ग्रामीण भारतातील ‘ते’ सर्वकालीन चित्र आठवा. मुले अनवाणी पायांनी चिखलाने भरलेल्या रस्त्यांवर नाचत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उड्या मारत आहेत. पहिल्या पावसात भिजताना दोन्ही हात पसरून शाहरुख खानसारखी पोज करत आहेत. शहरी लोकांना हा पावसाचा उत्साही जल्लोष वाटतो. पण त्या मुलांसाठी हा खेळापेक्षा खूप काही जास्त आहे. त्यांना माहीत आहे की पावसाच्या प्रत्येक थेंबाचा अर्थ आहे जीवन- कौटुंबिक शेतांसाठी पाणी, जनावरांसाठी चारा, ताटातील अन्न आणि भविष्याची आशा. पण या वेळी मान्सूनमध्ये अशा दृश्यांची उणीव आहे. एल-निनोमुळे अनियमित आणि विलंबाने झालेल्या पावसाने केवळ शेतीची लयच बिघडवली नाही तर हा निरागस आनंदही हिरावून घेतला आहे. सहसा मुलांच्या किलबिलाटाने गुंजणारे गावांचे रस्ते जास्त वेळ धुळीने भरलेले राहिले. जेव्हा मान्सून थांबतो तेव्हा केवळ पिकेच नाही तर संपूर्ण ग्रामीण बालपणही त्याची वाट पाहते. त्यामुळेच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या एका प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले पाहिजे. सुमारे १६ लाख एकर शेतजमिनीत पसरलेला हा जिल्हा शेतीबद्दलच्या विचारात उल्लेखनीय बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. हजारो शेतकऱ्यांनी एकसारखेच पीक पेरावे आणि एकसारखीच जोखीम पत्करावी याऐवजी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल एक मोहीम सुरू करून ७७८ ग्रामपंचायतींच्या ९७० गावांना आवाहन करत आहेत की, त्यांनी प्रत्येक गावात कमीत कमी २० एकर जमीन कमी पाण्यात येणाऱ्या आणि अधिक किंमत असलेल्या पिकांसाठी वेगळी ठेवावी. यामध्ये चिया सीड्स, तुती (मलबेरी), जवस, पांढरी मुसळी, शतावरी आणि रेशीम उत्पादन यांसारख्या पिकांचा समावेश आहे. हा पिकांमधील नियोजित वैविध्य आणण्याचा प्रयत्न आहे. अशा काळात जेव्हा हवामान-अनिश्चितता न्यू नॉर्मल बनली आहे तेव्हा अनपेक्षित मान्सूनच्या आव्हानांविरुद्ध ही भारतातील सर्वात महत्त्वाची जमिनीवरील चळवळीपैकी एक ठरू शकते. केवळ जालनाच नाही, पंजाबही अनेक दशकांपासून एक धडा देत आहे. भूजल पातळीत घट होऊनही तिथे शेतीमध्ये भात शेतीचे वर्चस्व राहिले आहे. पण आज अनेक प्रगतिशील शेतकरी जमिनीच्या एका भागात मका, भाज्या आणि फळांच्या बागा लावत आहेत. सिक्कीम वेगळ्या विचारांचे सर्वात मजबूत उदाहरण सादर करते. तिथल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्यात सेंद्रिय शेती अवलंबून उत्पादनाच्या प्रमाणावर स्पर्धा करण्याऐवजी प्रीमियम बाजारपेठांपर्यंत पोहोच मिळवली आहे. या बदलासाठी संयम लागला, पण आज राज्याची एक खास ओळख आहे, जी अधिक किंमत मोजणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करते. ओडिशाचे आदिवासी जिल्हे पूर्णपणे वेगळे मॉडेल दर्शवतात. हळद, आले आणि औषधी वनस्पतींची शेती करणारे शेतकरी, शेती उत्पादक संघटनांच्या माध्यमातून कौटुंबिक उत्पन्नात उल्लेखनीय सुधारणा करत आहेत. या संघटना धान्य गोळा करतात, गुणवत्ता सुधारतात आणि चांगल्या किमतींसाठी घासाघीस करतात. कमी पाऊस आणि अति तापमान असलेल्या गुजरातमधील कच्छमध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाने नापीक जमीन डाळिंब, खजूर आणि ड्रॅगन फ्रूटच्या फायदेशीर बागांमध्ये बदलली आहे. कधी काळी अशक्य वाटणारी गोष्ट आज फुल-फळणाऱ्या बागायतीवर आधारित अर्थव्यवस्था बनली आहे. जालन्याचे ‘२० एकर मॉडेल’ म्हणूनच इतके प्रभावी आहे. कारण ते शेतकऱ्यांना जमिनीच्या केवळ छोट्याशा भागावर प्रयोग करण्यास सांगते. पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पूर्ण शेत पणाला लावण्याची गरज नाही. विस्तार करण्यापूर्वी तो नवीन पिकाला केवळ अर्धा एकर जमीन देऊनही उत्पन्न, खर्च आणि जोखमीची तुलना करू शकतो. या सर्व उदाहरणांमध्ये एक समान धडा आहे. या सर्वांनी आपली जमीन हवामान अनुकूलतेची जिवंत प्रयोगशाळा बनवली. यश नेहमी अधिक जमिनीवर शेती केल्याने मिळत नाही. बऱ्याचदा ते या गोष्टीने मिळते की जमिनीतून समजदारीने उत्पादन कसे घ्यावे. या वर्षी जूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि कमकुवत मान्सूनने आधीच ही चिंता वाढवली आहे की, पावसावर आधारित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उत्पादनाचे नुकसान सोसावे लागू शकते. अशा वेळी पिकांची विविधता आणि हवामान-अनुकूल शेती अधिक महत्त्वाची झाली आहे. फंडा हा आहे की आज शेतीमध्येही वित्तीय सल्लागारांसारखा विचार हवा, जे बऱ्याचदा गुंतवणूकदारांना सांगतात की सर्व पैसे कोणत्याही एका शेअर किंवा मालमत्तेत लावू नका. जेव्हा एखादी गुंतवणूक अपेक्षेनुसार कामगिरी करत नाही तेव्हा विविधता तुमच्या व्यवसायाला आणि मालमत्तेला सुरक्षित ठेवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




