प्रियदर्शन यांचा कॉलम:समस्या ही की, आपल्याला आता‎ कशाचेच काही वाटेनासे झाले आहे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎राम मंदिरातील देणगीच्या चोरीबाबत सुरू असलेला वाद‎भावुकतेपासून ते राजकारणाच्या परिघापर्यंत पसरलेला‎आहे. कुणाला भावना दुखावण्याची चिंता आहे, तर‎कुणासमोर असा प्रश्न आहे की याचा यूपीच्या‎निवडणुकांवर काय परिणाम होईल. परंतु, जी एक मूलभूत‎चिंता या संपूर्ण प्रकरणातून समोर यायला हवी होती, ती ही‎की, या देणगीच्या चोरीने आठवण करून दिली आहे की,‎आपण मुळात भ्रष्टाचार किंवा इतर अनेक वाईट गोष्टी‎मुकाट्याने सहन करणाऱ्या आणि बऱ्याचदा त्यात सामील‎राहणाऱ्या समाजात बदललो आहोत. देणगीची चोरी ‎‎करणाऱ्या लोकांना जर देवाचे नाही, तर किमान भक्तांचे‎तरी भय वाटले असते- की हे जर उघडकीस आले तर ‎‎आपला सामाजिक बहिष्कार सुरू होईल. परंतु, अशी ‎‎कोणतीही भीती त्यांच्या मनात नव्हती. त्यांच्यापैकी काही‎जण पकडले गेले असून तुरुंगाच्या गजाआड आहेत,‎तरीही हा संशय कायम आहे की अनेक देणगीचोर बाहेरच ‎‎मोकळे आहेत आणि ते पकडल्या गेलेल्या लोकांना‎कठोरात कठोर शिक्षा देण्याची भाषा करत आहेत.‎ आमचा समाज हळूहळू कोणत्याही गोष्टीची जाणीव‎ठेवण्याची शक्ती गमावत चालला आहे. मंदिरात चोरी‎असो, जातीय हिंसाचार असो, बलात्कार असो की‎भ्रष्टाचार असो- आपल्याला आता कशाचेच काही‎वाटेनासे झाले आहे. तसे तर आपण सर्वांनाच विरोध‎करतो, सर्वांच्या विरोधात संताप व्यक्त करतो, पण हे‎केवळ एक प्रदर्शन, एक देखावा असतो की आपण गप्प‎नाही आहोत हे इतरांनी पाहावे. आपण फक्त गोंगाट ऐकतो‎आणि करतो, ज्या प्रकरणांचा आपल्यावर थेट आघात‎होतो, त्यावरही संताप व्यक्त करण्यापलीकडे आपण‎काहीच करत नाही- मग ते पेपरफुटीचे प्रकरण असो‎किंवा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याबाबत सुरू असलेली‎चर्चा असो.‎ इथून आणखी एक प्रश्न निर्माण होतो. या ढोंगीपणाच्या‎मागे आपले संस्कारही आहेत का? जगभरातील धर्मांची‎ही समस्या राहिली आहे की, त्यामध्ये ईश्वर आणि भक्त‎यांच्यामध्ये दलाल बसलेले असतात, जे असा विश्वास‎देतात की वरचा खूप दयाळू आहे आणि तो सर्वांची पापे‎धुवत राहतो. इंग्लंडमध्ये एका काळात पाप-मुक्तीची‎प्रमाणपत्रे विकली जात असत. चौदाव्या-पंधराव्या‎शतकात चर्चमधील अंगभूत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जॉन‎विकलिफ यांच्यापासून ते मार्टिन ल्यूथर यांच्यापर्यंतच्या‎संघर्षाने प्रोटेस्टंट चर्चचा पाया घातला. हिंदू धर्मातही‎पाप-निवारणाचे अनेक उपाय आणि कर्मकांड प्रचलित‎आहेत. इस्लाममध्येही मौलवींच्या अजब-गजब फतव्यांनी‎खऱ्या मुसलमानांचे जगणे कठीण करून ठेवले आहे.‎अशा धार्मिक पाखंड आणि वर्चस्वाशी जेव्हा राजकारण‎जोडले जाते, तेव्हा यामध्ये खरा धार्मिक माणूसच सर्वात‎जास्त एकटा पडतो.‎ आता बाजारपेठ ही अशी नियामक शक्ती आहे, जिला‎ठाऊक आहे की कधी राजकारणाचा वापर करायचा,‎कधी धर्माचा आणि कधी खेळाचा. देणगीची चोरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎हादेखील या बाजारपेठेसाठी एक विक्रीयोग्य विषयच‎आहे, ज्यामध्ये एका बाजूला राजकीय समीकरणे आहेत,‎तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आस्थेचा हवाला आहे. ‎या‎लढ्यात विजय त्याचा होणार नाही, जो असा विश्वास‎देईल की तो देणगीची चोरी पूर्णपणे थांबवेल किंवा‎मंदिराची पवित्रता टिकवून ठेवेल, तर विजय त्याचा होईल,‎ज्याच्या असण्याने एका मोठ्या वर्गाला आपल्या हिताच्या‎रक्षणाचे आश्वासन मिळेल. स्वार्थी वृत्ती कदाचित‎आजकाल आमचा स्वभाव बनली आहे आणि जगात‎काय चालले आहे व कसे चालले आहे, याने आम्हाला‎फारसा फरक पडत नाही. दुर्दैवाने जेव्हा त्याचा फटका‎आपल्याला स्वतःला बसतो, तेव्हा आपल्याला समजते की‎आपली अलिप्तता किंवा तटस्थता हीच आपली खरी शत्रू‎आहे .‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ आपण भ्रष्टाचार किंवा इतर वाईट गोष्टी‎मुकाट्याने सहन करणाऱ्या समाजात‎बदललो आहोत. देणगी चोरी करणाऱ्यांना‎जर देवाचे नाही,तर किमान भक्तांचे तरी‎भय वाटलेअसते- की हे जर उघडकीस‎आले तर सामाजिक बहिष्कार सुरू होईल.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *