भाजपला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचा निकाल लागला, या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र जरी भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये अशी स्थिती होती की भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते, महापालिकेत पक्षाचा महापौर बसवण्यासाठी त्यांना मित्र पक्षाची मदत घ्यावी लागली, चंद्रपूरमध्ये तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपचा माहापौर झाला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भिवंडी महापालिकेत येत्या 20 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत देखील कोणाकडेही बहुमत नाही, इथे काँग्रेसकडे 30 नगरसेवक आहेत, तर भाजपाकडे 22 आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडे प्रत्येकी 12 नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये भिवंडीमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पहायला मिळत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार आता भिवंडीमध्ये भाजपात मोठी फूट पडली आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे नारायण चौधरी यांच्या नेतृत्वातील 9 नगरसेवकांचा गट हा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
जो पर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही, भिवंडीत ही असंच पाहायला मिळालं. भिवंडीत आम्ही निवडणुकांना सामोरं गेलो, इथे सर्वाधिक जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत. आम्हाला बहुमतासाठी 16 जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे आम्ही तिथे आता सेक्युलर फ्रंट सुरू केली आहे. यामध्ये आम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला, त्यांचे बारा नगरसेवक असल्यामुळे आता आमची संख्या 42 झाली आहे, त्यानंतर आम्ही अपक्ष उमेदवारांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी काही फुटत नाहीये. आम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा पाठिंबा घेणार नाही, ही आमची भूमिका होती. भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा कराया तयार आहोत, नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते, ते भाजपमध्ये गेले होते, ते आता सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत, ते 9 नगरसेवकांना घेऊन आले आहेत, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे काँग्रेसकडून या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली होती, त्यांनंतर या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र आता भिवंडीमध्ये भाजपचे 9 नगरसेवक हे काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



