डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आपण प्रत्येक काम ‘आउटसोर्स’ केले, तर मग स्वतः काय करणार?‎‎‎‎‎‎‎‎‎

भारतात मोबाइल, स्वस्त डेटा आणि नव्या ॲप्समुळे‎आयुष्य सोपे झाले आहे. किराणा घरपोच मिळतो. टॅक्सी‎दारात येते. जेवण मोबाइल स्क्रीनवरून थेट ताटात येते. पण‎आता ॲपद्वारे मानवी मदतही मागणीनुसार मिळू लागली‎आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बाजारात‎येईल. तुमच्या पिशव्या उचलेल. तुमच्यासाठी रांगेत उभी‎राहील. तुम्हाला पाणी देईल. खुर्ची लावून देईल आणि‎तुमच्या छोट्या-मोठ्या वैयक्तिक सोयींकडे लक्ष देईल.‎याला आधुनिक सेवा, सुविधा आणि रोजगाराचे नवे‎मॉडेल म्हटले जात आहे. पण ही खरोखरच सुविधा आहे‎की सरंजामशाहीची नवी ॲप-आधारित आवृत्ती?‎ सुविधा वाईट नसते. पण ती जेव्हा आपल्याला आजारी,‎निष्क्रिय, परावलंबी आणि असंवेदनशील बनवू लागते,‎तेव्हा आपण थांबून विचार करायला हवा. ॲपवरून‎मागवलेली सुविधा स्वस्त वाटू शकते. पण तिची‎सामाजिक आणि आरोग्याशी संबंधित किंमत खूप मोठी‎आहे. आपण समानता, स्वावलंबन आणि आरोग्याकडे‎वाटचाल करणार आहोत की डिजिटल सरंजामशाहीकडे,‎हे देशाला ठरवावे लागेल. पूर्वी अशी वृत्ती दरबार, क्लब‎आणि नोकरांच्या रांगांमध्ये दिसायची. आता तीच‎मानसिकता मोबाइल ॲप, डिजिटल पेमेंट आणि‎स्टार्टअप्सच्या चकचकीत भाषेतून परत येत आहे.‎ एखाद्याला रोजगार देणे यातही काही गैर नाही. शेवटी सेवा‎क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा आवश्यक भाग आहे. ड्रायव्हर,‎घरकाम करणारे, सुरक्षा रक्षक, नर्सिंग अटेंडंट, डिलिव्हरी‎बॉय हे सर्वजण सन्माननीय आणि आवश्यक काम करतात.‎अडचण कामात नाही, तर त्या मानसिकतेत आहे. जेव्हा‎एखादी सक्षम, निरोगी आणि चालती-फिरती व्यक्ती‎स्वतःचे पाणी स्वतः घेणे, सामान उचलणे, रांगेत उभे‎राहणे किंवा थोडे चालणे हे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या‎विरुद्ध मानू लागते, तेव्हा खरी अडचण निर्माण होते.‎ हा विचार केवळ सामाजिक दृष्ट्याच चिंताजनक नाही,‎तर आरोग्यासाठीही हानिकारक आहे. आधुनिक शहरी‎भारत आधीच बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च‎रक्तदाब, फॅटी लिव्हर, पाठदुखी, तणाव आणि अपुरी झोप‎यासारख्या समस्यांचा सामना करत आहे. डॉक्टर दररोज‎रुग्णांना तोच सल्ला देतात. जास्त चाला, पायऱ्या चढा,‎छोटी कामे स्वतः करा आणि दैनंदिन कामात शरीराची‎हालचाल ठेवा.‎ मात्र ॲप-आधारित सुविधांची संस्कृती आपल्याला‎उलट्या दिशेने ढकलत आहे. ती सांगते- तुम्ही चालू नका,‎दुसरे कुणीतरी चालेल. तुम्ही उचलू नका, दुसरे कुणी‎उचलेल. तुम्ही रांगेत थांबू नका, दुसरे कुणीतरी थांबेल.‎थोडक्यात सांगायचे तर, शरीराला निष्क्रिय आणि‎अहंकाराला सक्रिय ठेवा.‎ केवळ जिममध्ये एक तास घाम गाळल्याने आरोग्य‎घडत नाही. आरोग्य हे दिवसभरातील छोट्या-छोट्या‎शारीरिक हालचालींतून घडते. बाजारात चालणे, स्वतःचे‎सामान उचलणे, घरातील छोटी कामे करणे, बस किंवा‎मेट्रोपर्यंत चालत जाणे, रांगेत उभे राहणे, स्वतःचे पाणी‎स्वतः घेणे आणि मुलांसोबत खेळणे या सर्व गोष्टींचा त्यात‎समावेश होतो. आधुनिक जीवनशैलीतून याच गोष्टी वेगाने‎गायब होत आहेत. जेव्हा आपण प्रत्येक छोटे काम‎‘आउटसोर्स’ करतो, तेव्हा आपण फक्त पैसे खर्च करत‎नाही तर आपले स्नायू, हाडे, पचनसंस्था आणि‎स्वावलंबनही कमकुवत करत असतो.‎ रोजगार‎आवश्यक आहे, पण प्रत्येक रोजगार म्हणजे सामाजिक‎प्रगती नसते. सभ्य समाज केवळ नोकऱ्यांच्या संख्येवर‎ठरत नाही. तो कामाची प्रतिष्ठा, कामगारांचे अधिकार,‎सामाजिक समानता व मानवी संबंधांच्या मूल्यांवरूनही‎घडतो. आपल्याला अशी अर्थव्यवस्था हवी, जी लोकांना‎सन्मान देईल.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *