फळे आणि भाज्या कापल्यानंतर त्यांचा रंग बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी स्वयंपाकघरात काम करताना ती अनेकदा डोकेदुखी ठरते. विशेषतः बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच काळी पडतात. पण यामागचे नेमकं कारण काय, तसेच बटाटे आणि सफरचंद कापल्यानंतर काळी पडू नयेत, यासाठी सोपे घरगुती उपाय आज आपण माहिती करुन घेऊया.बटाटा आणि सफरचंद काळं पडण्याच्या प्रक्रियेला विज्ञानात एन्झायमॅटिक ब्राउनिंग (Enzymatic Browning) असे म्हणतात. बटाटा आणि सफरचंदामध्ये 'पॉलिफेनॉल ऑक्सिडेज' (Polyphenol Oxidase) नावाचे एन्झाइम असते. जोपर्यंत ही फळ किंवा भाजी कापली जात नाही, तोपर्यंत हे एन्झाइम पेशींच्या आत सुरक्षित असते.मात्र, कापल्यानंतर या पेशी हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. ऑक्सिजन आणि एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार होते, ज्यामुळे कापलेला भाग काळा किंवा तपकिरी दिसू लागतो.कापलेले बटाटे आणि सफरचंद ताजे ठेवण्यासाठी तुम्ही घरगुती पर्याय नक्की वापरु शकता. बटाटे कापल्यानंतर लगेच थंड पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्यांचा हवेशी संपर्क तुटतो आणि ते काळे पडत नाहीत. हा सर्वात सोपा उपाय आहे.जर तुम्ही सफरचंद कापले असेल आणि ते तुम्हाला थोड्यावेळाने खायचे असेल तर तुम्ही त्या फोडींवर थोडा लिंबाचा रस लावावा. लिंबातील व्हिटॅमिन-सीमुळे (Antioxidant) ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते.तसेच एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाका. त्यात बटाटे किंवा सफरचंदाचे काप ठेवा. यामुळे रंग बदलत नाही, मात्र खाण्यापूर्वी सफरचंद एकदा धुवून घ्यावे.जर तुम्हाला सफरचंद जास्त वेळ ताजे ठेवायचे असेल तर दोन कप पाण्यात दोन चमचे मध मिसळून त्यात सफरचंदाच्या फोडी ठेवाव्यात. साधारण ३-५ मिनिटांनंतर या फोडी काढून ठेवाव्यात. तसेच जर तुम्हाला कापलेली फळे लगेच वापरायची नसतील तर त्यांना क्लिंग फिल्मने घट्ट गुंडाळून किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे.यासोबतच बटाटे किंवा सफरचंद काळे पडण्यापासून थांबवायचे असेल तर एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर टाका. या पाण्यात कापलेले बटाटे किंवा सफरचंदाच्या फोडी २-३ मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे त्यांचा रंग बराच वेळ पांढरा आणि ताजा राहतो. पण खाण्यापूर्वी किंवा शिजवण्यापूर्वी ते साध्या पाण्याने एकदा धुवून घ्यावे.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

