एक विचार असा आहे, जे होत आहे ते होऊ द्या. जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करु नका. प्रकृतीची लीला, नियतीची इच्छा समजून त्या कडे त्रयस्थ, तठस्थ भावनेने पहा. हाच सुखाचा मार्ग असू शकतो. चांगले किंवा वाईट काहीच नाही. होत आहे ते होऊ देणे. येथे हरवून जावे असे तुमचे काय आहे? सर्व प्रकृतीचे आहे, निसर्गाचे आहे. आपला काहीच अधिकार नाही. म्हणून प्रत्येक घटनेचे फक्त साक्षी व्हा. सुख-दुःखाच्या पलीकडे जाण्याचा हाच मार्ग आहे. प्रत्येक जीव हा त्याचा स्वतःचा असतो. कारण चैतन्य स्वतंत्र असते. ते इतर कोणाच्याही मालकीचे नसते. तसेच प्रत्येक अजीव म्हणजेच भौतिक पदार्थ हा त्याचा स्वतःचा असतो. जीव आणि अजीव ह्या दोन स्वतंत्र राशी विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, याशिवाय तिसरा पदार्थ नाही. आणि मुख्य म्हणजे हे दोन्हीही स्वतः स्वतंत्र अस्तित्वात आहेत. जीव अजीवाचा कधीही होऊ शकत नाही आणि अजीव हा कधीही जीवाचा होऊ शकत नाही हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आपण जे पंचमहाभूत म्हणतो तेच अजीव किंवा भौतिक पदार्थाचे सर्व प्रकार. परंतु एक सत्य आहे की जीव हा अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. जीवामध्ये चैतन्य असते म्हणून अनेक प्रवृत्ती असतात. अजीवामध्ये चैतन्याचा अभाव असल्यामुळे प्रवृत्ती नसतात. मात्र अजीवाचे काही मूलगुण असतात. जसे स्पर्श, वर्ण, गंध, रस अर्थात गरम किंवा थंड असणे, कोणता तरी रंग असणे, त्याला चव असणे, नियमित किंवा अनियमित आकार असणे आणि खंडित होणे किंवा एकत्र जुळणे. हे सर्व अजीव पदार्थाच्या मूळ लहानात लहान सूक्ष्म कणाचे गुणधर्म असतात. हे सर्व एकत्र होऊन मोठा पदार्थ होतो. चैतन्य आत्मा जेव्हा संसारात असतो, तेव्हा कर्मजनीत अवस्थेमुळे त्याच्या काही प्रवृत्ती असतात. संसारात असलेल्या जीवाला जीवन जगण्यासाठी वस्तूंची आवश्यकता पडते. म्हणजेच तो अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. हा जीव आणि अजीव यांच्यातील परस्पर सह-अस्तित्वाचा सिद्धांत आहे. इतके माहीत असल्यानंतरही मनुष्य भौतिक वस्तूंचा लोभ, मोह, संग्रह करतो. भौतिक पदार्थांच्या,वस्तूंच्या प्राप्तीसाठी जीवनातील महत्त्वाचा सर्व वेळ खर्च करतो. त्याचे कारण हेच की तो भौतिकते मध्ये सुख शोधत असतो. परंतु खूप मेहनत, कष्ट आटापिटा केल्यानंतरही ज्यावेळेस तो भौतिकतेच्या मागे थकून भागून अखेर स्थिरावतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरे सुख हे वस्तूंच्या मागे भौतिकतेच्या मागे पर-पदार्थाच्या मागे धावण्यात, पळण्यात, त्यांना मिळवण्यात नसून ते आपल्या अंतरात आहे. सुख हे समाधानात आहे. आपल्या मानण्यात आहे. समभावात जगण्यात आहे. म्हणजेच खरे सुख हे अंतरातील संतोष वृत्ती मध्ये आहे. म्हणून असे म्हणावे वाटते की निसर्ग आणि नियतीच्या इच्छेनुसार जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्यात फार बाधा उत्पन्न करण्याचे कारण नाही. अविचल आणि संतुलित, संतोष आणि समाधानी, अर्थात समभावाने जीवन जगण्यातच खरे सुख, समाधान आहे हे जाणून घ्यावे. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
- कोविडनंतर ऑक्सिजन प्लांट 'थंडावले'; कोट्यवधींच्या सार्वजनिक गुंतवणुकीचे नक्की काय झाले?
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- महाराष्ट्रात वणव्यांचे थैमान! एका वर्षात ५ हजारांहून अधिक आगीच्या घटना; ११ हजारांहून अधिक हेक्टर वनसंपदा राख!
- कोविडनंतर ऑक्सिजन प्लांट 'थंडावले'; कोट्यवधींच्या सार्वजनिक गुंतवणुकीचे नक्की काय झाले?
- पुण्यात माणुसकीला काळीमा! १० लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती पत्नीला बेल्ट आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल!
- ६५०० कोटींचे बजेट... पण १४,५०० विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? नागपूर मनपाच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

"दोषी माझी मुलगी असेल, तर तिलाही तिथूनच खाली फेका!" #punenews #punecrime #latestnews
पुणे महानगरपालिकेत पुन्हा भ्रष्टाचाराचा 'गलिच्छ' चेहरा उघड! सामान्यांची लूट किती काळ सुरू राहणार?
🚨 हॉटेलचे किचन कसे असावे? FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले नवे कडक नियम!🍽️ ' #PuneNews24
देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
























Subscribe to my channel




