भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी का केली?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच आता हा तणाव काही अंशी निवळल्याचं दिसत आहे. टॅरिफचा तणाव असताना भारत आणि अमेरिकेमध्ये झालेली ही ट्रेड डील महत्त्वाची मानली जात आहे, कारण या ट्रेड डीलमुळे अनेक समीकरण बंदलणारे आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बुस्ट मिळणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, भारत आता रशियाकडून तेलाची खरेदी बंद करेल, मात्र यावर भारताकडून अजून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाहीये. मात्र जरी असं असलं तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाच्या खरेदीच प्रमाण कमी आहे.
एका आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारत रशियाकडून एकूण गरजेच्या तब्बल 41 टक्के कच्च्या तेलाची खरेदी करत होता. पंरतु हेच प्रमाण कमी करत -करत डिसेंबर 2025 मध्ये भारतानं 31 टक्क्यांवर आणलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारातानं हे पाऊल उचललं का? तर असं अजिबात नाहीये. त्यामागे इतर काही कारणं आहेत. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारताला रशियावरील अवलंबित्व कमी करायंच होतं. भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलासाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र एखाद्या कारणामुळे जर पुरवठा साखळी खंडित झाली तर त्याचा मोठा फटका हा देशाला बसू शकतो, त्यामुळे भारताने हा निर्णय घेतला आहे. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन वर्षांपूर्वी रशियावर पश्चिमेकडील देशांनी मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते, त्यामुळे रशियात उत्पादीत होणाऱ्या कच्च्या तेलाची निर्यात होत नव्हती, अशा परिस्थितीमध्ये रशियानं भारताला मोठ्या प्रमाणात सूट दिली होती, ज्याचा फायदा हा भारतानं घेतला. परंतु आता रशियानं डिस्काउंटमध्ये हात आखडता घेतला आहे, त्यामुळे हा व्यावसाय आता तोट्याचा होत आहे, त्यामुळे देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला.
युरोपियन युनियनची घोषणा – युरोपियन युनियनमध्ये असलेल्या देशांनी मोठी घोषणा केली आहे, जे देश रशियातून मिळणाऱ्या कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधन बनवतील त्या देशांकडून पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय युरोपियन युनियनने घेतला आहे. हा देखील दबाव असल्यामुळे आता भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




