काँग्रेस - लेफ्ट फ्रंट यांचा उरल्यासुरल्या मतांसाठी संघर्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस उरलेल्या वाट्यासाठी स्पर्धाकरत आहेत. पूर्व-मध्य भारतातमाओवादाला पूर्णपणे संपवण्यात आलेआहे, तर केरळमध्ये कॉम्रेडसरकारविरोधी दुहेरी भावनेशी झुंज देतआहेत. डाव्या विचारधारेला आता बाजूलासारण्यात आलेले दिसते.
बंगालमधील भिंतींवर लिहिलेला संदेश तुम्ही कोलकाताआणि त्याच्या बाहेर फिरल्याशिवाय कसा वाचणार? तरचला, माझ्यासोबत उत्तरेला ६०० किमीवरीलसिलीगुडीच्या ६० किमी अरुंद कॉरिडॉरमध्ये जाऊया किंवाबंगालच्या मुख्य भूमीला उत्तर आणि पूर्वेकडीलहिमालयीन जिल्ह्यांशी जोडणाऱ्या ९० किमी रुंद पट्ट्यातजाऊया. चला, नक्षलबाडीच्या भिंतींपासूनच सुरुवातकरूया. कुणी या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर आपणआज १९६७ च्या सशस्त्र आंदोलनाची ५९ वा स्मृती दिनसाजरा केला असता. म्हणूनच आम्ही बेंगाईजोतेपासूनसुरुवात केली. हे गाव नक्षलबाडीचाच भाग आहे. तेथेबंडाची पहिली ठिणगी पडली होती.
मला येथे त्या विसरल्या गेलेल्या क्रांतीच्या स्मारकांचीसाफसफाई आणि रंगकाम करत असलेले दोन कॉम्रेडभेटले. या स्मारकावर मार्क्स, लेनिन, एंगेल्स, स्टॅलिन,माओ, चारू मजूमदार आणि सरोज दत्ता यांच्या मूर्तीबसवण्यात आल्या आहेत. पहिले पाच नेते अशा महानव्यक्ती होत्या. त्यांची नावे या क्रांतीच्या प्रार्थनांमध्ये घेतलीजात होती. उरलेले दोघे त्यांचे उत्तराधिकारी होते आणिक्रांतीचे स्थानिक संस्थापक होते. पण माओच्या खांद्यालाखांदा लावून मार्शल लिन प्याओ (बियाओ)ही उभे होते.ते चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सर्वातशक्तीशाली प्रमुख होते आणि त्यांना अनेकदा चीनच्याकम्युनिस्ट पक्षातील दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटलेजात होते. पण अचानक एक दिवस १३ सप्टेंबर १९७१रोजी त्यांचे निधन होते. एका विमानातून ते कुटुंबासहप्रवास करत होते. ते मंगोलियात अपघातग्रस्त झाले. याअपघाताबद्दल चीनी सरकारने स्पष्टीकरण दिले की,कथित ‘प्रोजेक्ट ५७१’ तख्तापलट अयशस्वी झाल्यानंतरते पळून जात होते. असे मानले जाते की ते पळून सोव्हिएत संघात जात होते. लिन यांना गद्दार घोषित करण्यात आले आणि त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की ते माओयांच्या पत्नी जियांग क्विंग यांच्यासोबत मिळूनसत्तापालटाची योजना करत होते. या दोघांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ‘प्रति-क्रांतिकारी’ घोषित केले. पणजगात बेंगाईजोते एक अशी जागा आहे. तेथे तुम्ही माओ आणि लिन यांना एकमेकांच्या शेजारी पाहू शकता. नक्षल आंदोलनाची ५९ वी वर्षपूर्ती आणि लेनिन जयंती (२२ एप्रिल) साजरी करण्यासाठी त्यांच्या स्मारकाचीसाफसफाई करणारे दलित कॉम्रेड पुण्य सिंह राजबोंग्सीयांना याबद्दल काही अडचण नाही.
मी त्यांना विचारतो : तुम्ही माओ आणि लिन बियाओयांना एकत्र कसे ठेवू शकता? ते म्हणतात : कारण तेमहान कॉम्रेड होते. मी म्हणतो : पण, लिन यांनी माओयांना धोका दिला नव्हता का, आणि माओ यांनी त्यांचीहत्या करवली नव्हती का? राजबोंग्सी यांनी ठामपणेसांगितले : नाही, ताे सर्व अपप्रचार आहे. त्यांच्या विरोधात लिउ शाओकी यांनी कट रचला होता. मी त्यांना हेआठवण करून दिले नाही की लिउ यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. भक्तांशी वाद कशाला. दरम्यान, दुसरे ज्येष्ठ कॉम्रेड स्मारकातील वॉलपेपर चिकटवत होते.त्यावर बंगालीत काही लिहिले होते त्याचा अर्थ असा होता: "मुक्ती मतदानाने मिळणार नाही. मुक्ती फक्त क्रांतीनेचमिळेल.’ यानंतर काही दिवसांनी नक्षलबाडीमध्ये ९२टक्के मतदान नोंदवले गेले. आज लोक फक्त मतदानातूनहोणाऱ्या क्रांतीवरच विश्वास ठेवू लागले आहेत. क्रांतीचाजन्म नक्षलबाडीत झाला, तर तिचा अंतही तिथेच झाला.२०२१ मध्ये ही विधानसभा जागा भाजप उमेदवारआनंदमय बर्मन यांनी सुमारे ७१ हजार मते म्हणजे ५८टक्के मतांनी जिंकली. आम्ही त्यांना माटीगारा (यानिवडणूक क्षेत्राला आता माटीगारा-नक्षलबाडी म्हटलेजाते) येथे घराघरांत जाऊन प्रचार करताना पाहिले.मृदुभाषी शिक्षक आणि आरएसएस कार्यकर्ते आनंदमयबर्मन म्हणतात की त्या आंदोलनाने लोकांना गरिबीशिवायकाहीच दिले नाही. पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू आहे की उरलेल्यावाट्यातून कुणाला मोठा हिस्सा मिळतो. ही स्थितीपूर्व-मध्य भारतात नक्षलांच्या नव्या रूपाला पूर्णपणेसंपवण्यात आले तेव्हा दिसते. दूर दक्षिणेत केरळमध्येडाव्या पक्षांना सरकारविरोधी दुहेरी लाटेचा सामना करावालागत आहे. ४ मे रोजी त्यांनी काही चमत्कार करूनदाखवला नाही, तर आपण असे जाहीर करू शकतो कीआता डाव्या विचारांना निर्णायकपणे कडेला ढकलण्यातआले आहे. सशस्त्र कम्युनिझमचा अंत होणे ही फक्तकाळाची गोष्ट होती. पण मुख्य प्रवाहातील डावेही कडेलागेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत.२००४ मध्ये ५३ लोकसभा जागांसह ते शिखरावर पोहोचलेहोते. त्यामागे फक्त एक भावनेची लाट होती : अमेरिकाविरोध. ते यूपीए सरकारपासून वेगळे झाले होते आणिअमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या मुद्द्यावर भाजपसोबतहातमिळवणी करून त्या सरकारला पाडण्याचाही प्रयत्नकेला होता. त्यानंतर ते अधोगतीच्या मार्गावरच गेले. .१९८८ मध्ये मला हे पाहून आश्चर्य वाटले की बीजिंगआणि मॉस्कोमध्ये कम्युनिस्ट बदलत होते. पणकोलकात्यात नाही. या उत्सुकतेने मला कोलकात्यातआणले. मी माकपचे प्रदेश सचिव सरोज मुखर्जी यांनाविचारले होते : देंग व गोर्बाचेव्ह यांनी साम्यवाद बदलला.भारतातील कम्युनिस्ट सुधारणा का करत नाहीत? त्यांनीसांगितले : कारण माझा कम्युनिझम देंग, गोर्बाचेव्ह यांच्याकम्युनिझमपेक्षा अधिक शुद्ध आहे. जवळपास वीस वर्षांनंतर त्यांचे एक उत्तराधिकारी बुद्धदेबभट्टाचार्य यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांनाविचारले होते की तुम्ही खासगी आणि विदेशीभांडवलाला आमंत्रण देत आहात. ते तुमच्याविचारधारेशी कसे जुळते. त्यांनी सांगितले होते : माझाविश्वास हीच माझी विचारधारा आहे. पण मी क्रांतिकारीसरकार चालवत नाही. मला संविधानानुसार काम करावेलागते. त्यांनी सिंगूर, नंदीग्राममध्ये औद्योगिक नगरउभारण्याची योजना केली होती. तिच्याविरोधातीलजनआंदोलन त्यांच्या स्वतःच्या कट्टर डाव्या कॉम्रेडांनीचालवले होते. त्यांनी भट्टाचार्य यांचे स्वप्न मोडले. त्यांच्यापक्षाला संपवले. ममता बॅनर्जी त्याला दफन करण्यासाठीउभ्या राहिल्या. भाजप त्या कबरीवर नवा महालउभारण्यात व्यग्र आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुरंदर विमानतळ प्रकल्प: शेतकऱ्यांना मिळणार प्रति एकर दीड कोटींहून अधिक मोबदला; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा; डीम्ड कन्व्हेयन्स जमिनीवर सोसायट्यांचाच अधिकार!
- गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा; डीम्ड कन्व्हेयन्स जमिनीवर सोसायट्यांचाच अधिकार!
- गँग वॉर, पॉर्शे क्रॅश ते रिव्हेंज किलिंग: पुण्यातील बालगुन्हेगारीची काळी बाजू
महाराष्ट्र
- आई-वडील बाहेरगावी गेले अन् १६ वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता; भावाला आलेल्या एका फोनने बीडमध्ये खळबळ
- कोल्हापूर / मुंबई: गोकुळ दूध संघाला मोठा दिलासा; राज्य सरकारचा 'त्या' चौकशीला कायमस्वरूपी स्थगिती देण्याचा निर्णय!
- पुरंदर विमानतळ प्रकल्प: शेतकऱ्यांना मिळणार प्रति एकर दीड कोटींहून अधिक मोबदला; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा; डीम्ड कन्व्हेयन्स जमिनीवर सोसायट्यांचाच अधिकार!
गुन्हा
- गँग वॉर, पॉर्शे क्रॅश ते रिव्हेंज किलिंग: पुण्यातील बालगुन्हेगारीची काळी बाजू
- सांगलीत क्षुल्लक कारणावरून थरार: 'एकटक बघितल्याच्या' वादातून तरुणाची हत्या; कसबे डिग्रज परिसरात खळबळ
- रेल्वे प्रवाशांची लूट करणाऱ्या महिला चोरट्याला बेड्या; 'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत मोठी कारवाई
- मीरा रोड 'लोन वोल्फ' हल्ला प्रकरण: आरोपी जबर अन्सारीचे ISIS कनेक्शन? महाराष्ट्र एटीएसकडून सखोल तपास सुरू
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
- भव्यतेचा धमाका की केवळ देखावा? ‘राजा शिवाजी’ ट्रेलरवरून उठलेले सवाल
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




