सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:एकाच प्रकारच्या विध्वंसाची‎ वेगवेगळी कारणे असू शकतात‎

‎‎‎‎‎‎‎‎मी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा‎(एनडीएमए) सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मी‎नेपाळमधील संकटाकडे या विषयातील तज्ज्ञाच्या‎दृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा हिमालयाच्या एखाद्या खोऱ्यात‎पाणी, चिखल आणि मोठे दगड अचानक खाली येतात,‎तेव्हा आपला पहिला अंदाज ढगफुटीचाच असतो. हे खरे‎आहे की, पर्वतीय भागात ढगफुटी ही एक सर्वसामान्य‎नैसर्गिक घटना आहे. यामुळे विनाशकारी पूर येतो. पण‎नेपाळच्या पार्श्वभूमीवर, हिमालयाच्या उंचावर नेमके‎काय घडत आहे, हे अधिक काळजीपूर्वक पाहिले पाहिजे.‎ प्रत्येक अचानक येणारा पूर केवळ अतिवृष्टीमुळे येत‎नाही. कधीकधी त्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथे‎बर्फ, खडक, पाणी, तापमान आणि गुरुत्वाकर्षण अशी‎काही परिस्थिती निर्माण करतात, जी समजून घ्यायला‎आपण अजून शिकत आहोत.‎ फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तराखंडमधील ऋषिगंगा-तपोवन ‎‎आपत्तीने हे अत्यंत भयंकर पद्धतीने दाखवून दिले. ती ‎‎हिवाळ्यातील एक स्वच्छ सकाळ होती. पण खोऱ्यात खूप ‎‎उंचावर खडक आणि बर्फाचा एक मोठा भाग तुटला. तो‎वेगाने खाली आला आणि त्याचे एका विनाशकारी ‎‎ढिगाऱ्याच्या प्रवाहात रूपांतर झाले. या घटनेत 200 हून‎अधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले. ऑक्टोबर‎2023 मध्ये सिक्कीममधील दक्षिण ल्होनाकच्या घटनेत‎एक वेगळीच प्रक्रिया पाहायला मिळाली. खूप जड ढिगारा‎हिमनदीच्या सरोवरात (ग्लेशियल लेक) पडला. यामुळे‎मोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि पाणी अडवून ठेवणारा‎नैसर्गिक अडथळा तुटला. यानंतर अत्यंत विनाशकारी‎वेगाने तिस्ता खोऱ्यात पूर आला. नेपाळची घटना याचा‎आणखी एक वेगळा प्रकार सांगते. सुरुवातीच्या‎अहवालांमध्ये भूकंपामुळे हिमनदी फुटण्याची शक्यता‎वर्तवण्यात आली होती. पण नंतरच्या वैज्ञानिक‎मूल्यांकनातून असे संकेत मिळाले की, हिमनदी‎फुटल्यामुळेच कदाचित भूकंपासारख्या हालचाली निर्माण‎झाल्या असाव्यात. उंच बर्फाळ पर्वतावरून खडक आणि‎बर्फाचा मोठा भाग तुटून वेगाने खाली पडला. यातून तयार‎झालेला ढिगारा आणि पाणी नदीच्या प्रवाहात मिसळले. या‎तीनही घटनांमधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. खाली‎सारखाच दिसणारा विध्वंस असू शकतो, पण उंचावर‎त्याची कारणे अगदी वेगळी असू शकतात.‎ आणखी एक नैसर्गिक घटना आहे, जिच्याबद्दल‎लोकांमध्ये अधिक जागृती होण्याची गरज आहे. ती‎म्हणजे ‘पर्माफ्रॉस्ट’. ही अशी खडकाळ जमीन असते,‎जी किमान सलग दोन वर्षे गोठलेलीच असते. खूप‎उंचावरील भेगांमध्ये असलेला बर्फ पर्वताच्या खडकांना‎एकमेकांशी जोडून ठेवण्यास मदत करू शकतो.‎तापमानातील बदल, वारंवार गोठण्याची आणि‎वितळण्याची प्रक्रिया, तसेच पर्माफ्रॉस्टची हळूहळू होणारी‎झीज या नैसर्गिक जोडणीला कमकुवत करू शकते. याचा‎अर्थ असा नाही की, हिमालयाचे पर्वत आता सगळीकडे‎तुटून पडणार आहेत. पण हवामान बदलाच्या काळात‎आपल्याला पर्वतांच्या स्थिरतेचाही गांभीर्याने अभ्यास‎करावा लागेल.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पाणी आणि ढिगारा खाली जाण्यासाठी सर्वात सोपा‎रस्ता शोधतात. खोरी ही पाणी, बर्फ, दगड आणि गाळ‎यांच्या अमर्याद ऊर्जेला एका मर्यादित मार्गात वळवतात.‎दुर्दैवाने, मानवी हालचालीही नेमक्या याच ठिकाणी‎होतात. नद्यांच्या खोऱ्यालगत रस्ते बांधले जातात. याच‎नद्यांवरून पूल बांधले जातात. जलविद्युत प्रकल्पही याच‎खोऱ्यांवर अवलंबून असतात. पिढ्यान््पिढ्या गावे‎नद्यांच्या काठावरच वसलेली आहेत. भाविक, पर्यटक‎आणि ट्रेकिंग करणारेही याच मार्गावरून जातात. अशा‎वेळी अनेक किलोमीटर दूर आणि हजारो मीटर उंचीवर‎सुरू झालेली आपत्ती अचानक या लोकांसाठी धोका बनू‎शकते. आपत्तीला खालपर्यंत आणू शकणारा हा संपूर्ण‎खालचा प्रवाह (डाउनस्ट्रीम कॉरिडॉर) आपण समजून‎घेण्याची गरज आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ प्रत्येक अचानक येणारा पूर केवळ‎अतिवृष्टीमुळे येत नाही. कधी कधी‎त्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथे‎बर्फ, खडक, पाणी, तापमान आणि‎गुरुत्वाकर्षण अशी काही परिस्थिती‎निर्माण करतात, जी समजून घ्यायला‎आपण अजून शिकत आहोत.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *