माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की तो आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य दुसऱ्या बद्दलच्या विचारात चिंतेत व्यर्थ घालवतो. कोण कसा आहे? कसा वागतो? हे विचार आपल्याला आतून जाळतात. सर्वात गंभीर बाब ही आहे की आपण ज्यांचा सतत विचार करत असतो ते आपली किती काळजी करतात? जगात वाईट वागणारे लोकं सतत असणार आहेतच. कोणी तुम्हाला धोका देते तर कोणी आपले म्हणून तुमची मर्जी संपादन करुन मित्रत्वात मागून वार करते. कोणी तुम्हाला अनैतिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. वास्तविक प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांच्या वाईट, स्वार्थी वागणुकीच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगणार आहात काय? आपल्याला फक्त इतकेच जाणून जगायचे आहे की समोरचा कसा ही असो, तो त्याचा प्रश्न आहे.आपण आपल्या आत्म्यास त्याच दिशेने घेऊन जाणार आहोत काय? आपण नैतिक वैधानिक मार्ग सोडू नये. आपण कां आणि कशासाठी जगत आहोत या जीवनाच्या प्रमुख उद्देशाचा कधी विचार केला आहे कां? लोक काय म्हणतील या भिती मध्येच अधिक आयुष्य जाते. विवेकपूर्ण विचार करा की हे लोक आहेत कोण? हे देखील भयभीत आणि द्विधा मनस्थितीत आहेत. ते काय म्हणतात, काय विचार करतात ही त्यांची मानसिक स्थिती,समस्या आहे. त्यांच्या आतील तो कचरा आहे, तो बाहेर पडू द्या.आपल्या आत्मिक आनंदाची चावी दुसऱ्याकडे मुळीच नाही. आपण स्वतः एक विवेकसंपन्न मनुष्य आहोत, दुसऱ्याच्या हातातील बाहुली नव्हे. आत्मकेंद्रित व्हा, खरा आनंद मिळेल. जीवन वर्तमानात समोर उभे आहे. त्या सुंदर जीवनाला तुमची प्रतीक्षा आहे. पण आपण आपली एक अपेक्षित प्रतिमा बनवलेली असते की मला असे व्हायचे आहे. तसे होत नाही. यालाच कुंठीत होणे म्हणतात. याच कारणाने आपण दुःखी होऊन समोर असलेल्या सुंदर जीवनाला गमावतो. म्हणून जे वर्तमान वास्तव आहे, त्याचा स्वीकार करत प्रगतीपूर्ण सुंदर जीवन जगावे. आपण दुःखी होण्याच्या मागे कुठे तरी आपली अपेक्षा असते. अपेक्षाभंगाने दुःख होते. आपल्याला वाटत असते की जग आपल्या इशाऱ्यावर नाचावे. आपण म्हणू तसे लोकांनी वागावे. सर्वांकडून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. पण असे प्रत्यक्ष घडत नाही. जग त्याच्या नियमाने चालते. तुमच्या इशाऱ्याने नव्हे. इतरांकडून अपेक्षा न करता आपण आपले स्वकेंद्रित होऊन जीवनाच्या प्रमुख ध्येयाच्या मार्गाचे क्रमण करावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



