२०२६ च्या बंगाल निवडणुकीत डाव्या आघाडीशीदशकभराची युती तोडण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचेअनपेक्षित परिणाम होऊ शकतात का? आम्ही एकटेलढण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचेसरचिटणीस आणि बंगाल प्रभारी गुलाम अहमद मीरयांनी स्पष्ट केले. हा वरिष्ठ नेत्यांचा सामूहिक निर्णयआहे. नवी दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्याबैठकीनंतर मीर यांनी ही घोषणा केली. याचा अर्थ काँग्रेसबंगालमधील सर्व २९४ जागा स्वबळावर लढवेल.यासह ही निवडणूक आता चौरंगी लढत झाली आहे.परंतु याचा फायदा फक्त भाजपलाच होईल. कारणकाँग्रेस तृणमूलच्या पारंपारिक मुस्लिम मतांचा एक भाग आपल्या बाजूने वळवू शकते. २०२१ च्या बंगाल निवडणुकीत तृणमूलने ४८% मते व२१५ जागा जिंकल्या. २०१६ मध्ये भाजपच्या मतांचाटक्का १०.०४% वरून ३८% पर्यंत वाढला होता. त्यांच्या जागा ३ वरून ७७ पर्यंत वाढल्या होत्या. त्यानंतरतृणमूल कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या हिंसाचारामुळे पक्षाचे मनोबल घसरले. तृणमूलच्या आक्रमकतेला भाजपने उशिरा प्रतिसाद दिल्याने अनेक कार्यकर्ते इतर पक्षात गेले. यावेळी परिस्थिती बदलूशकेल का? तृणमूल अजूनही राज्याच्या अल्पसंख्याकमतपेढीच्या सुमारे ३५% वर नियंत्रण ठेवते. तरीही पक्षातघबराटीची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतक्याचिंतेत आहेत की त्यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्चन्यायालयात एसआयआर मुद्द्यावर स्वतः त्यांच्याराज्याचे प्रतिनिधित्व केले. एसआयआर राज्याच्यामतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे काढूनटाकू शकते. चाेहीबाजूची लढाई निवडणुकीचे गणितकसे बदलेल? कदाचित ममतांना सलग चौथ्यांदामुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे नाही.भूतकाळात त्यांनी संदेशखली घटना, आरजी काररुग्णालय अत्याचार आणि खून प्रकरण यासारख्याराजकीय वादळांना तोंड दिले आहे. कालांतरानेममतांनी त्यांची प्रतिमा एका राजकीय रस्त्यावरीललढवय्यापासून व्यवसाय-अनुकूल नेत्यात बदलण्याचाप्रयत्न केला आहे. कोलकाता एक तंत्रज्ञान केंद्र म्हणूनउदयास येत आहे. बेंगळुरू, मुंबई, दिल्लीएनसीआर-गुरुग्राम आणि हैदराबादशी स्पर्धाकरण्यासाठी त्यांना अजूनही बराच पल्ला गाठायचाआहे. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणण्यानुसारममतांना राहुल गांधींची जागा घेणाऱ्या विरोधीआघाडीच्या संभाव्य नेत्या म्हणूनही पाहिले जात आहे.निवडणूक आयोगाविरुद्ध बंगालचे प्रतिनिधित्वकरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नागरिक म्हणूनत्यांची उपस्थिती दर्शवते की बंगालच्या निवडणुकाथोड्या अस्थिर असू शकतात. घुसखोरीचा मुद्दाराजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. गेल्याआठवड्यात मोदींनी राज्यसभेत भाषणात म्हटल्याप्रमाणेआज जगातील सर्वात श्रीमंत देशही बेकायदास्थलांतरितांना हाकलून लावत आहेत. परंतु आपल्यादेशात घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी न्यायालयांवरदबाव आणला जात आहे. देशातील तरुण अशालोकांना कसे माफ करतील? ममता बॅनर्जी काँग्रेसनेडाव्या आघाडीशी असलेली निवडणूक युती तोडलीआहे याची त्यांना जास्त काळजी वाटणार नाही.त्यांच्यासाठी दोन्ही पक्ष आता राजकीयदृष्ट्याअप्रासंगिक आहेत. बंगालमध्ये भाजप वेगाने उदयास येतआहे. परंतु निवडणूक गणिते अद्याप असे दर्शवत नाहीतकी २९४ सदस्यांच्या विधानसभेत १४८ जागांचा आकडाओलांडून ते सत्तेत पोहोचू शकतील. बहुमतमिळविण्यासाठी भाजपला मतांचा वाटा ४५% पर्यंतवाढवावा लागेल. तृणमूलचा वाटा ४८% वरून ४२%पर्यंत कमी होईल अशी आशाही त्यांना करावी लागेल.काँग्रेस आणि डाव्या आघाडीची मतांची फूट, चौरंगीलढतही ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी पुरेसे नाही. ममता आता ७१ वर्षांच्या आहेत. परंतु घुसखोरीच्यामुद्द्यावर त्या कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.१२ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असलेल्याबांगलादेशातील घुसखोर आणि निर्वासित हे त्यांच्यामतपेढीचा एक छोटासा पण निर्णायक भाग आहेत. हागट विजय आणि पराभवात निर्णायक ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्यामुख्यमंत्र्याने सर्वोच्च न्यायालयातवैयक्तिकरीत्या खटल्यासाठी युक्तिवादकेला. ही बाब पश्चिम बंगालच्याआगामी राजकीय लढाईत किती गोष्टीपणाला लागल्या आहेत, हेच दर्शवणारीआहे.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




