पुणे: जिल्ह्यातील चाकण आणि हिंजवडी या अत्यंत महत्त्वाच्या औद्योगिक व व्यावसायिक पट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव असून, रस्ते, फुटपाथ आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिक व उद्योग क्षेत्र त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण आणि हिंजवडीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
चाकण MIDC आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व बैठकीत आदित्य ठाकरे यांनी प्रशासकीय कारभारावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, या औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून चालण्यासाठी योग्य फुटपाथ नाहीत, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अवजड व साधारण वाहनांची वर्दळ असल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. पालकमंत्र्यांनी दरमहा नियमितपणे आढावा बैठक घेऊन या सर्व बाबींचा सखोल पाठपुरावा केला पाहिजे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांना एकत्र बोलावून फुटपाथची वानवा, कचरा व्यवस्थापन आणि रोजच्या वाहतूक कोंडीबाबत जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाईवर शेरे ओढत तुकाराम मुंडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान व शिस्तप्रिय अधिकाऱ्याची आठवण काढली. अनेक वेगवेगळे विभाग आणि अधिकारी असूनही जर समस्या सुटत नसतील, तर “अनेक लोकांपेक्षा एक चांगला आणि खमका अधिकारी द्या, जो सर्व परिस्थिती सुधारू शकेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चाकण आणि हिंजवडी या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पट्ट्यांमधून उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर दावा करत, जर विद्यमान उद्योगांना योग्य सुविधा दिल्या नाहीत तर त्याचा थेट परिणाम स्थानिक युवकांच्या रोजगारावर होईल, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
























Subscribe to my channel



