काँग्रेस - लेफ्ट फ्रंट यांचा उरल्यासुरल्या मतांसाठी संघर्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस उरलेल्या वाट्यासाठी स्पर्धाकरत आहेत. पूर्व-मध्य भारतातमाओवादाला पूर्णपणे संपवण्यात आलेआहे, तर केरळमध्ये कॉम्रेडसरकारविरोधी दुहेरी भावनेशी झुंज देतआहेत. डाव्या विचारधारेला आता बाजूलासारण्यात आलेले दिसते.
बंगालमधील भिंतींवर लिहिलेला संदेश तुम्ही कोलकाताआणि त्याच्या बाहेर फिरल्याशिवाय कसा वाचणार? तरचला, माझ्यासोबत उत्तरेला ६०० किमीवरीलसिलीगुडीच्या ६० किमी अरुंद कॉरिडॉरमध्ये जाऊया किंवाबंगालच्या मुख्य भूमीला उत्तर आणि पूर्वेकडीलहिमालयीन जिल्ह्यांशी जोडणाऱ्या ९० किमी रुंद पट्ट्यातजाऊया. चला, नक्षलबाडीच्या भिंतींपासूनच सुरुवातकरूया. कुणी या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर आपणआज १९६७ च्या सशस्त्र आंदोलनाची ५९ वा स्मृती दिनसाजरा केला असता. म्हणूनच आम्ही बेंगाईजोतेपासूनसुरुवात केली. हे गाव नक्षलबाडीचाच भाग आहे. तेथेबंडाची पहिली ठिणगी पडली होती.
मला येथे त्या विसरल्या गेलेल्या क्रांतीच्या स्मारकांचीसाफसफाई आणि रंगकाम करत असलेले दोन कॉम्रेडभेटले. या स्मारकावर मार्क्स, लेनिन, एंगेल्स, स्टॅलिन,माओ, चारू मजूमदार आणि सरोज दत्ता यांच्या मूर्तीबसवण्यात आल्या आहेत. पहिले पाच नेते अशा महानव्यक्ती होत्या. त्यांची नावे या क्रांतीच्या प्रार्थनांमध्ये घेतलीजात होती. उरलेले दोघे त्यांचे उत्तराधिकारी होते आणिक्रांतीचे स्थानिक संस्थापक होते. पण माओच्या खांद्यालाखांदा लावून मार्शल लिन प्याओ (बियाओ)ही उभे होते.ते चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सर्वातशक्तीशाली प्रमुख होते आणि त्यांना अनेकदा चीनच्याकम्युनिस्ट पक्षातील दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटलेजात होते. पण अचानक एक दिवस १३ सप्टेंबर १९७१रोजी त्यांचे निधन होते. एका विमानातून ते कुटुंबासहप्रवास करत होते. ते मंगोलियात अपघातग्रस्त झाले. याअपघाताबद्दल चीनी सरकारने स्पष्टीकरण दिले की,कथित ‘प्रोजेक्ट ५७१’ तख्तापलट अयशस्वी झाल्यानंतरते पळून जात होते. असे मानले जाते की ते पळून सोव्हिएत संघात जात होते. लिन यांना गद्दार घोषित करण्यात आले आणि त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की ते माओयांच्या पत्नी जियांग क्विंग यांच्यासोबत मिळूनसत्तापालटाची योजना करत होते. या दोघांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ‘प्रति-क्रांतिकारी’ घोषित केले. पणजगात बेंगाईजोते एक अशी जागा आहे. तेथे तुम्ही माओ आणि लिन यांना एकमेकांच्या शेजारी पाहू शकता. नक्षल आंदोलनाची ५९ वी वर्षपूर्ती आणि लेनिन जयंती (२२ एप्रिल) साजरी करण्यासाठी त्यांच्या स्मारकाचीसाफसफाई करणारे दलित कॉम्रेड पुण्य सिंह राजबोंग्सीयांना याबद्दल काही अडचण नाही.
मी त्यांना विचारतो : तुम्ही माओ आणि लिन बियाओयांना एकत्र कसे ठेवू शकता? ते म्हणतात : कारण तेमहान कॉम्रेड होते. मी म्हणतो : पण, लिन यांनी माओयांना धोका दिला नव्हता का, आणि माओ यांनी त्यांचीहत्या करवली नव्हती का? राजबोंग्सी यांनी ठामपणेसांगितले : नाही, ताे सर्व अपप्रचार आहे. त्यांच्या विरोधात लिउ शाओकी यांनी कट रचला होता. मी त्यांना हेआठवण करून दिले नाही की लिउ यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. भक्तांशी वाद कशाला. दरम्यान, दुसरे ज्येष्ठ कॉम्रेड स्मारकातील वॉलपेपर चिकटवत होते.त्यावर बंगालीत काही लिहिले होते त्याचा अर्थ असा होता: "मुक्ती मतदानाने मिळणार नाही. मुक्ती फक्त क्रांतीनेचमिळेल.’ यानंतर काही दिवसांनी नक्षलबाडीमध्ये ९२टक्के मतदान नोंदवले गेले. आज लोक फक्त मतदानातूनहोणाऱ्या क्रांतीवरच विश्वास ठेवू लागले आहेत. क्रांतीचाजन्म नक्षलबाडीत झाला, तर तिचा अंतही तिथेच झाला.२०२१ मध्ये ही विधानसभा जागा भाजप उमेदवारआनंदमय बर्मन यांनी सुमारे ७१ हजार मते म्हणजे ५८टक्के मतांनी जिंकली. आम्ही त्यांना माटीगारा (यानिवडणूक क्षेत्राला आता माटीगारा-नक्षलबाडी म्हटलेजाते) येथे घराघरांत जाऊन प्रचार करताना पाहिले.मृदुभाषी शिक्षक आणि आरएसएस कार्यकर्ते आनंदमयबर्मन म्हणतात की त्या आंदोलनाने लोकांना गरिबीशिवायकाहीच दिले नाही. पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू आहे की उरलेल्यावाट्यातून कुणाला मोठा हिस्सा मिळतो. ही स्थितीपूर्व-मध्य भारतात नक्षलांच्या नव्या रूपाला पूर्णपणेसंपवण्यात आले तेव्हा दिसते. दूर दक्षिणेत केरळमध्येडाव्या पक्षांना सरकारविरोधी दुहेरी लाटेचा सामना करावालागत आहे. ४ मे रोजी त्यांनी काही चमत्कार करूनदाखवला नाही, तर आपण असे जाहीर करू शकतो कीआता डाव्या विचारांना निर्णायकपणे कडेला ढकलण्यातआले आहे. सशस्त्र कम्युनिझमचा अंत होणे ही फक्तकाळाची गोष्ट होती. पण मुख्य प्रवाहातील डावेही कडेलागेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत.२००४ मध्ये ५३ लोकसभा जागांसह ते शिखरावर पोहोचलेहोते. त्यामागे फक्त एक भावनेची लाट होती : अमेरिकाविरोध. ते यूपीए सरकारपासून वेगळे झाले होते आणिअमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या मुद्द्यावर भाजपसोबतहातमिळवणी करून त्या सरकारला पाडण्याचाही प्रयत्नकेला होता. त्यानंतर ते अधोगतीच्या मार्गावरच गेले. .१९८८ मध्ये मला हे पाहून आश्चर्य वाटले की बीजिंगआणि मॉस्कोमध्ये कम्युनिस्ट बदलत होते. पणकोलकात्यात नाही. या उत्सुकतेने मला कोलकात्यातआणले. मी माकपचे प्रदेश सचिव सरोज मुखर्जी यांनाविचारले होते : देंग व गोर्बाचेव्ह यांनी साम्यवाद बदलला.भारतातील कम्युनिस्ट सुधारणा का करत नाहीत? त्यांनीसांगितले : कारण माझा कम्युनिझम देंग, गोर्बाचेव्ह यांच्याकम्युनिझमपेक्षा अधिक शुद्ध आहे. जवळपास वीस वर्षांनंतर त्यांचे एक उत्तराधिकारी बुद्धदेबभट्टाचार्य यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांनाविचारले होते की तुम्ही खासगी आणि विदेशीभांडवलाला आमंत्रण देत आहात. ते तुमच्याविचारधारेशी कसे जुळते. त्यांनी सांगितले होते : माझाविश्वास हीच माझी विचारधारा आहे. पण मी क्रांतिकारीसरकार चालवत नाही. मला संविधानानुसार काम करावेलागते. त्यांनी सिंगूर, नंदीग्राममध्ये औद्योगिक नगरउभारण्याची योजना केली होती. तिच्याविरोधातीलजनआंदोलन त्यांच्या स्वतःच्या कट्टर डाव्या कॉम्रेडांनीचालवले होते. त्यांनी भट्टाचार्य यांचे स्वप्न मोडले. त्यांच्यापक्षाला संपवले. ममता बॅनर्जी त्याला दफन करण्यासाठीउभ्या राहिल्या. भाजप त्या कबरीवर नवा महालउभारण्यात व्यग्र आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
महाराष्ट्र
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


