डे केअरमधील लहान मुलास प्रेमाची गरज असते. मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब, खेळणी किंवा अंगाई गीताची गरज असते.बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे-केअर केंद्रात दोन वर्षांपर्यंतच्या मुलांशी अमानुष वागणूक झाल्याचा प्रकार समोर आला आणि पालकांचा विश्वास हादरला. आरोपानुसार मुलांना बाथरूममध्ये कोंडणे, टॉयलेटच्या जेटमधून पाणी मारणे अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले. पाच केअरगिव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित केंद्र बंद करण्यात आले आहे. ही घटना कोणत्याही अनधिकृत पाळणाघरात नव्हे, तर देशाची तंत्रज्ञान राजधानी मानल्या जाणाऱ्या शहरातील कॉर्पोरेट परिसरात घडली. आपली मुले सुरक्षित आहेत, असा विश्वास पालक अशा केंद्रांवर ठेवतात. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो की, आई-वडील कामावर असताना त्या बदल्यात किंमत नेमकी कोण मोजत आहे? शहरी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आज दोन्ही पालकांची कमाई ही चैनीची गोष्ट राहिलेली नाही. घर, शिक्षण, आरोग्य, विमा, गृहकर्जाचे हप्ते आणि वाढत्या खर्चामुळे दोघांनीही नोकरी करणे अनेकदा अपरिहार्य बनले आहे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन व करिअरही त्याच्याशी जोडलेले आहे. मात्र विश्वासार्ह चाइल्डकेअरची सुविधा नसेल तर अनेक महिलांना नोकरी सोडावी लागते. त्यामुळे पाळणाघरे आवश्यक आहेत; पण त्याहून महत्त्वाची आहे त्यांची सुरक्षितता. दोन्ही पालक दीर्घकाळ कामावर असतील तर मुलांचा दिवस डे-केअर, आया, मोबाईल स्क्रीन, विविध उपक्रम आणि थकलेल्या पालकांत विभागला जातो. वेळ नसेल तर प्रेमही केवळ व्यवस्था बनते. उपस्थिती नसेल तर जिव्हाळाही व्यवस्थापनापुरता मर्यादित राहतो. मुलांना मात्र मोबाईलशिवाय एकत्र जेवण, झोपण्यापूर्वी गोष्ट, प्रश्नांची उत्तरे, शांत वातावरण आणि सुरक्षित झोप यांची गरज असते. बालपण म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वीचा प्रतीक्षाकाळ नाही. याच काळात मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास सर्वाधिक वेगाने होतो. युनिसेफ बालपणातील सुरुवातीचा काळ हा पोषण, सुरक्षितता, प्राथमिक शिक्षण आणि संवेदनशील संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानते. डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ जन्मानंतरच्या पहिल्या 1,000 दिवसांवर विशेष भर देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-6)नुसार, पाच वर्षांखालील 29.3% मुले खुंटलेल्या वाढीची, 19% अशक्तपणाची आणि 31.8% कमी वजनाची समस्या झेलत आहेत. मुलांचा विकास केवळ अन्नामुळे होत नाही; तर प्रेमळ स्पर्श, संवाद आणि विश्वास यांच्यामुळेही होतो. गेल्या काही दशकांत अनेक देशांनी चाइल्डकेअर ही केवळ खासगी व्यवस्था नसून सामाजिक पायाभूत सुविधा असल्याचे मान्य केले आहे. कारण मुलांना योग्य संगोपनाची गरज असते, तर प्रौढांना काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्याची आवश्यकता असते. यावर उपायही स्पष्ट आहेत. प्रत्येक पाळणाघर आणि डे-केअर केंद्राची नोंदणी, नियमित तपासणी आणि लेखापरीक्षण बंधनकारक असावे. केअरगिव्हरना योग्य वेतन, प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण देखरेख मिळावी. त्यांना बालविकास, सुरक्षित वर्तन आणि अहिंसक शिस्त यांचे प्रशिक्षण दिले जावे. नियोक्त्यांनी चाइल्डकेअरकडे सुविधा म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. लवचिक कामाचे तास, संमिश्र (हायब्रिड) कामकाज, निश्चित कामाचे तास आणि आई-वडिलांसाठी पुरेशी रजा यांमुळे मुलांना त्यांच्या पालकांचा अधिक वेळ मिळू शकतो. अखेरीस, प्रश्न केवळ रोजगाराचा नाही; तर मुलांच्या सुरक्षिततेला आणि भावनिक गरजांना केंद्रस्थानी ठेवून समाजाची रचना करण्याचा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


