२०२६ च्या बंगाल निवडणुकीत डाव्या आघाडीशीदशकभराची युती तोडण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचेअनपेक्षित परिणाम होऊ शकतात का? आम्ही एकटेलढण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचेसरचिटणीस आणि बंगाल प्रभारी गुलाम अहमद मीरयांनी स्पष्ट केले. हा वरिष्ठ नेत्यांचा सामूहिक निर्णयआहे. नवी दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्याबैठकीनंतर मीर यांनी ही घोषणा केली. याचा अर्थ काँग्रेसबंगालमधील सर्व २९४ जागा स्वबळावर लढवेल.यासह ही निवडणूक आता चौरंगी लढत झाली आहे.परंतु याचा फायदा फक्त भाजपलाच होईल. कारणकाँग्रेस तृणमूलच्या पारंपारिक मुस्लिम मतांचा एक भाग आपल्या बाजूने वळवू शकते. २०२१ च्या बंगाल निवडणुकीत तृणमूलने ४८% मते व२१५ जागा जिंकल्या. २०१६ मध्ये भाजपच्या मतांचाटक्का १०.०४% वरून ३८% पर्यंत वाढला होता. त्यांच्या जागा ३ वरून ७७ पर्यंत वाढल्या होत्या. त्यानंतरतृणमूल कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या हिंसाचारामुळे पक्षाचे मनोबल घसरले. तृणमूलच्या आक्रमकतेला भाजपने उशिरा प्रतिसाद दिल्याने अनेक कार्यकर्ते इतर पक्षात गेले. यावेळी परिस्थिती बदलूशकेल का? तृणमूल अजूनही राज्याच्या अल्पसंख्याकमतपेढीच्या सुमारे ३५% वर नियंत्रण ठेवते. तरीही पक्षातघबराटीची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतक्याचिंतेत आहेत की त्यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्चन्यायालयात एसआयआर मुद्द्यावर स्वतः त्यांच्याराज्याचे प्रतिनिधित्व केले. एसआयआर राज्याच्यामतदार यादीतून बांगलादेशी घुसखोरांची नावे काढूनटाकू शकते. चाेहीबाजूची लढाई निवडणुकीचे गणितकसे बदलेल? कदाचित ममतांना सलग चौथ्यांदामुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे नाही.भूतकाळात त्यांनी संदेशखली घटना, आरजी काररुग्णालय अत्याचार आणि खून प्रकरण यासारख्याराजकीय वादळांना तोंड दिले आहे. कालांतरानेममतांनी त्यांची प्रतिमा एका राजकीय रस्त्यावरीललढवय्यापासून व्यवसाय-अनुकूल नेत्यात बदलण्याचाप्रयत्न केला आहे. कोलकाता एक तंत्रज्ञान केंद्र म्हणूनउदयास येत आहे. बेंगळुरू, मुंबई, दिल्लीएनसीआर-गुरुग्राम आणि हैदराबादशी स्पर्धाकरण्यासाठी त्यांना अजूनही बराच पल्ला गाठायचाआहे. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणण्यानुसारममतांना राहुल गांधींची जागा घेणाऱ्या विरोधीआघाडीच्या संभाव्य नेत्या म्हणूनही पाहिले जात आहे.निवडणूक आयोगाविरुद्ध बंगालचे प्रतिनिधित्वकरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नागरिक म्हणूनत्यांची उपस्थिती दर्शवते की बंगालच्या निवडणुकाथोड्या अस्थिर असू शकतात. घुसखोरीचा मुद्दाराजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. गेल्याआठवड्यात मोदींनी राज्यसभेत भाषणात म्हटल्याप्रमाणेआज जगातील सर्वात श्रीमंत देशही बेकायदास्थलांतरितांना हाकलून लावत आहेत. परंतु आपल्यादेशात घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी न्यायालयांवरदबाव आणला जात आहे. देशातील तरुण अशालोकांना कसे माफ करतील? ममता बॅनर्जी काँग्रेसनेडाव्या आघाडीशी असलेली निवडणूक युती तोडलीआहे याची त्यांना जास्त काळजी वाटणार नाही.त्यांच्यासाठी दोन्ही पक्ष आता राजकीयदृष्ट्याअप्रासंगिक आहेत. बंगालमध्ये भाजप वेगाने उदयास येतआहे. परंतु निवडणूक गणिते अद्याप असे दर्शवत नाहीतकी २९४ सदस्यांच्या विधानसभेत १४८ जागांचा आकडाओलांडून ते सत्तेत पोहोचू शकतील. बहुमतमिळविण्यासाठी भाजपला मतांचा वाटा ४५% पर्यंतवाढवावा लागेल. तृणमूलचा वाटा ४८% वरून ४२%पर्यंत कमी होईल अशी आशाही त्यांना करावी लागेल.काँग्रेस आणि डाव्या आघाडीची मतांची फूट, चौरंगीलढतही ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी पुरेसे नाही. ममता आता ७१ वर्षांच्या आहेत. परंतु घुसखोरीच्यामुद्द्यावर त्या कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.१२ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार असलेल्याबांगलादेशातील घुसखोर आणि निर्वासित हे त्यांच्यामतपेढीचा एक छोटासा पण निर्णायक भाग आहेत. हागट विजय आणि पराभवात निर्णायक ठरू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्यामुख्यमंत्र्याने सर्वोच्च न्यायालयातवैयक्तिकरीत्या खटल्यासाठी युक्तिवादकेला. ही बाब पश्चिम बंगालच्याआगामी राजकीय लढाईत किती गोष्टीपणाला लागल्या आहेत, हेच दर्शवणारीआहे.
हे पण वाचा-
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


