भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा वापर झपाट्याने वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे OpenAI यांनी जाहीर केलेला ताजा अहवाल. या अहवालानुसार भारतातून पाठवले जाणारे जवळपास निम्मे ChatGPT संदेश 18 ते 24 वयोगटातील तरुणांकडून पाठवले जातात. एकूण पाहता, 30 वर्षांखालील वापरकर्ते सुमारे 80 टक्के अॅक्टिव्हिटी चालवत आहेत. त्यामुळे भारतातील तरुण पिढी AI साधनांचा वेगाने स्वीकार करत असल्याचे स्पष्ट होते.
OpenAI च्या माहितीनुसार, भारतातील ChatGPT चा सर्वात मोठा युजर बेस हा तरुणांचा आहे. 18 ते 24 वयोगटातील वापरकर्ते एकट्याने जवळपास 50 टक्के संदेश पाठवत आहेत. 30 वर्षांखालील वापरकर्त्यांचा एकत्रित वाटा सुमारे 80 टक्के आहे. हा ट्रेंड दर्शवतो की नवी पिढी शिक्षण, प्रोजेक्ट्स, नोकरी आणि वैयक्तिक कौशल्यविकासासाठी AI टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. कंपनीने भारताला वेगाने वाढणारा आणि महत्त्वाचा बाजार म्हणून ओळख दिली आहे.
कोणत्याकामासाठी होतोय वापर?
अहवालानुसार, भारतातून पाठवले जाणारे सुमारे 35 टक्के संदेश व्यावसायिक कामाशी संबंधित आहेत. जे जागतिक सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे. कंटेंट रायटिंग, रिसर्च, ऑफिस टास्क, डेटा विश्लेषण आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ChatGPT चा वापर वाढत आहे. याशिवाय सामान्य माहिती, मार्गदर्शन आणि लेखन सहाय्यासाठीही लोक AI चा आधार घेत आहेत. त्यामुळे AI आता केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग बनत आहे.
OpenAI ने विशेष नमूद केले आहे की भारतात त्यांचा कोडिंग असिस्टंट Codex जागतिक सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात वापरला जात आहे. अलीकडील आठवड्यांत त्याच्या साप्ताहिक वापरात मोठी वाढ झाली असून भारतीय वापरकर्ते कोडिंगसंबंधी अधिक प्रश्न विचारत आहेत.
भारतात विस्ताराची तयारी
OpenAI आता भारतातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनी मुंबई आणि बेंगळुरू येथे नवीन कार्यालये सुरू करण्याच्या तयारीत असून टाटा ग्रुप सोबत भागीदारी करून AI कंप्यूटिंग क्षमता वाढवण्यावर काम करत आहे. तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या माध्यमातून ChatGPT एंटरप्राइज सेवा विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कंपनी Pine Labs, ixigo, MakeMyTrip आणि Eternal यांसारख्या कंपन्यांसोबतही सहकार्य करत आहे. येत्या काही वर्षांत एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत AI टूल्स पोहोचवण्याची कंपनीची योजना आहे.
खर्चात मोठी घट
OpenAI चे सीईओ Sam Altman यांनी सांगितले की गेल्या सुमारे 14 महिन्यांत AI मार्फत जटिल उत्तर मिळवण्याचा खर्च 1000 पटांहून अधिक कमी झाला आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांना AI चा अधिकाधिक फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



