महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए)आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अवघ्या 100 दिवसांतखाद्यान्नातील भेसळीची अनेक प्रकरणे उघडकीसआणली. ही कारवाई मागील 18 महिन्यांतीलकारवाईपेक्षाही जास्त आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहानेसाजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळातही त्यांचीछापेमारी सुरूच आहे. राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढादेणाऱ्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटातील सुपरकॉपच्याधर्तीवर लोक आता त्यांना ‘सिंघम'' म्हणू लागले आहेत. अन्नभेसळीविरोधातील त्यांच्या कारवाईवर आलेली प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. शिथिल नियमांचीसवय झालेल्या व्यावसायिकांना त्यांना आता परवाना गमावण्याची भीती वाटते. दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांमध्ये नवी आशा व दिलासा दिसतो. सरकारनेफार पूर्वीच विचारायला हवा होता असा प्रश्न शेवटी कोणीतरी विचारताना दिसतोय: //"शेवटी तुम्ही आम्हाला खायला काय देताय?’ आपण विशिष्ट काळात जगत आहोत. येथे बाहेर खाणेहे रोजच्या आयुष्याचा भाग बनले आहे. आपणखातो-पितो ते सुरक्षित आहे की नाही, याची तपासणी नक्कीच कोणीतरी करत असेल, या विश्वासाने आपणऑनलाइन अन्न मागवतो. पण अस्वच्छ स्वयंपाकघरे,भेसळयुक्त साहित्य व अन्न सुरक्षा नियमांचे उघडउल्लंघन उघड करणारा प्रत्येक छापा या विश्वासाचाचुराडा करतो. देशात कायदे कठोरपणे लागू केले जातनाहीत, ही खरी समस्या आहे. पण इथूनच एक मोठाप्रश्न उपस्थित होतो : आपले काम प्रामाणिकपणेकरणाऱ्या अधिकाऱ्याला आपण ‘सुपरहीरो'' कामानावे? मुंढे यांच्याकडे अलौकिक शक्ती नाही. त्यांनापार्श्वसंगीत किंवा फिल्मी संवादांची गरज नाही. तरीही‘सिंघम'' हा किताब त्यांना दिला जातो. कारण वजनदारलोक व्यवस्थेतून सहज सुटण्याचा मार्ग शोधतात, हेपाहण्याची सवय नागरिकांना झाली आहे. संपूर्णकारकिर्दीत मुंढे हे प्रस्थापित हितसंबंधांना आव्हान देणारे, सहजासहजी तडजोड न करणारे अधिकारी म्हणूनओळखले गेले. 21 वर्षांत त्यांच्या 25 बदल्या झाल्या.पण याच टप्प्यावर एका अधिकाऱ्याची ही कथा संपूर्णभारतीय सनदी व्यवस्थेची कथा बनते. भारतात हुशारकिंवा प्रामाणिक अधिकाऱ्यांची कमतरता नाही. दरवर्षीदेशातील अतिशय गुणवंत तरुण सनदी सेवेत येतात.कमतरता आहे ती अशा संस्थात्मक वातावरणाची. काहीत्रुटी त्यांना स्वतंत्रपणे काम करू देत नाही. एखादाअधिकारी कठीण बदली सहन करू शकतो. पण प्रत्येकमहत्त्वाच्या निर्णयापूर्वी अनेक गणिते मांडावी लागतात,अशा व्यवस्थेत टिकून राहणे कठीण असते. कोणनाराज होईल? एखादा नेता तक्रार करेल का? एखादाबडा व्यावसायिक फोन करेल का? एखादी धार्मिकसंघटना विरोध करेल का? एखादी प्रभावी लॉबी तिच्यासंबंधांचा वापर करेल का? आणि काम पूर्णहोण्याआधीच बदलीचा आदेश तर येणार नाही ना?अशा प्रकारे हळूहळू या संस्थांची कणाहीनता वाढतजाते. सगळेच अधिकारी भ्रष्ट असतात म्हणून असे होतनाही, तर यंत्रणेतच दोष असतो. कदाचित मुंढे यांच्याकथेतील महत्त्वाचा भाग हा नाही की त्यांना ‘सिंघम''म्हटले जात आहे. महत्त्वाचे हे आहे की, नागरिक म्हणूनआपण अशा एखाद्या व्यक्तीसाठी आतुर झालो आहोत.अन्न सुरक्षा ही तुकाराम मुंढे एफडीएच्या प्रमुख पदावरआहेत की नाही, यावर अवलंबून नसावी. एखाद्याअधिकाऱ्याने धाडी टाकल्याने हॉटेल्स स्वच्छ होऊनयेत. कडक आयुक्त पदावर असतानाच भेसळखोरांचेधाबे दणाणायला हवेत असे नाही. मुंढे यांची बदलीझाल्यानंतरही ही यंत्रणा सक्षमपणे चालली पाहिजे. ता. क.: गेल्या आठवड्यात मी महाराष्ट्रातील एकावरिष्ठ मंत्र्यांना विचारले: "तुम्हाला मुंढे यांच्याबद्दल कायवाटते?"त्यांनी उत्तर दिले, "अहो, तो तर वेडा माणूसआहे!" पण कदाचित आपल्याला थोडे ‘वेडेपण''असलेल्या अशाच सरकारी अधिकाऱ्यांची गरज आहे.त्यांची निष्ठा आपल्या राजकीय मालकांऐवजी सामान्यनागरिकांशी असली पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) मुंढे यांच्याकडे कोणतीही अलौकिकशक्ती नाही. त्यांना बॅकग्राउंड म्युझिककिंवा फिल्मी संवादांची गरज नाही. तरीही‘सिंघम'' हा किताब त्यांच्या नावाशीजोडला गेला. कारण सामर्थ्यवान लोकनेहमीच व्यवस्थेतून निसटण्याचा मार्गशोधून काढतात, हे पाहण्याची सवयनागरिकांना झाली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान





























Subscribe to my channel




