पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:स्वत: ला सात्विक रुपामध्ये‎ जास्त सक्रिय ठेवणे गरजेचे‎

सगळे सांगतात, धीर धरा. पण वेळ येते, तेव्हा धीर सुटतो. अशावेळी‎काही कृती नियमित केल्या तर धीराचा जन्म आपोआप होतो. त्यापैकी‎एक कर्मकांड. काही दिवसांपूर्वी मी कोलकात्यात कथा सांगत होतो.‎तेथे मी सुशिक्षित, तंत्रज्ञानाशी जोडलेले लोक कर्मकांड करताना‎पाहिले. सात दिवस ते रोज तीन तास कर्मकांड करत व त्यानंतर कथा‎ऐकत. मी त्यांना विचारले की, तुम्ही इतके तर्कशुद्ध विचार करणारे‎लोक असूनही एवढा वेळ कर्मकांड करता, तर त्यातून तुम्हाला काय‎मिळते? बहुतेक लोक म्हणाले , आमच्यामध्ये धीर निर्माण होत आहे.‎पंडितजी मंत्रोच्चार करतात. विविध विधी करायला लावतात.‎सुरुवातीला हे अंधश्रद्धा वाटत होते; पण प्रत्यक्ष केले, तेव्हा जाणवले‎की हा निसर्गाशी जोडले जाण्याचा मार्ग आहे. तणाव कमी होत आहे.‎ध्यानधारणेलाही मदत होते. सर्जनशील होत आहोत.‎ शिस्तीचा सराव‎होतो . मग कर्मकांड का करू नये. स्वतःला सात्त्विक पद्धतीने सक्रिय‎का ठेवू नये? ‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *