प्रो. मनोज कुमार झा यांचा कॉलम:अल्गोरिदमने विवेकाची जागा घेतली तर माणूस मागे पडू शकतो‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या एकाच अध्यायापुरती‎मर्यादित नसतात. ती प्रत्येक पिढीसमोर एक नैतिक प्रश्न‎म्हणून उभी राहतात. महात्मा गांधी आणि चंद्रशेखर ही‎अशीच व्यक्तिमत्त्वे आहेत. या दोघांचे एकत्र स्मरण‎करणे म्हणजे लोकशाहीच्या दोन परंपरांना उजाळा देणे‎होय. त्यांनी सत्तेपेक्षा समाजावर जास्त विश्वास ठेवला.‎ या दोघांच्याही आयुष्यात प्रवासाला विशेष महत्त्व होते.‎गांधीजींनी भारत देश पायी, रेल्वेने आणि बैलगाडीने‎समजून घेतला. तर चंद्रशेखर यांनी सत्तेच्या वर्तुळातून‎बाहेर पडून समाजाची स्पंदने जाणण्यासाठी भारत-यात्रा‎केली. भारताचा आत्मा गावातील धुळीत, शहरांमधील‎अस्वस्थतेत व सामान्य माणसाच्या आकांक्षांमध्ये‎वसलेला आहे, हे ते दोघेही जाणून होते. त्यांच्यासाठी‎प्रवास हा समाजाचा एक अभ्यासच होता. आजचा भारत‎अभूतपूर्व तांत्रिक बदलांच्या काळातून जात आहे. अंतरे‎कमी झाली. माहितीचा स्फोट झाला. एआय आपल्या‎निर्णयांवर प्रभाव पाडत आहे. तंत्रज्ञानाने वेग नक्कीच‎वाढवला . पण त्याने माणसातील संवेदना अधिक खोल‎केली आहे का? हा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरात गांधीजी व‎चंद्रशेखर मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर येतात.‎ लोकशाहीला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित केले जाते.‎तेव्हा तिची खरी शोकांतिका सुरू होते. निवडणुका हा‎लोकशाहीचा उत्सव नक्कीच आहेत, पण तो तिचा मूळ‎गाभा नाही. नागरिक फक्त मतदार आणि राजकारण हे‎केवळ ‘इलेक्शन मॅनेजमेंट'' बनते, तेव्हा लोकशाहीचा‎आत्मा क्षीण होऊ लागतो. महात्मा गांधींसाठी लोकशाही‎म्हणजे केवळ बहुमताचे राज्य नव्हते. शेवटच्या रांगेत‎उभ्या असलेल्या माणसाचा सन्मान हीच त्यांच्यासाठी‎लोकशाहीची खरी कसोटी होती. गांधीजी म्हणायचे की,‎कायदा माणसाला शिक्षा देऊ शकतो. पण त्याला नैतिक‎बनवू शकत नाही. करुणा ही कोणत्याही कायद्यातून‎निर्माण होत नाही. सहअस्तित्व हे कोर्टाच्या कोणत्याही‎आदेशाने स्थापन करता येत नाही. म्हणूनच लोकशाही ही‎शेवटी माणसाच्या मनात जन्म घेते. यामुळेच सार्वजनिक‎जीवनात भाषा व वर्तनाला केवळ राजकीय नाही, तर‎नैतिक महत्त्वही असते. गांधीजी विरोधकांसाठीही‎सन्मानजनक भाषा वापरत असत. चंद्रशेखर संसदेत तीव्र‎टीका करायचे, पण त्याचे रुपांतर कधीही वैमनस्यात होऊ‎दिले नाही. मतभेद ही लोकशाहीची ताकद आहे. अनेक‎भाषा, श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती मिळून‎भारतीयत्व तयार होते. गांधीजींनी याला भारताची‎आध्यात्मिक ताकद मानले तर चंद्रशेखर यांनी सामाजिक‎न्याय आणि राष्ट्रीय एकता यांना एकमेकांचे पूरक मानले.‎आज ओळखीचे राजकारण संवादाच्या राजकारणावर‎वरचढ होताना दिसते, तेव्हा भारताचा आत्मा‎एकसारखेपणात नसून सहअस्तित्वात वसलेला आहे.‎एआयच्या या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न यंत्र किती‎विचार करू शकते हा नव्हे तर माणूस अजूनही भावना‎अनुभवू शकतो का? हा आहे. गांधीजी यंत्रांच्या विरोधात‎नव्हते; तर ते माणसाच्या विस्थापनाचे विरोधी होते.‎चंद्रशेखरसुद्धा विकासाच्या विरोधात नव्हते; माणूस मागे‎पडेल अशा विकासाच्या विरोधात होते. अल्गोरिदमने‎माणसाच्या विवेकाची जागा घेतली आणि यंत्रे आपली‎स्मृती बनल्या, तर लोकशाही तांत्रिकदृष्ट्या आधुनिक‎होईल, पण नैतिकदृष्ट्या गरीब बनेल. लोकशाहीचे भविष्य‎केवळ संसदेत नाही तर शाळा, महाविद्यालये, कुटुंबे व‎नागरिक जीवनातील छोट्या-छोट्या प्रक्रियांमधून घडेल.‎नवी पिढी जर या विविधतेचा आदर करेल, प्रश्न‎विचारण्याचे धैर्य दाखवेल आणि भीतीमुक्त विवेक‎विकसित करेल, तरच ही लोकशाही जिवंत राहील.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *