नंदितेश निलय यांचा कॉलम:लोकशाहीतील शेवटचा माणूस दोन मिनिटांचा उशीर झाल्याने हरला…‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दररोज केवळ तीनशे रुपये कमावणाऱ्या एका वडिलांनी‎मुलीच्या डोळ्यांत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले व‎त्यासाठी कर्ज घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. मात्र ते‎मुलीला वेळेत नीटच्या परीक्षा केंद्रावर पोहोचवू शकले‎नाहीत. अल्प उत्पन्न असलेल्या त्या वडिलांनी मुलीसोबत‎सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पण ते दोन मिनिटे‎उशिरा पोहोचले. परिणामी, त्या मुलीचे व तिच्या‎वडिलांचे सर्व विनवण्या, आक्रोश व अश्रू निरर्थक ठरले.‎कारण परीक्षा नियमांनुसार चालते. परीक्षा केंद्रावरील‎सुरक्षारक्षकाला स्पष्ट आदेश होते की, निर्धारित वेळेनंतर‎एक मिनिट उशीर झाला तरी परीक्षार्थीला उशिरा आलेले‎मानले जाईल आणि प्रवेश दिला जाणार नाही.‎ हताश झालेले वडील जमिनीवर कोसळले होते. मुलगी‎त्यांना बिलगून रडत होती. मात्र, संस्थेच्या भिंती‎निःशब्दपणे फक्त घड्याळाकडे बोट दाखवत सांगत‎होत्या की, तुम्ही उशिरा आलात. मग तो उशीर फक्त दोन‎मिनिटांचाच का असेना. एक मिनिटाचाही उशीर म्हणजे‎उशीरच असतो. वेळेचे महत्त्व काय असते हे जाणून‎घ्यायचे असेल, तर जपानकडे पाहावे.‎ जपानमध्ये वेळेचे काटेकोर पालन हा त्यांच्या संस्कृतीचा‎महत्त्वाचा भाग आहे. त्याला ‘जिकन-गेन्शु’ म्हणजे‎वेळेचे कठोर पालन असे म्हटले जाते. वेळेवर पोहोचणे‎ही केवळ शिस्तबद्ध जीवनशैली नसून तुमची वाट‎पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर मानला जातो. हे‎इतरांविषयीची जाणीव आणि विश्वास यांच्याशीही‎जोडलेले आहे. जपानमध्ये वेळ पाळणे म्हणजे‎दुसऱ्याच्या वेळापत्रकाचा सन्मान करणे व तेथील प्रत्येक‎संस्था तसेच नागरिकांच्या वर्तनात हे दिसून येते. रेल्वे‎प्रशासन व सरकारी अधिकारी किरकोळ विलंबाबद्दलही‎जाहीर माफी मागतात. तेथील सार्वजनिक वाहतूक‎व्यवस्था वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहे. बस किंवा‎रेल्वेला काही मिनिटे उशीर झाल्यास अधिकृत विलंब‎प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रवासी कार्यालयात किंवा शाळेत‎सादर करू शकतात. मात्र, त्या वडिलांकडे असे‎कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. त्यांच्याकडे फक्त एक मानवी‎सत्य होते की, पावसाच्या अडथळ्यांनंतरही ते वेळेत‎पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. नियमांनुसार ते उशिरा‎आले होते. पण परीक्षा केंद्राकडूनही संवेदनशीलता‎दाखवण्यात उशीर झाला. लोकशाहीतील शेवटचा माणूस‎दोन मिनिटांच्या उशिरामुळे पराभूत झाला.‎ या घटनेने मुख्यतः दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिला‎म्हणजे आपल्या देशात वेळेचे पालन हा सामाजिक‎संस्कार का बनू शकत नाही? आणि दुसरा म्हणजे काही‎विशेष परिस्थितीत उशिराच्या नियमांमध्ये लवचिकता‎असू शकत नाही का? परीक्षा केंद्रांवर एखाद्या‎अपवादात्मक परिस्थितीत एक-दोन मिनिटांची सवलत‎देणे अशक्य आहे का? कारण कोणताही परीक्षार्थी‎जाणीवपूर्वक एक-दोन मिनिटे उशिरा पोहोचण्याची‎योजना आखणार नाही. त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे‎आपण वेळेला किती आदर देतो? देशात वेळेबाबत अशी‎निष्ठा आहे का? बैठका वेळेवर सुरू होऊन वेळेवर‎संपतात का? एखाद्याला वाट पाहायला लावल्याने‎आपल्याला अपराधी वाटते का? की वेळेचे बंधन‎काहींसाठी कठोर आणि काहींसाठी लवचिक असते?‎ त्या वडिलांना आणि त्यांच्या मुलीला विश्वास होता की,‎माणुसकी व माणसाची करुणा अजूनही जिवंत आहे.‎त्यांच्या विनवण्या ऐकून कुणाचे तरी मन पिळवटून‎जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.‎त्या मुलीचे एक वर्ष वाया गेले. तिच्या आयुष्यातील एका‎वर्षावर दोन मिनिटांचा विलंब अवजड ठरला.‎ (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *