आज सर्वत्र ‘कॉक्रोच’ या शब्दाची चर्चा आहे. मात्र, हा शब्द आपल्या राजकीय शब्दकोशाचा भाग होण्याच्या खूप आधीपासून मी त्याचा वापर करत आलो आहे. देव न करो, पण उद्या एखाद्या अणुस्फोटात जग नष्ट झाले तरी फक्त कॉक्रोचच जिवंत राहतील. एका महान ‘सर्व्हायव्हर’पासून राजकीय प्रतिकाराच्या प्रतीकापर्यंत झुरळांनी मोठा प्रवास केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी किंवा सीजेपीचा उदय हा त्या व्यवस्थेविरोधातील वाढत्या जनआक्रोशाचे प्रतीक आहे. ही व्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे की, आंदोलनकर्त्यांना लोकशाहीवरील धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एका किड्याच्या प्रतिमेचा आधार घ्यावा लागत आहे. आपण अशा काळात जगत आहोत. त्यात नेते सम्राटांसारखे वागू लागले आहेत आणि विरोधक कोणतेही विश्वासार्ह आव्हान उभे करू शकत नाहीत. याच पोकळीत कॉक्रोच रांगत प्रवेश करतो- असा एक जीव, त्याच्याबद्दल आपल्याला घृणा आणि भीती बाळगायला शिकवले गेले आहे. पण तो प्रत्येक संकटात जिवंत राहण्याची क्षमता ठेवतो. हे विशेष आहे की, एखाद्या तुलनेने अपरिचित राजकीय संवाद रणनीतिकाराने अमेरिकेतील एका विद्यापीठात बसून सुरू केलेले एक व्यंगात्मक आंदोलन अचानक सत्तेच्या दालनांत अस्वस्थता निर्माण करू लागते. शेवटी एका शक्तिशाली राष्ट्राला सरन्यायाधीशांच्या अनावश्यक टिप्पणीमधून निर्माण झालेल्या ऑनलाइन आंदोलनाची चिंता का वाटावी? भारतातील बेरोजगार तरुणांची जणू खिल्ली उडवत सरन्यायाधीशांनी नकळत एका तीव्र प्रतिक्रियेला जन्म दिला : राग, दुरावा आणि व्यंगाने प्रेरित डिजिटल बंड. त्यानंतर लाखो भारतीय तरुण त्याभोवती एकत्र आले आहेत. या संपूर्ण घटनेला विशेष रंजक बनवणारी गोष्ट म्हणजे सीजेपी हा प्रत्यक्षात कोणताही राजकीय पक्ष नाही. त्याला नेता नाही. कार्यालय नाही. कार्यकर्त्यांचे जाळे नाही. संघटनात्मक रचना नाही. 1.5 अब्ज लोकसंख्या आणि विलक्षण विविधता असलेल्या या देशात केवळ सायबर-स्पेसमध्ये अस्तित्वात असलेल्या एका आंदोलनामुळे तत्त्वतः विद्यमान व्यवस्थेला धोका वाटू नये. तरीही धोका का जाणवत आहे? सीजेपीवर विदेशी निधीतून चालवल्या जाण्याचा आरोप केला जात आहे. त्याचे अनेक समर्थक पाकिस्तानी असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्याचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केले जात आहेत. काहींनी तर त्याला आम आदमी पक्षाचा प्रॉक्सी ठरवण्याचाही प्रयत्न केला. हे सर्व एक प्रकारची संशयी मानसिकता उघड करते. या घबराटीमागे अनेक कारणे आहेत. सर्वांत पहिले म्हणजे हा मोठ्या प्रमाणात ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’चा काळ आहे. या काळातील राज्यकारभार चोवीस तास सुरू असलेल्या जाहिरात मोहिमेसारखा वाटतो : कामगिरीचा प्रचार करा, अपयश दडपून टाका, घोषणा बदला आणि पुढे निघा. कोट्यवधी नोकऱ्यांची आश्वासने पूर्ण झाली नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पेपरफुटी सुरूच आहेत- पण ‘नॅरेटिव्ह मॅनेजमेंट’ हे निश्चित करते की, लोकधारणा कामगिरीवर भारी पडावी. अशा वेळी इंटरनेटवरील हे कॉक्रोच ठरवून दिलेल्या पटकथेचे पालन करण्यास नकार देत आहेत. ही बाब अस्वस्थ करणारी ठरू शकते. दुसरे म्हणजे तरुणांचा रोष निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उच्च जीडीपी वाढीचे आकडे आणि आक्रमक राष्ट्रवादाच्या गदारोळामागे अशी एक पिढी आहे. ती खोल असुरक्षिततेशी झुंज देत आहे. लाखो सुशिक्षित तरुण कमी होत चाललेल्या रोजगार संधी, वाढता परीक्षेचा ताण आणि अशी अर्थव्यवस्था अनुभवत आहेत. त्यात कायमस्वरूपी नोकरी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अनेकांसाठी ही निराशा आता कायमस्वरूपी झाली. त्यांना वाटते की, राजकारणी त्यांना फक्त निवडणुकांच्या वेळी पाहतात आणि ते आंदोलन करतात. तेव्हाच त्यांचे ऐकतात. हा रोष केवळ वैचारिक नाही, तर अनेक अर्थांनी वैयक्तिकही आहे. हे अलीकडील निवडणुकांतही स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः तामिळनाडूमध्ये. तेथे विजय यांच्या लोकप्रियतेने पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या युवा मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनली आहे. आणि लक्षात ठेवा. विडंबन नेहमीच एक राजकीय शस्त्र ठरले आहे. हुकूमशाही प्रवृत्ती विनोद आणि व्यंगासमोर आश्चर्यकारकरीत्या असुरक्षित ठरतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ‘कॉक्रोच’ला कोण घाबरतेय आणि का?संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनत चालली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- सिंधुदुर्ग: श्रीराम मंदिर दानपेटी प्रकरणी दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; काँग्रेसकडून निषेध
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
- ऐतिहासिक साटवली गढीचे बदलणार भाग्य! राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा
- पुणे: गोठ्यातील दूध काढण्याचे मशीन ठरलं जीवघेणं! विजेच्या धक्क्याने आंबेगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आईसह तिघे अटकेत; हतकणंगलेतील संतापजनक घटना
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- पालघरमध्ये रात्रीची धावपळ! दुर्वेस गावात घरात शिरला १५ किलो वजनाचा १० फुटांचा अजगर; वनविभागाकडून सुखरूप सुटका
- रायसेनमध्ये भीषण थरार! तरुणाने केली तरुणीची हत्या आणि त्यानंतर स्वतः संपवले आयुष्य; पोलीस तपास सुरू
- कर्नाटक: ₹20 च्या दंडाची मोठी किंमत! गृहपाठ न केल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न


























Subscribe to my channel


