बांगलादेशमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP ने दणदणीत यश मिळवलं. आता लवकरच बांगलादेशमध्ये बीएनपी सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान हे मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू असून, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतासह जागातील प्रमुख देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान तारिक रहमान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळलं, तेव्हापासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या आहेत, शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. त्यावरून बांगलादेशमधील काळजीवाहू सरकार आणि भारतामधील संबंध चांगलेच ताणले गेल्याचं पहायला मिळालं, मात्र आता बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलं आहे. तारिक रहमान हे मंगळवारी पंतप्रधानपदाची थपथ घेणार आहेत. दरम्यान शेख हसीना यांच्या मुद्द्यावर बांगलादेशच्या नव्या सरकारची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता बांगलादेशमधून अधिकृत स्टेटमेंट आलं आहे.
यावर बोलताना बीएनपीचे महासचिव मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी मोठं विधान केलं आहे. शेख हसीना या भारतामध्ये आहेत, मात्र त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंधांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि बांग्लादेशमधील संबंध आणखी मजबूत होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही हे मान्य करतो की शेख हसीना यांनी मानवाधिकाराच गंभीर उल्लंघन केलं आहे. त्यांना शिक्षा व्हावी अशी येथील नागरिकांची इच्छा आहे. मात्र सध्या शेख हसीना या भारतामध्ये आहेत, आणि त्यांची भारतामध्ये असलेली उपस्थितीचा भारत बांगलादेश संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतानं शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केलं नाही तरी देखील भारत आणि बांगलादेशमधील व्यापारी संबंध हे मजबूत राहातील असं मिर्झा फखरुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. दरम्यान बीएनपीकडून आलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तान आणि चीनसाठी मोठा झटका मानली जात आहे.
शहर
- नाशिक: सिंहस्थ २०२७ साठी नाशिक सज्ज: शहरात उभारले जाणार २८ नवे रस्ते
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
महाराष्ट्र
- पुणे: पुरामुळे महिला ITI चे मोठे नुकसान; शैक्षणिक साहित्य आणि यंत्रसामग्रीची हानी
- महाराष्ट्र: रेशनधारकांसाठी मोठा दिलासा, आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य
- १८ गेट पास, ७२० टन कोळसा आणि २८.८० लाखांचा कथित घोटाळा; सीबीआयच्या कारवाईने रेल्वे विभागात खळबळ
- नागपूर: ८१ कोटींची घोषणा... पण बँकेच्या खात्यात एक रुपयाही नाही,धक्कादायक वास्तव उघड
गुन्हा
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
राजकीय
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
देश विदेश
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!


























Subscribe to my channel

