अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया,ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा केलेला दौरा हाभारताच्या धोरणात्मक बदलाची सुरुवात मानली पाहिजे.या बदलाला ॲक्ट-ईस्ट 2.0 असे म्हणता येईल.हिंद-प्रशांत क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यातअधिक सक्रिय भूमिका बजावण्यावर भर देणाऱ्या यानव्या दृष्टिकोनाचे हे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांत भारताचे धोरणात्मक लक्ष स्वाभाविकपणे इतर भागांकडे केंद्रित राहिले.युक्रेनमधील संघर्ष, पश्चिम आशियातील अस्थिरता, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि उत्तरेकडील सीमांवरील सुरक्षा आव्हाने यामुळे भारताच्या राजनैतिक ऊर्जेचा मोठा भाग खर्च झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आकार देण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या कोणत्याही देशाने संकटांना आपल्या धोरणात्मकविचारांवर कायमस्वरूपी वर्चस्व गाजवू देता कामा नये. उदयोन्मुख शक्तींना भविष्यातील संधींसाठीही तयारी करावी लागते. त्यामुळे पंतप्रधानांचा हा पूर्वेकडीलदेशांचा राजनैतिक दौरा हा धोरणात्मक संदेश देणारे पाऊलही आहे. संदेश स्पष्ट आहे— भारत पुन्हा एकदाठाम उद्देशाने पूर्वेकडे पाहत आहे. मूळ ॲक्ट-ईस्टधोरणाने संपर्क, व्यापार, संस्थात्मक भागीदारी आणिआसियान देशांशी संबंध मजबूत करून भारताचा पूर्वआणि आग्नेय आशियाशी असलेला संबंध अधिक दृढकेला. भारताची समृद्धी या प्रदेशाच्या गतिशीलतेपासूनवेगळी नाही, हे या धोरणाने मान्य केले होते. त्या दृष्टीने हेधोरण यशस्वी ठरले. हिंद-प्रशांत क्षेत्र आता जगातीलप्रमुख भू-राजकीय केंद्र म्हणून उदयास आले आहे.सागरी सुरक्षा, लवचिक पुरवठा साखळी, महत्त्वपूर्णतंत्रज्ञान, समुद्राखालील पायाभूत सुविधा आणि ऊर्जापुरवठा हे घटक आज जागतिक शक्तिसंतुलनावरलष्करी क्षमतेइतकाच प्रभाव टाकत आहेत.ॲक्ट-ईस्टच्या पहिल्या टप्प्याने भारताला पूर्वआशियाशी जोडले, तर दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्टहिंद-प्रशांतच्या धोरणात्मक रचनेला आकार देण्यातयोगदान देणे असावे. भारताचे पूर्वेकडील हितसंबंधआता केवळ क्वाडच्या गतीवर अवलंबून राहू नयेत.क्वाड हे सहकार्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असले, तरी तेना लष्करी आघाडी आहे, ना हिंद-प्रशांतमधीलभारताच्या धोरणाचा एकमेव आधार. अमेरिका सध्याचीनबरोबरच्या द्विपक्षीय स्पर्धा आणि विशेषतः तैवानच्याप्रश्नावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसते.अशा वेळी भारताने आपले पूर्वाभिमुख धोरण स्वतंत्रपणेपुढे नेले पाहिजे. यासाठी जपान आणि ऑस्ट्रेलियाशीद्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करणे आणिआसियानला ॲक्ट-ईस्ट 2.0च्या केंद्रस्थानी ठेवणेआवश्यक आहे. बदलत्या प्रादेशिक परिस्थितीतभारताने अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे.हिंद-प्रशांतमध्ये अमेरिका अजूनही प्रमुख लष्करी शक्तीअसली, तरी आग्नेय आशियातील अनेक देशांना तिचेराजकीय लक्ष अधिक निवडक होत असल्याची भावनाआहे. चीनने आर्थिक एकात्मता, पायाभूत सुविधा,सागरी उपस्थिती आणि सातत्यपूर्ण राजनैतिक प्रयत्नांद्वारेआपला प्रभाव सातत्याने वाढवला आहे. हा विस्तारबहुतांश वेळा उघड संघर्षाच्या पातळीखालील‘ग्रे-झोन’मध्ये घडतो; मात्र त्याचे दीर्घकालीनधोरणात्मक परिणाम मोठे असतात. आता धोरणात्मक क्षमतेसोबत धोरणात्मकआत्मविश्वासाचीही सांगड घालण्याची वेळ आलीआहे. फिलिपिन्स आणि इंडोनेशियासोबत भारताच्यावाढत्या भागीदाऱ्या, ज्यात संरक्षण निर्यातीचाही समावेशआहे, या संरक्षण सहकार्याचे कूटनीतीतील वाढते महत्त्वअधोरेखित करतात. ग्रेट निकोबारसारख्या विकासप्रकल्पांकडेही याच दृष्टीने पाहिले पाहिजे. हे केवळपायाभूत सुविधा प्रकल्प नसून, भारताच्या उदयोन्मुखसागरी शक्तीचे प्रतीक आहेत. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) 21व्या शतकातील धोरणात्मकशक्तिसंतुलन निश्चित करण्यातहिंद-प्रशांत क्षेत्र निर्णायक ठरणार आहे.या प्रदेशाच्या भवितव्याला आकारदेण्यासाठी भारत आता अधिक सक्रियभूमिका घेण्यास सज्ज आहे. ॲक्ट-ईस्ट2.0 धोरणातून भारताचे धोरणात्मकक्षितिज आता अधिक स्पष्टपणे पूर्वेकडेसरकत असल्याचे दिसून येते.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




