नवनीत गुर्जर यांचा कॉलम:चला, ई-20 अर्थात इथेनॉलच्या ‎पेट्रोलची व्याख्या समजून घेऊ‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎ई-20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल, 80 टक्के पेट्रोल यांचे‎मिश्रण असलेले पेट्रोल. आता देशभरातील पेट्रोलपंपांवर‎हेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. इथेनॉल हे‎ऊस, मका आणि काही अन्य कृषी उत्पादनांपासून तयार‎केले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे सरकार‎तीन प्रमुख कारणे सांगते. पहिले म्हणजे प्रदूषण कमी‎करणे. दुसरे म्हणजे कच्च्या तेलाची आयात कमी करणे‎व तिसरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.‎ प्रदूषण कमी करण्याचा मुद्दा योग्य असू शकतो. मात्र ‎‎कच्च्या तेलाची आयात कमी होत असल्यास इथेनॉल ‎‎मिश्रित पेट्रोलचे दर का कमी झाले नाहीत? या‎पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचे ‎‎सरकारही मान्य करत आहे. या पेट्रोलचा वापर‎करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाहनांचे सरासरी‎मायलेज 3 ते 7 टक्क्यांनी घटत आहे. तसेच या मिश्रित ‎‎पेट्रोलमुळे काही जुन्या वाहनांच्या इंजिनवर प्रतिकूल ‎‎परिणाम होऊ शकतो, असेही सांगितले जाते. अशा ‎‎वाहनांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचा‎विचार केल्यास त्यांच्या ऊसाला काही दुप्पट भाव मिळत‎आहे का? ते तर अनेक वर्षांपासून आपला संपूर्ण ऊस‎विकतच आहेत. ते देखील किमान दरात. शिवाय मोठ्या‎प्रमाणावर इथेनॉल अमेरिकेतून आयात केले जात‎े .‎2024 च्या आकडेवारीनुसार भारताने 67.98 कोटी‎लिटर एथिल अल्कोहोल आयात केले होते. त्यापैकी 92‎टक्के म्हणजेच 62.29 कोटी लिटर अमेरिकेतून आले‎ .‎सरकारचे म्हणणे आहे की, इथेनॉल मिश्रित‎पेट्रोलविरोधात एकही तक्रार नाही. पण आपण या‎पेट्रोलचा वापर काही प्रश्न न विचारता करत आहोत.‎जणू आपले स्वतःचे मतच उरलेले नाही. तेलघाण्याच्या‎बैलाप्रमाणे आपण डोके खाली घालून फिरत राहतो.‎मागून फटके बसत असले तरी तक्रार करण्याचे धाडस‎होत नाही. सरकार करेल तेच सत्य, सरकार सांगेल तेच‎अंतिम सत्य. अशीच मानसिकता झाली आहे. महागाई‎असो वा चुकीचे निर्णय, त्याचा आपल्यावर काहीच‎परिणाम होत नाही. कारण थांबून विचार करण्यासाठी‎आपल्याकडे वेळच उरलेला नाही. वास्तव असे आहे‎की, व्यक्ती पाहून मत बनवण्याची सवय लागली आहे.‎मुद्द्यांवर चर्चा करायची नाही आणि त्यांना स्पर्शही‎करायचा नाही. कारण मुद्द्यांवर बोलण्यासाठी वाचन‎आवश्यक असते व वाचनाशी आपला संबंधच तुटला.‎आपण इन्स्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअॅपवरच अधिक‎विश्वास ठेवू लागलो आहोत. तिथे कोणीही काहीही‎सांगितले की, तेच खरे मानण्याची सवय झाली.‎आपल्या मुलांनाही पुस्तकांपासून दूर नेत आहोत.‎कोणीतरी सांगितले, गांधीजी असे होते; आपण ते मान्य‎केले. आता दुसरे कोणी म्हणते, गांधीजी तसे होते; तेही‎आपण मान्य करतो. आयुष्यभर साधेपणाने जगलेल्या‎त्या महान व्यक्तीबद्दल आपण स्वतः कधी वाचण्याचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रयत्नच केला नाही. हेच नेहरूंबाबतही घडले. आजचा‎काळ महान आहे, हे मान्य. त्याची तुलना होऊ शकत‎नाही, हेही शक्य. पण गांधी-नेहरूंचा काळ, तेव्हाच्या‎कठीण काळात देश उभा करणे व टिकवून ठेवणे, ही‎साधी गोष्ट नव्हती. आपण पुरेसे वाचन न करता तुलना‎करतो. आपल्याला कोणत्याही विषयाशी देणे-घेणे‎उरलेले नाही. ज्वलंत प्रश्नांशी तर अजिबात नाही.‎ असो, विषय ई-20 चा होता. एक केंद्रीय मंत्री म्हणतात,‎इथेनॉल तर अनेक वर्षांपासून पेट्रोलमध्ये मिसळले जाते‎.‎मग वाहनांचे नुकसान आधी का झाले नाही? अनेक‎वर्षांपासून मिसळत असतील, पण तेव्हा त्याचे प्रमाण‎दोन-चार टक्के होते. आता ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवले‎आहे. नुकसान होणार असेल तर ते होणारच. शेवटी‎कोणत्याही गोष्टीचा फायदा किंवा तोटा हा तिच्या‎प्रमाणावरच अवलंबून असतो. मग त्या प्रमाणावर चर्चा‎का होत नाही?‎ कच्च्या तेलाची आयात इथेनॉलमुळे कमी‎होत असेल, तर इथेनॉलमिश्रित पेट्रोलचे‎दर का कमी झाले नाहीत? या पेट्रोलमुळे‎वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचे‎सरकारही मान्य करत आहे. शेतकऱ्यांचा‎ऊस काही दुप्पट दराने विकला जात‎नाही. ते तर अनेक वर्षांपासून संपूर्ण ऊस‎विकतच आहेत.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *