डे केअरमधील लहान मुलास प्रेमाची गरज असते. मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब, खेळणी किंवा अंगाई गीताची गरज असते.बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे-केअर केंद्रात दोन वर्षांपर्यंतच्या मुलांशी अमानुष वागणूक झाल्याचा प्रकार समोर आला आणि पालकांचा विश्वास हादरला. आरोपानुसार मुलांना बाथरूममध्ये कोंडणे, टॉयलेटच्या जेटमधून पाणी मारणे अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले. पाच केअरगिव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित केंद्र बंद करण्यात आले आहे. ही घटना कोणत्याही अनधिकृत पाळणाघरात नव्हे, तर देशाची तंत्रज्ञान राजधानी मानल्या जाणाऱ्या शहरातील कॉर्पोरेट परिसरात घडली. आपली मुले सुरक्षित आहेत, असा विश्वास पालक अशा केंद्रांवर ठेवतात. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो की, आई-वडील कामावर असताना त्या बदल्यात किंमत नेमकी कोण मोजत आहे? शहरी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आज दोन्ही पालकांची कमाई ही चैनीची गोष्ट राहिलेली नाही. घर, शिक्षण, आरोग्य, विमा, गृहकर्जाचे हप्ते आणि वाढत्या खर्चामुळे दोघांनीही नोकरी करणे अनेकदा अपरिहार्य बनले आहे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन व करिअरही त्याच्याशी जोडलेले आहे. मात्र विश्वासार्ह चाइल्डकेअरची सुविधा नसेल तर अनेक महिलांना नोकरी सोडावी लागते. त्यामुळे पाळणाघरे आवश्यक आहेत; पण त्याहून महत्त्वाची आहे त्यांची सुरक्षितता. दोन्ही पालक दीर्घकाळ कामावर असतील तर मुलांचा दिवस डे-केअर, आया, मोबाईल स्क्रीन, विविध उपक्रम आणि थकलेल्या पालकांत विभागला जातो. वेळ नसेल तर प्रेमही केवळ व्यवस्था बनते. उपस्थिती नसेल तर जिव्हाळाही व्यवस्थापनापुरता मर्यादित राहतो. मुलांना मात्र मोबाईलशिवाय एकत्र जेवण, झोपण्यापूर्वी गोष्ट, प्रश्नांची उत्तरे, शांत वातावरण आणि सुरक्षित झोप यांची गरज असते. बालपण म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वीचा प्रतीक्षाकाळ नाही. याच काळात मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास सर्वाधिक वेगाने होतो. युनिसेफ बालपणातील सुरुवातीचा काळ हा पोषण, सुरक्षितता, प्राथमिक शिक्षण आणि संवेदनशील संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानते. डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ जन्मानंतरच्या पहिल्या 1,000 दिवसांवर विशेष भर देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-6)नुसार, पाच वर्षांखालील 29.3% मुले खुंटलेल्या वाढीची, 19% अशक्तपणाची आणि 31.8% कमी वजनाची समस्या झेलत आहेत. मुलांचा विकास केवळ अन्नामुळे होत नाही; तर प्रेमळ स्पर्श, संवाद आणि विश्वास यांच्यामुळेही होतो. गेल्या काही दशकांत अनेक देशांनी चाइल्डकेअर ही केवळ खासगी व्यवस्था नसून सामाजिक पायाभूत सुविधा असल्याचे मान्य केले आहे. कारण मुलांना योग्य संगोपनाची गरज असते, तर प्रौढांना काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्याची आवश्यकता असते. यावर उपायही स्पष्ट आहेत. प्रत्येक पाळणाघर आणि डे-केअर केंद्राची नोंदणी, नियमित तपासणी आणि लेखापरीक्षण बंधनकारक असावे. केअरगिव्हरना योग्य वेतन, प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण देखरेख मिळावी. त्यांना बालविकास, सुरक्षित वर्तन आणि अहिंसक शिस्त यांचे प्रशिक्षण दिले जावे. नियोक्त्यांनी चाइल्डकेअरकडे सुविधा म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. लवचिक कामाचे तास, संमिश्र (हायब्रिड) कामकाज, निश्चित कामाचे तास आणि आई-वडिलांसाठी पुरेशी रजा यांमुळे मुलांना त्यांच्या पालकांचा अधिक वेळ मिळू शकतो. अखेरीस, प्रश्न केवळ रोजगाराचा नाही; तर मुलांच्या सुरक्षिततेला आणि भावनिक गरजांना केंद्रस्थानी ठेवून समाजाची रचना करण्याचा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




