भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा वापर झपाट्याने वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे OpenAI यांनी जाहीर केलेला ताजा अहवाल. या अहवालानुसार भारतातून पाठवले जाणारे जवळपास निम्मे ChatGPT संदेश 18 ते 24 वयोगटातील तरुणांकडून पाठवले जातात. एकूण पाहता, 30 वर्षांखालील वापरकर्ते सुमारे 80 टक्के अॅक्टिव्हिटी चालवत आहेत. त्यामुळे भारतातील तरुण पिढी AI साधनांचा वेगाने स्वीकार करत असल्याचे स्पष्ट होते.
OpenAI च्या माहितीनुसार, भारतातील ChatGPT चा सर्वात मोठा युजर बेस हा तरुणांचा आहे. 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते एकट्याने जवळपास 50 टक्के संदेश पाठवत आहेत. 30 वर्षांखालील वापरकर्त्यांचा एकत्रित वाटा सुमारे 80 टक्के आहे. हा ट्रेंड दर्शवतो की नवी पिढी शिक्षण, प्रोजेक्ट्स, नोकरी आणि वैयक्तिक कौशल्यविकासासाठी AI टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. कंपनीने भारताला वेगाने वाढणारा आणि महत्त्वाचा बाजार म्हणून ओळख दिली आहे.
कोणत्याकामासाठी होतोय वापर?
अहवालानुसार, भारतातून पाठवले जाणारे सुमारे 35 टक्के संदेश व्यावसायिक कामाशी संबंधित आहेत. जे जागतिक सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे. कंटेंट रायटिंग, रिसर्च, ऑफिस टास्क, डेटा विश्लेषण आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ChatGPT चा वापर वाढत आहे. याशिवाय सामान्य माहिती, मार्गदर्शन आणि लेखन सहाय्यासाठीही लोक AI चा आधार घेत आहेत. त्यामुळे AI आता केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनत आहे.
OpenAI ने विशेष नमूद केले आहे की भारतात त्यांचा कोडिंग असिस्टंट Codex जागतिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात वापरला जात आहे. अलीकडील आठवड्यांत त्याच्या साप्ताहिक वापरात मोठी वाढ झाली असून भारतीय वापरकर्ते कोडिंगसंबंधी अधिक प्रश्न विचारत आहेत.
भारतात विस्ताराची तयारी
OpenAI आता भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनी मुंबई आणि बेंगळुरू येथे नवीन कार्यालये सुरू करण्याच्या तयारीत असून टाटा ग्रुप सोबत भागीदारी करून AI कंप्यूटिंग क्षमता वाढवण्यावर काम करत आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या माध्यमातून ChatGPT एंटरप्राइज सेवा विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कंपनी Pine Labs, ixigo, MakeMyTrip आणि Eternal यांसारख्या कंपन्यांसोबतही सहकार्य करत आहे. येत्या काही वर्षांत एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत AI टूल्स पोहोचवण्याची कंपनीची योजना आहे.
खर्चात मोठी घट
OpenAI चे सीईओ Sam Altman यांनी सांगितले की गेल्या सुमारे 14 महिन्यांत AI मार्फत जटिल उत्तर मिळवण्याचा खर्च 1000 पटांहून अधिक कमी झाला आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना AI चा अधिकाधिक फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



