बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रसिद्ध व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येचा तपास अद्याप सुरु आहे. त्यातच आता महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांवर भररस्त्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुख्यात वाल्मिक कराडच्या मुलांपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाला जिवाचा धोका असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला महादेव मुंडे यांची दोन मुले प्रणव आणि प्रवीण मुंडे हे आपल्या मित्राकडून परीक्षेसाठी वही आणण्यासाठी स्कुटीवरून सोमेश्वर नगर भागातून जात होते. यावेळी बालाजी आघाव नावाच्या तरुणाने त्या दोघांना मध्येच अडवले.
यावेळी मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ट्युशनला जाताना त्याने आम्हाला पाहिले होते. परत येताना त्याने आम्हाला थांबवून नाव विचारले. तू कुणाचा मुलगा आहेस? अशी विचारणा केली. जेव्हा मी सांगितले की मी महादेव मुंडे यांचा मुलगा आहे, तेव्हा त्याने थेट माझ्या भावाला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्याने आमच्या हातातील कडेही काढून घेतले. यावेळी तिथे काही नागरिक उपस्थित होते, पण कोणीही मदतीला आले नाही.
वाल्मिक कराड कनेक्शन आणि सोशल मीडियाचा पुरावा
या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय मुंडे कुटुंबाने व्यक्त केला आहे. यावेळी मुलांनी संशयित आरोपी बालाजी आघाव याचे इंस्टाग्राम प्रोफाईल तपासले असता, त्यामध्ये वाल्मिक कराड याचे अनेक फॉलोअर्स आणि त्याच्या मुलांचे सुशील व श्रीगणेश कराड याचे फोटो दिसून आले. यामुळे हा हल्ला केवळ योगायोग नसून जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांच्या मुलांनी केला आहे. त्याला कोणी पाठवले होते आणि कोणाच्या सांगण्यावरून हे केले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुलांनी केली आहे.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
दरम्यान महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या प्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांना लेखी अर्ज दिला आहे. या अर्जात त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची मुले सुशील कराड व श्रीगणेश कराड यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे. दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, सतीश फड आणि वडील भगवान फड यांच्यावर हल्ला होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला काही दुखापत झाली किंवा अनपेक्षित घटना घडली, तर त्याला पूर्णपणे सुशील आणि श्रीगणेश कराड जबाबदार असतील, असे त्यांनी अर्जात स्पष्ट केले आहे.
नार्को टेस्ट आणि तपासाचा रोख
काही दिवसांपूर्वीच महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोन संशयितांची नार्को टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमुळे तपासाची सुई कराड टोळीकडे वळत असतानाच हा हल्ला झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आता या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि मुंडे कुटुंबाला सुरक्षा देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
[embedded content]
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




