फळे आणि भाज्या कापल्यानंतर त्यांचा रंग बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी स्वयंपाकघरात काम करताना ती अनेकदा डोकेदुखी ठरते. विशेषतः बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच काळी पडतात. पण यामागचे नेमकं कारण काय, तसेच बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काळी पडू नयेत, यासाठी सोपे घरगुती उपाय आज आपण माहिती करुन घेऊया.बटाटा आणि सफरचंद काळं पडण्याच्या प्रक्रियेला विज्ञानात एन्झायमॅटिक ब्राउनिंग (Enzymatic Browning) असे म्हणतात. बटाटा आणि सफरचंदामध्ये 'पॉलिफेनॉल ऑक्सिडेज' (Polyphenol Oxidase) नावाचे एन्झाइम असते. जोपर्यंत ही फळ किंवा भाजी कापली जात नाही, तोपर्यंत हे एन्झाइम पेशींच्या आत सुरक्षित असते.मात्र, कापल्यानंतर या पेशी हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. ऑक्सिजन आणि एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार होते, ज्यामुळे कापलेला भाग काळा किंवा तपकिरी दिसू लागतो.कापलेले बटाटे आणि सफरचंद ताजे ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती पर्याय नक्की वापरु शकता. बटाटे कापल्यानंतर लगेच थंड पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांचा हवेशी संपर्क तुटतो आणि ते काळे पडत नाहीत. हा सर्वात सोपा उपाय आहे.जर तुम्ही सफरचंद कापले असेल आणि ते तुम्हाला थोड्यावेळाने खायचे असेल तर तुम्ही त्या फोडींवर थोडा लिंबाचा रस लावावा. लिंबातील व्हिटॅमिन-सीमुळे (Antioxidant) ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते.तसेच एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका. त्यात बटाटे किंवा सफरचंदाचे काप ठेवा. यामुळे रंग बदलत नाही, मात्र खाण्यापूर्वी सफरचंद एकदा धुवून घ्यावे.जर तुम्हाला सफरचंद जास्त वेळ ताजे ठेवायचे असेल तर दोन कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून त्यात सफरचंदाच्या फोडी ठेवाव्यात. साधारण ३-५ मिनिटांनंतर या फोडी काढून ठेवाव्यात. तसेच जर तुम्हाला कापलेली फळे लगेच वापरायची नसतील तर त्यांना क्लिंग फिल्मने घट्ट गुंडाळून किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.यासोबतच बटाटे किंवा सफरचंद काळे पडण्यापासून थांबवायचे असेल तर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर टाका. या पाण्यात कापलेले बटाटे किंवा सफरचंदाच्या फोडी २-३ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्यांचा रंग बराच वेळ पांढरा आणि ताजा राहतो. पण खाण्यापूर्वी किंवा शिजवण्यापूर्वी ते साध्या पाण्याने एकदा धुवून घ्यावे.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




