मी अशा शेफ्सना ओळखतो, जे सोमवार आणि मंगळवारी घरीच असतात. बुधवारी दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संशोधन करतात आणि संध्याकाळी उपाहारगृहात पोहोचतात, जेणेकरून आठवड्याच्या मध्यात येणाऱ्या ग्राहकांना सेवा देऊ शकतील. मग गुरुवारपासून रविवारपर्यंत उशिरा रात्रीपर्यंत काम करतात. मुंबईत बऱ्याच काळापासून दक्षिण मुंबईतील उपाहारगृहे आणि दादरसारख्या भागांतील लहान दुकाने आठवड्यातून केवळ चार रात्रीच उघडतात. यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता आणि मागणी नेहमी पुरवठ्यापेक्षा जास्त राहते. असे यासाठी, कारण उद्योजकांनी मुंबईकरांचा खरेदीचा कल ओळखला आहे, जे शनिवार-रविवारी किंवा त्या आसपासच्या दिवसांत जास्त खर्च करतात. या आठवड्यात डेटा आउटफिट ‘प्राइस’ आणि टाटा सन्स यांच्यातर्फे देशातील अव्वल 100 शहरांमध्ये उपभोग पॅटर्नवर केलेल्या अभ्यासात हीच गोष्ट समोर आली आहे. यानुसार शहरी ग्राहकांच्या साप्ताहिक खर्चाचा दोन-तृतीयांश भाग शनिवार आणि रविवारी खर्च होतो. किराणा आणि आरोग्यसेवेसारख्या अत्यावश्यक गोष्टींवरील खर्च संपूर्ण आठवडाभर समान राहतो, परंतु फॅशनवरील खर्चात स्पष्ट वाढ दिसते. हा खर्च इतर दिवसांच्या सरासरी 529 रुपयांवरून वाढून वीकेंडला सरासरी 1075 रुपयांपर्यंत पोहोचतो. हा कल देशातील सहा मोठ्या महानगरांमध्ये- दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद- मध्ये अधिक स्पष्ट आहे. बाकी 94 शहरेही फार मागे नाहीत. फक्त धनबादसारख्या काही शहरांत ही पातळी थोडी कमी आहे. दीर्घकाळापासून सेंद्रिय शेती करणारे शेतकरी केवळ मुंबई आणि बेंगळुरूसारख्या पहिल्या श्रेणीतील शहरांतच नव्हे, तर इंदूर आणि जयपूरसारख्या दुसऱ्या श्रेणीतील शहरांतही हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहेत. अनेक शेतकरी केवळ रविवारी व्यवसाय करतात, कारण कॉर्पोरेट कर्मचारी पुढील काही दिवसांसाठी ताज्या भाज्यांचा साठा फ्रिजमध्ये ठेवतात. हे शेतकरी एकत्र, एकाच ठिकाणी जाऊन आपली साप्ताहिक उत्पादने विकतात. अमेरिका, कॅनडा, जपान आणि युरोपसारख्या विकसित देशांतही अनेक स्वतंत्र बुटीक, फॅशन, अँटीक किंवा क्राफ्ट स्टोअर्स केवळ गुरुवार ते रविवारपर्यंतच उघडतात. त्यांचे मालक दैनंदिन ग्राहकांऐवजी अपॉइंटमेंट, ऑनलाइन विक्री किंवा अधिक मार्जिन असलेल्या व्यवसायावर विश्वास ठेवतात. मी केरळसारख्या राज्यांत काही खाजगी संग्रहालये पाहिली आहेत, जी जनतेसाठी केवळ वीकेंडला आणि इतर दिवसांत विनंतीवरूनच उघडली जातात. तुम्ही विचार करत असाल की जेव्हा भाडे आणि पगार यांसारखे निश्चित खर्च समान राहतात, तर मग हे व्यवसाय चार दिवसच का उघडतात? याची अनेक कारणे आहेत. कदाचित हे त्या जागेच्या विशेषतेमुळे असेल, जसे की संग्रहालय. कदाचित परिसर स्वतःचा असेल आणि कर्मचारी कुटुंबातील सदस्य असतील, जे तीन दिवस काम करून कमाई करतात आणि बाकी चार दिवस जीवनाचा आनंद घेतात. जे लोक भाड्याच्या जागेत व्यवसाय करत आहेत, शक्यतो ते हे ओम्नी-चॅनेल रिटेल म्हणून चालवत असतील, जिथे ते प्रत्यक्ष दुकानासह ऑनलाइन विक्री आणि क्लिक-अँड-कलेक्टसारख्या ऑफर्सचे मिश्रण करत असतील. भविष्यात थ्री-डे रिटेल मॉडेल सामान्य होऊ शकेल का? अनेक महाविद्यालये आपल्या अभ्यासक्रमांत उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहेत, तर कदाचित निवडक क्षेत्रांत पुढील काही वर्षांत असे होऊ शकेल. या मॉडेलमुळे ज्या व्यवसायांना फायदा होऊ शकतो, त्यात लक्झरी बुटीक, हस्तनिर्मित उत्पादने, डिझायनर फर्निचर, आर्ट अँड कलेक्टिबल्स, स्पेशालिटी फूड आणि विंटेज क्लोदिंगचा समावेश आहे. भविष्यातील असे वीकेंड स्टोअर्स डेस्टिनेशन शॉपिंगसाठी उपयुक्त ठरू शकतात, जे सोमवार ते गुरुवारपर्यंत ऑनलाइन ऑर्डर घेतील आणि या काळात स्टाफला इन्व्हेंटरी, प्रॉडक्शन आणि ऑनलाइन ग्राहकांशी जोडण्यासाठी वापरतील. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उघडल्यामुळे अशा व्यवसायांत श्रम खर्च कमी होऊ शकतो आणि ते बहुतांश मागणीही पूर्ण करू शकतात. काही तर आपल्या मर्यादित वेळेपर्यंत उघडे राहण्यालाच एक्सक्लुझिव्ह ब्रँड एक्सपीरियन्स म्हणून प्रचारित करतात. जर तुम्हाला फूड बिझनेसमध्ये उतरायचे असेल तर वीकेंड व्हेंचर सुरू करून कमीत कमी गुंतवणुकीत बाजारपेठ परखू शकता. फंडा असा आहे की, वर्क-लाइफ बॅलन्स शोधणारे अत्यंत उत्पादक कर्मचारी आणि वीकेंडला होणारा मनमानी खर्च पाहता अनेक उद्योजक ‘वीकेंड इकॉनॉमी’चा विचार करू शकतात. काही रिटेल व्यवसायांतदेखील हा भविष्यातील ट्रेंड बनू शकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




