आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, माणसानं शत्रूपासून कसं सावध राहावं? शत्रूचा पराभव कसा करावा? शत्रूवर वार करण्याची योग्य वेळ कोणती? शत्रूची चाल कशी ओळखावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात दोन प्रकारचे शत्रू असतात, एक म्हणजे बाहेरचे शत्रू, हे शत्रू उघड असल्यामुळे आणि तुमच्या ओळखीचे असल्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून कायम सावध राहू शकता, त्यांच्याविरोधात रणनीती बनवणं सहज सोपं असतं, मात्र दुसऱ्या प्रकारचे जे शत्रू असतात, ते अतिशय खतरनाक असतात, कारण हे शत्रू दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच असतात, आपल्याच घरातील असतात. असे शत्रू आपल्याला लवकर ओळखतात येत नाहीत, त्यामुळे आयुष्यात आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, तर अशा शत्रूंपासून सावध कसं राहायचं? घरातील शत्रू कसे ओळखायचे याबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
चाणक्य म्हणतात शत्रू हे दोन प्रकारचे असतात. बाहेरचे शत्रू आपल्याला माहिती असतात, मात्र घरातील शत्रू हे आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे खरा धोका त्यांच्यापासूनच असतो. त्यामुळे माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे. जर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तो तुमच्याबद्दल वाईट चिंतित असेल तर तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला त्याबद्दल खात्री होईल, तेव्हा अशा व्यक्तीपासून सावध राहण्यातच तुमचं हित आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
योजना – चाणक्य म्हणतात अशा लोकांपासून आपल्या योजना या नेहमी गुप्त ठेवाव्यात, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की घरातच तुमचा कोणीतरी शत्रू आहे, तेव्हा तुम्ही जर तुमच्या व्यवसायासंदर्भात किंवा भावी आयुष्यसंदर्भात एखादी योजना तयार केली असेल तर जोपर्यंत त्यामध्ये यश मिळत नाही, तोपर्यंत ती योजना गुप्त ठेवा, घरी देखील त्याबद्दल कोणतीही चर्चा करू नका.
पैसे – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या घरातच शत्रू असतो, तेव्हा तुम्ही किती कमवता? किंवा तुमच्याकडे किती मालमत्ता आहे? किती धन आहे, याची कधीच घरात देखील चर्चा करू नका, कारण अशा चर्चेमुळे तुमचा शत्रू तुमच्याविरोधात कट कारस्थान रचू शकतो.
विश्वासू माणूस – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या घरातच तुमचा शत्रू तयार होतो, अशावेळी तुम्हाला अशा एका तरी माणसाची आवश्यकता असते, ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकाल, आणि तुमच्या गैरहजेरीमध्ये असा माणूस तुमची सर्व कामे प्रामाणिकपणे करेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

