आज सर्वत्र ‘कॉक्रोच’ या शब्दाची चर्चा आहे. मात्र, हा शब्द आपल्या राजकीय शब्दकोशाचा भाग होण्याच्या खूप आधीपासून मी त्याचा वापर करत आलो आहे. देव न करो, पण उद्या एखाद्या अणुस्फोटात जग नष्ट झाले तरी फक्त कॉक्रोचच जिवंत राहतील. एका महान ‘सर्व्हायव्हर’पासून राजकीय प्रतिकाराच्या प्रतीकापर्यंत झुरळांनी मोठा प्रवास केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी किंवा सीजेपीचा उदय हा त्या व्यवस्थेविरोधातील वाढत्या जनआक्रोशाचे प्रतीक आहे. ही व्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे की, आंदोलनकर्त्यांना लोकशाहीवरील धोक्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एका किड्याच्या प्रतिमेचा आधार घ्यावा लागत आहे. आपण अशा काळात जगत आहोत. त्यात नेते सम्राटांसारखे वागू लागले आहेत आणि विरोधक कोणतेही विश्वासार्ह आव्हान उभे करू शकत नाहीत. याच पोकळीत कॉक्रोच रांगत प्रवेश करतो- असा एक जीव, त्याच्याबद्दल आपल्याला घृणा आणि भीती बाळगायला शिकवले गेले आहे. पण तो प्रत्येक संकटात जिवंत राहण्याची क्षमता ठेवतो. हे विशेष आहे की, एखाद्या तुलनेने अपरिचित राजकीय संवाद रणनीतिकाराने अमेरिकेतील एका विद्यापीठात बसून सुरू केलेले एक व्यंगात्मक आंदोलन अचानक सत्तेच्या दालनांत अस्वस्थता निर्माण करू लागते. शेवटी एका शक्तिशाली राष्ट्राला सरन्यायाधीशांच्या अनावश्यक टिप्पणीमधून निर्माण झालेल्या ऑनलाइन आंदोलनाची चिंता का वाटावी? भारतातील बेरोजगार तरुणांची जणू खिल्ली उडवत सरन्यायाधीशांनी नकळत एका तीव्र प्रतिक्रियेला जन्म दिला : राग, दुरावा आणि व्यंगाने प्रेरित डिजिटल बंड. त्यानंतर लाखो भारतीय तरुण त्याभोवती एकत्र आले आहेत. या संपूर्ण घटनेला विशेष रंजक बनवणारी गोष्ट म्हणजे सीजेपी हा प्रत्यक्षात कोणताही राजकीय पक्ष नाही. त्याला नेता नाही. कार्यालय नाही. कार्यकर्त्यांचे जाळे नाही. संघटनात्मक रचना नाही. 1.5 अब्ज लोकसंख्या आणि विलक्षण विविधता असलेल्या या देशात केवळ सायबर-स्पेसमध्ये अस्तित्वात असलेल्या एका आंदोलनामुळे तत्त्वतः विद्यमान व्यवस्थेला धोका वाटू नये. तरीही धोका का जाणवत आहे? सीजेपीवर विदेशी निधीतून चालवल्या जाण्याचा आरोप केला जात आहे. त्याचे अनेक समर्थक पाकिस्तानी असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्याचे सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक केले जात आहेत. काहींनी तर त्याला आम आदमी पक्षाचा प्रॉक्सी ठरवण्याचाही प्रयत्न केला. हे सर्व एक प्रकारची संशयी मानसिकता उघड करते. या घबराटीमागे अनेक कारणे आहेत. सर्वांत पहिले म्हणजे हा मोठ्या प्रमाणात ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’चा काळ आहे. या काळातील राज्यकारभार चोवीस तास सुरू असलेल्या जाहिरात मोहिमेसारखा वाटतो : कामगिरीचा प्रचार करा, अपयश दडपून टाका, घोषणा बदला आणि पुढे निघा. कोट्यवधी नोकऱ्यांची आश्वासने पूर्ण झाली नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पेपरफुटी सुरूच आहेत- पण ‘नॅरेटिव्ह मॅनेजमेंट’ हे निश्चित करते की, लोकधारणा कामगिरीवर भारी पडावी. अशा वेळी इंटरनेटवरील हे कॉक्रोच ठरवून दिलेल्या पटकथेचे पालन करण्यास नकार देत आहेत. ही बाब अस्वस्थ करणारी ठरू शकते. दुसरे म्हणजे तरुणांचा रोष निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उच्च जीडीपी वाढीचे आकडे आणि आक्रमक राष्ट्रवादाच्या गदारोळामागे अशी एक पिढी आहे. ती खोल असुरक्षिततेशी झुंज देत आहे. लाखो सुशिक्षित तरुण कमी होत चाललेल्या रोजगार संधी, वाढता परीक्षेचा ताण आणि अशी अर्थव्यवस्था अनुभवत आहेत. त्यात कायमस्वरूपी नोकरी मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अनेकांसाठी ही निराशा आता कायमस्वरूपी झाली. त्यांना वाटते की, राजकारणी त्यांना फक्त निवडणुकांच्या वेळी पाहतात आणि ते आंदोलन करतात. तेव्हाच त्यांचे ऐकतात. हा रोष केवळ वैचारिक नाही, तर अनेक अर्थांनी वैयक्तिकही आहे. हे अलीकडील निवडणुकांतही स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः तामिळनाडूमध्ये. तेथे विजय यांच्या लोकप्रियतेने पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या युवा मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनली आहे. आणि लक्षात ठेवा. विडंबन नेहमीच एक राजकीय शस्त्र ठरले आहे. हुकूमशाही प्रवृत्ती विनोद आणि व्यंगासमोर आश्चर्यकारकरीत्या असुरक्षित ठरतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ‘कॉक्रोच’ला कोण घाबरतेय आणि का?संपूर्ण भारतात युवा मतदार आता जुन्या आणि जड झालेल्या राजकीय विचारांना सातत्याने नाकारत आहेत. ते ताजेपणा, प्रामाणिकता आणि भावनिक नाळ शोधत आहेत. मीम-संस्कृती त्यांच्या प्रतिकाराची भाषा बनत चालली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
महाराष्ट्र
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




