एक विचार असा आहे, जे होत आहे ते होऊ द्या. जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करु नका. प्रकृतीची लीला, नियतीची इच्छा समजून त्या कडे त्रयस्थ, तठस्थ भावनेने पहा. हाच सुखाचा मार्ग असू शकतो. चांगले किंवा वाईट काहीच नाही. होत आहे ते होऊ देणे. येथे हरवून जावे असे तुमचे काय आहे? सर्व प्रकृतीचे आहे, निसर्गाचे आहे. आपला काहीच अधिकार नाही. म्हणून प्रत्येक घटनेचे फक्त साक्षी व्हा. सुख-दुःखाच्या पलीकडे जाण्याचा हाच मार्ग आहे. प्रत्येक जीव हा त्याचा स्वतःचा असतो. कारण चैतन्य स्वतंत्र असते. ते इतर कोणाच्याही मालकीचे नसते. तसेच प्रत्येक अजीव म्हणजेच भौतिक पदार्थ हा त्याचा स्वतःचा असतो. जीव आणि अजीव ह्या दोन स्वतंत्र राशी विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, याशिवाय तिसरा पदार्थ नाही. आणि मुख्य म्हणजे हे दोन्हीही स्वतः स्वतंत्र अस्तित्वात आहेत. जीव अजीवाचा कधीही होऊ शकत नाही आणि अजीव हा कधीही जीवाचा होऊ शकत नाही हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आपण जे पंचमहाभूत म्हणतो तेच अजीव किंवा भौतिक पदार्थाचे सर्व प्रकार. परंतु एक सत्य आहे की जीव हा अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. जीवामध्ये चैतन्य असते म्हणून अनेक प्रवृत्ती असतात. अजीवामध्ये चैतन्याचा अभाव असल्यामुळे प्रवृत्ती नसतात. मात्र अजीवाचे काही मूलगुण असतात. जसे स्पर्श, वर्ण, गंध, रस अर्थात गरम किंवा थंड असणे, कोणता तरी रंग असणे, त्याला चव असणे, नियमित किंवा अनियमित आकार असणे आणि खंडित होणे किंवा एकत्र जुळणे. हे सर्व अजीव पदार्थाच्या मूळ लहानात लहान सूक्ष्म कणाचे गुणधर्म असतात. हे सर्व एकत्र होऊन मोठा पदार्थ होतो. चैतन्य आत्मा जेव्हा संसारात असतो, तेव्हा कर्मजनीत अवस्थेमुळे त्याच्या काही प्रवृत्ती असतात. संसारात असलेल्या जीवाला जीवन जगण्यासाठी वस्तूंची आवश्यकता पडते. म्हणजेच तो अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. हा जीव आणि अजीव यांच्यातील परस्पर सह-अस्तित्वाचा सिद्धांत आहे. इतके माहीत असल्यानंतरही मनुष्य भौतिक वस्तूंचा लोभ, मोह, संग्रह करतो. भौतिक पदार्थांच्या,वस्तूंच्या प्राप्तीसाठी जीवनातील महत्त्वाचा सर्व वेळ खर्च करतो. त्याचे कारण हेच की तो भौतिकते मध्ये सुख शोधत असतो. परंतु खूप मेहनत, कष्ट आटापिटा केल्यानंतरही ज्यावेळेस तो भौतिकतेच्या मागे थकून भागून अखेर स्थिरावतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरे सुख हे वस्तूंच्या मागे भौतिकतेच्या मागे पर-पदार्थाच्या मागे धावण्यात, पळण्यात, त्यांना मिळवण्यात नसून ते आपल्या अंतरात आहे. सुख हे समाधानात आहे. आपल्या मानण्यात आहे. समभावात जगण्यात आहे. म्हणजेच खरे सुख हे अंतरातील संतोष वृत्ती मध्ये आहे. म्हणून असे म्हणावे वाटते की निसर्ग आणि नियतीच्या इच्छेनुसार जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्यात फार बाधा उत्पन्न करण्याचे कारण नाही. अविचल आणि संतुलित, संतोष आणि समाधानी, अर्थात समभावाने जीवन जगण्यातच खरे सुख, समाधान आहे हे जाणून घ्यावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




