पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनेविश्वास, विकास आणि जनकल्याणाला समर्पित आपली12 वर्षे पूर्ण केली आहेत. ‘संकल्पातून सिद्धी’चा हागौरवशाली काळ भारताचा विकास, सुरक्षा, आर्थिकसक्षमीकरण आणि जागतिक प्रतिष्ठेतील अभूतपूर्व वाढीचासाक्षीदार राहिला आहे. काँग्रेस देशाला अनिश्चितता,भ्रष्टाचार आणि कमकुवत नेतृत्वाचा वारसा देऊन गेलीहोती, पंतप्रधान मोदींनी भारताला आत्मविश्वास, सुशासनआणि विकासाची नवी ओळख दिली आहे. काँग्रेससाठीराजकारणाचा अर्थ वर्षानुवर्षे कुटुंबाचा वारसा वाचवणे हाचराहिला, तर पंतप्रधान मोदींसाठी राजकारण हे- ‘कुटुंबनाही, राष्ट्र प्रथम’ आणि ‘सत्ता नाही, सेवा प्रथम’ असा मार्गराहिला आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा इतिहासपाहिला तर त्यांच्या यशामागे जो एक मूलमंत्र दिसून येतो, तोआहे त्या राष्ट्राचे ‘सामूहिक स्वप्न’. भारताच्या संदर्भात वर्ष2014 मध्ये पहिल्यांदाच 140 कोटींच्या विशाल जनतेलासामूहिक चेतनेच्या एका सूत्रात बांधण्याचे ऐतिहासिक कार्यपंतप्रधान मोदींनी केले. देशाला पहिले असे नेतृत्व मिळालेआहे, जे एका ‘प्रधान सेवक’च्या भावनेने ‘सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’चामहासंकल्प घेऊन निरंतर पुढे जात आहे. 2014 मध्येपंतप्रधानांनी आधी राष्ट्राला एक ‘सामूहिक विचार’ दिला,नंतर जनविश्वासाच्या बळावर त्या विचाराला ‘सामूहिकसंकल्प’मध्ये बदलले आणि आज तोच संकल्प ‘विकसितभारत’च्या रूपात ‘सामूहिक स्वप्न’चे रूप धारण करूनचुकला आहे. या महापरिवर्तनाची सुरुवात पायाभूत सुविधांच्याअभूतपूर्व क्रांतीने झाली. 2014 पूर्वी देश पायाभूत सुविधांच्याकमतरतेशी झगडत होता. आज तळागाळातील बदलाचापरिणाम असा आहे की 12 कोटींहून अधिक शौचालयेबांधली गेली, 100% विद्युतीकरण झाले, एक्स्प्रेस-वे नेटवर्क7 पटीने वाढले आणि विमानतळे 74 वरून 160 पेक्षा जास्त झाली. हा काळ मानसिक गुलामगिरीतून मुक्ती आणि वास्तविक ‘डी-कॉलोनायझेशन’चा साक्षीदार आहे. लोककल्याण मार्ग, कर्तव्य पथ आणि सेवा तीर्थचेनामकरण आणि योगाचा जागतिक प्रसार याचा पुरावा आहे. एक काळ असा होता, जेव्हा देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने तत्कालीन 54 कोटींच्या लोकसंख्येला ओझे मानले होते,पण आज पंतप्रधान मानतात की हेच 140 कोटी देशवासी भारताच्या विकासगाथेचा सर्वात मजबूत दुवा आहेत. याच विचाराने कलम 370 कायमचे रद्द केले. अंतर्गत सुरक्षेच्या आघाडीवर नक्षलवाद आणि दहशतवादाविरुद्ध ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबले गेले. कोरोनाकाळात 220 कोटींहून अधिक मोफत लस डोस आणि ‘लस मैत्री’ने जागतिक स्तरावर भारताच्या क्षमतेची ओळख करूनदिली. आजचा तरुण ‘जॉब सीकर’ नाही, तर ‘जॉब गिव्हर’बनत आहे. 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि 125 पेक्षा जास्त युनिकॉर्न्ससोबत भारत मॅनपॉवरकडून ‘मॅन्युफॅक्चरिंग पॉवर’कडे वाटचाल करत आहे. याचप्रमाणे देश ‘वुमेनडेव्हलपमेंट’च्या पुढे जाऊन ‘वुमेन लेड डेव्हलपमेंट’चासाक्षीदार बनत आहे, जिथे 3 कोटींहून अधिक ‘लखपतीदीदी’ आणि सुरक्षा दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांची 4 पटवाढ नारीशक्तीचे स्वावलंबन दर्शवते. मोदी सरकारनेमातृशक्तीला सन्मान, सुरक्षा, स्वाभिमान आणि भागीदारीदेण्यामध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. गरीबकल्याणाच्या क्षेत्रात, विविध योजनांनी वंचितांच्या‘विशियस सायकल’ (दुष्टचक्र) ला ‘वर्च्युअस सायकल’(गुणात्मक चक्र) मध्ये बदलले आहे, ज्यामुळे 25 कोटीलोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. 4 कोटी पक्की घरे,60 कोटी नागरिकांना आयुष्मान कवच आणि पीएम मुद्रायोजनेअंतर्गत 40 लाख कोटी रुपयांचे विनातारण कर्जयाचा आधार बनले. डिजिटल क्रांतीच्या क्षेत्रात, ‘1रुपयापैकी फक्त 15 पैसे पोहोचण्याच्या’ जुन्या काळालासंपुष्टात आणून डीबीटीच्या माध्यमातून 51 लाख कोटी रुपयेथेट लाभार्थींच्या खात्यात पाठवले गेले.जनधन-आधार-मोबाइल (जॅम) ट्रिनिटी आणियूपीआयच्या माध्यमातून आज ₹314 लाख कोटींचावार्षिक डिजिटल व्यवहार होत आहे, जो जागतिक स्तरावर49% आहे. निसर्गाप्रति कटिबद्धता दर्शवत भारताने स्वच्छभारत अभियान, एक पेड माँ के नाम आणि सोलारकॅपेसिटीला 2.6 जीडब्ल्यू वरून 110+ जीडब्ल्यूपर्यंतपोहोचवून ग्रीन अर्थचा संकल्प सिद्ध केला आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आज देशाच्यासीमावर्ती भागांना सर्वोच्च प्राधान्य मिळाले आहे.कधीकाळी देशाचे शेवटचे गाव म्हटले जाणारे हे भाग आजभारताचे पहिले गाव म्हणून नवी ओळख मिळवून चुकलेआहेत. यासोबतच आज भारताच्या लष्करी क्षमतेतअभूतपूर्व वाढ झाली आहे आणि आपली सैन्यदलेअत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. 500 वर्षांच्याप्रतीक्षेनंतर भव्य राम मंदिराचे निर्माण, काशी विश्वनाथ धामआणि महाकाल महालोकचा जीर्णोद्धार हे आपल्यासांस्कृतिक राष्ट्रवादाच्या त्या सभ्यतागत चेतनेचे पुनर्जागरणआहे, जे विकासही, वारसही या मूलमंत्राला पूर्ण सार्थकेनेसाकार करत आहे. गेल्या 12 वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संपूर्णदेशाचा विचार करण्याचा ट्रेंडदेखील बदलला आहे. आजनव्या भारताचा कल असा आहे, जिथे आंत्रप्रेन्योर बनणे एकट्रेंड आहे, कठोर परिश्रम करणे एक ट्रेंड आहे आणिव्होकल फॉर लोकलपासून ते मेक इन इंडियाचा अवलंबकरणे प्रत्येक नागरिकाचा मूलमंत्र बनला आहे. हा असाकाळ आहे, जिथे जलद विकासासोबतच आपल्यासांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणे हा एक ट्रेंड आहे.आज देशात स्पिरिचुअल टुरिझमची एक नवी लाट दिसतआहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’च्याभावनेसोबत एका सामूहिक संकल्पाने काम करणे हादेशाचा ट्रेंड बनला आहे. या सर्व सकारात्मक बदलांमागेपंतप्रधानांची भूमिका एका ट्रेंडसेटरची राहिली आहे, ज्यांनीया माध्यमातून आज संपूर्ण देशाला एकतेच्या एका मजबूतधाग्यात विणले आहे. आज भारत केवळ अंतर्गतदृष्ट्या सशक्त होत नाहीये,तर जागतिक स्तरावरही एक महासत्ता म्हणून उदयास आलाआहे. जेव्हा पंतप्रधानांना जगातील 32 देशांचा सर्वोच्चनागरी सन्मान प्राप्त होतो तेव्हा हा खऱ्या अर्थाने सनातनभारतीय विचार आणि 140 कोटी देशवासीयांच्या पुरुषार्थाचासन्मान असतो. याच कारणामुळे आज विकसित भारत हीकेवळ एक घोषणा नाही, तर पंतप्रधानांच्या दूरदर्शीविचारांचे फळ आहे, ज्याला देशवासीयांनी अढळ विश्वासआणि संकल्पित भावनेने आत्मसात केले आहे. भारताचे सामूहिक स्वप्न...सरकारची ही 12 वर्षे जिथे सेवा, सुशासनआणि लोक-आकांक्षांच्या पूर्तीची राहिलीआहेत, तिथेच पुढची 21 वर्षे विकसितभारताचे ध्येय साध्य करण्याचा प्रवास असेल.या अमृतकाळात सर्व देशवासी मिळून एकासशक्त, समृद्ध, सुरक्षित, स्वावलंबी, समर्थआणि समरस भारताच्या ‘सामूहिक स्वप्न’ लानक्कीच साकार करतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!

























Subscribe to my channel


