहोत. त्यात नेते सम्राटांसारखे वागू लागले आहेत आणि विरोधक कोणतेही विश्वासार्ह आव्हान उभे करू शकत नाहीत. याच पोकळीत कॉक्रोच रांगत प्रवेश करतो- असा एक जीव, त्याच्याबद्दल आपल्याला घृणा आणि भीती बाळगायला शिकवले गेले आहे. पण तो प्रत्येक संकटात जिवंत राहण्याची क्षमता ठेवतो. हे विशेष आहे की, एखाद्या तुलनेने अपरिचित राजकीय संवाद रणनीतिकाराने अमेरिकेतील एका विद्यापीठात बसून सुरू केलेले एक व्यंगात्मक आंदोलन अचानक सत्तेच्या दालनांत अस्वस्थता निर्माण करू लागते. शेवटी एका शक्तिशाली राष्ट्राला सरन्यायाधीशांच्या अनावश्यक टिप्पणीमधून निर्माण झालेल्या ऑनलाइन आंदोलनाची चिंता का वाटावी? भारतातील बेरोजगार तरुणांची जणू खिल्ली उडवत सरन्यायाधीशांनी नकळत एका तीव्र प्रतिक्रियेला जन्म दिला : राग, दुरावा आणि व्यंगाने प्रेरित डिजिटल बंड. त्यानंतर लाखो भारतीय तरुण त्याभोवती एकत्र आले आहेत. या संपूर्ण घटनेला विशेष रंजक बनवणारी गोष्ट म्हणजे सीजेपी हा प्रत्यक्षात कोणताही राजकीय पक्ष नाही. त्याला नेता नाही. कार्यालय नाही. कार्यकर्त्यांचे जाळे नाही. संघटनात्मक रचना नाही. 1.5 अब्ज लोकसंख्या आणि विलक्षण विविधता असलेल्या या देशात केवळ सायबर-स्पेसमध्ये अस्तित्वात असलेल्या एका आंदोलनामुळे तत्त्वतः विद्यमान व्यवस्थेला धोका वाटू नये. तरीही धोका का जाणवत आहे? सीजेपीवर विदेशी निधीतून चालवल्या जाण्याचा आरोप केला जात आहे. त्याचे अनेक समर्थक पाकिस्तानी असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्याचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केले जात आहेत. काहींनी तर त्याला आम आदमी पक्षाचा प्रॉक्सी ठरवण्याचाही प्रयत्न केला. हे सर्व एक प्रकारची संशयी मानसिकता उघड करते. या घबराटीमागे अनेक कारणे आहेत. सर्वांत पहिले म्हणजे हा मोठ्या प्रमाणात ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’चा काळ आहे. या काळातील राज्यकारभार चोवीस तास सुरू असलेल्या जाहिरात मोहिमेसारखा वाटतो : कामगिरीचा प्रचार करा, अपयश दडपून टाका, घोषणा बदला आणि पुढे निघा. कोट्यवधी नोकऱ्यांची आश्वासने पूर्ण झाली नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पेपरफुटी सुरूच आहेत- पण ‘नॅरेटिव्ह मॅनेजमेंट’ हे निश्चित करते की, लोकधारणा कामगिरीवर भारी पडावी. अशा वेळी इंटरनेटवरील हे कॉक्रोच ठरवून दिलेल्या पटकथेचे पालन करण्यास नकार देत आहेत. ही बाब अस्वस्थ करणारी ठरू शकते. दुसरे म्हणजे तरुणांचा रोष निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उच्च जीडीपी वाढीचे आकडे आणि आक्रमक राष्ट्रवादाच्या गदारोळामागे अशी एक पिढी आहे. ती खोल असुरक्षिततेशी झुंज देत आहे. लाखो सुशिक्षित तरुण कमी होत चाललेल्या रोजगार संधी, वाढता परीक्षेचा ताण आणि अशी अर्थव्यवस्था अनुभवत आहेत. त्यात कायमस्वरूपी नोकरी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अनेकांसाठी ही निराशा आता कायमस्वरूपी झाली. त्यांना वाटते की, राजकारणी त्यांना फक्त निवडणुकांच्या वेळी पाहतात आणि ते आंदोलन करतात. तेव्हाच त्यांचे ऐकतात. हा रोष केवळ वैचारिक नाही, तर अनेक अर्थांनी वैयक्तिकही आहे. हे अलीकडील निवडणुकांतही स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः तामिळनाडूमध्ये. तेथे विजय यांच्या लोकप्रियतेने पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या युवा मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनली आहे. आणि लक्षात ठेवा. विडंबन नेहमीच एक राजकीय शस्त्र ठरले आहे. हुकूमशाही प्रवृत्ती विनोद आणि व्यंगासमोर आश्चर्यकारकरीत्या असुरक्षित ठरतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ‘कॉक्रोच’ला कोण घाबरतेय आणि का?संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनत चालली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

परभणीत एसटी बस पलटली; १५ ते २० प्रवासी जखमी, काहींची प्रकृती गंभीर
लोअर परेलमधील प्ले झोनमध्ये मुलाच्या पास्तामध्ये झुरळ? पालकांचा गंभीर आरोप
वसमतजवळ १९ जनावरे पोलिसांच्या ताब्यात; कत्तलीच्या संशयावरून कारवाई
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




